शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
5
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
6
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
7
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
8
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
9
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
10
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
11
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
12
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
13
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
14
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
15
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
16
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
17
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
18
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
19
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
20
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
Daily Top 2Weekly Top 5

वन्यप्राणी शिकाऱ्यांच्या निशाण्यावर

By admin | Updated: March 8, 2015 02:09 IST

वनसंपत्तीने नटलेल्या पैनगंगा अभयारण्यात असलेले वन्यप्राणी आता शिकाऱ्यांच्या निशाण्यावर आहेत. मोर, हरीण, रोही आदी प्राण्यांची शिकार करून ...

उमरखेड : वनसंपत्तीने नटलेल्या पैनगंगा अभयारण्यात असलेले वन्यप्राणी आता शिकाऱ्यांच्या निशाण्यावर आहेत. मोर, हरीण, रोही आदी प्राण्यांची शिकार करून मांसाची विक्री खुलेआम केली जात आहे. होळीपूर्वी मोराची शिकार करण्याचा प्रयत्न झाला होता. वाघ, बिबट्यांसारखे हिंस्त्र प्राणी कमी झाल्याने शिकारी बिनधास्त अभयारण्यात शिरत असल्याची माहिती आहे. मात्र वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी याकडे दुर्लक्ष करीत आहे. विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवर पैनगंगा अभयारण्या आहे. मौल्यवाण सागवानासह या जंगलात विविध पशूपक्षी आहेत. वाघ-बिबट, हरीण, रोही, मोर, ससे, रानडुक्कर, तितर, बटेर, पाणकोंबड्या यासह विविध प्रजातीचे पशूपक्षी आहेत. सागवान तस्कर मोठ्या प्रमाणात जंगलात शिरतात. जंगल तोडतानाच वन्यप्राण्यांची शिकार करतात. पैनगंगा अभयारण्यात गेल्या काही वर्षात हिंस्त्र प्राण्यांची संख्या कमी होत चालली आहे. त्यामुळे शिकाऱ्यांचे चांगलेच फावत आहे. वाघ, बिबट्यासारखे प्राणी जंगलात असले की शिकारी जंगलात शिरायला मागेपुढे पाहतात. मात्र आता या प्राण्यांची संख्या अल्प झाल्याने बिनधास्तपणे जंगलात शिरून हरीण, राही, मोर, तितर, बटेर आदींची शिकार करीत आहे. नदीच्या तिरावर प्राणी पाणी पिण्यास येतात म्हणून शिकारी त्याठिकाणी आपले जाळे टाकूण असतात. पाणी पिण्यासाठी आलेले प्राणी अलगद जाळ््यात अडकतात. विशेष म्हणजे राष्ट्रीय पक्षी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोराच्या शिकारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. होळीपूर्वी दराटी जंगलात जखमी असवस्थेतील एक मोर आढळून आला होता. या मोराची शिकार करण्यासाठी त्यावर हल्ला करण्यात आला होता. सुदैवाने त्या मोराच्या पायाला दुखापत झाली. वनविभागाने किनवटच्या पशूचिकित्सालयात मोरावर उपचार केले. मात्र याबाबत परिसरात उलटसूलट चर्चा सुरू आहे. तीन मोरांची शिकार झाली असून, एक मोर शिकाऱ्यांच्या तावडीतून सुटल्याने तो नागरिकांच्या ताब्यात आला. नागरिकांनी त्याला वनविभागाच्या सुपूर्द केले. दररोज या भागात मोराची शिकार केली जात आहे. यासोबतच हरीण आणि इतर प्राण्यांचीही शिकार केली जाते. स्थानिकांच्या मदतीने होणाऱ्या शिकारीचे मांस शहरातील हॉटेल आणि धाब्यावर विकले जाते, तर अनेकदा जंगलामध्ये पार्टी केली जाते. तेलंगाणातील तस्कर याभागात शिरून तस्करी करीत आहेत. मात्र वनविभागाचे कर्मचारी जंगलात जायला घाबरतात. ही मानसिकता ओळखूनच वन्यजीवांची शिकार केली जात आहे. शिकाऱ्यांवर अटकाव आणला नाही तर किलबिलाट नष्ट होण्याची भीती आहे. (शहर प्रतिनिधी)