शहरं
Join us  
Trending Stories
1
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
2
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
3
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
4
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
5
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
6
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
7
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
8
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
9
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
10
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
11
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
12
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
13
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
14
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
15
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
16
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
17
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
18
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
19
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
20
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
Daily Top 2Weekly Top 5

बच्चूभाऊंना जमले ते स्थानिकांना का नाही ?

By admin | Updated: April 19, 2015 02:09 IST

अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी अपंगांच्या प्रश्नांवर यवतमाळात येऊन केलेल्या आक्रमक आंदोलनाने येथील जनता चांगलीच प्रभावित झाली आहे.

यवतमाळ : अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी अपंगांच्या प्रश्नांवर यवतमाळात येऊन केलेल्या आक्रमक आंदोलनाने येथील जनता चांगलीच प्रभावित झाली आहे. १५० किलोमीटरवरील बच्चू कडूंना जे जमले ते एवढ्या वर्षात यवतमाळ जिल्ह्यातील एकाही आमदाराला का जमू नये, याची चर्चा आता जोर धरत आहे.अपंग व्यक्ती हा समाजातील दुर्लक्षित घटक आहे. त्याला समाजातून मिळणाऱ्या हीन वागणुकीचा सामना करावा लागतो. शारीरिक व्यंगत्वावर बोट ठेवून त्यांचा अवमान केला जातो. समाजातून ही वागणूक असताना सरकारमधील घटक आणि शासकीय यंत्रणाही त्यांच्याशी सौजन्याने वागत नाही. त्यांचे कुणी वाली नाही, असे समजून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आरक्षित ठेवला जाणारा निधी इतर बाबींवर वळविला जातो. गेल्या दहा वर्षांपासून हा प्रकार राजरोसपणे शासकीय अभिलेख्यातून पाहायला मिळतो. मात्र त्याविरोधात कुणीही आवाज उठविला नाही. अपंगांच्या बाबतीत आघाडी सरकारमधील आमदारांचाच कित्ता युती सरकारमधील आमदार गिरवित आहेत. मात्र अमरावती जिल्ह्यातील अचलपूरचे अपक्ष आमदार तथा ‘प्रहार’ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू मात्र १५० किलोमीटरवरील या अपंगांच्या मदतीला यवतमाळात धावून आले. शुक्रवारी कडू यांच्या नेतृत्त्वात अपंगांनी थेट जिल्हा परिषदेवर धडक दिली. सीईओंच्या कक्षाचा ताबा घेवून त्यांची खुर्ची टेबलवर ठेवत त्याला हार घातला गेला. नंतर उपस्थित झालेल्या सीईओंची झाडाझडती घेतली गेली. शेजारील जिल्ह्यातून येवून एखादा आमदार स्थानिक अपंगांच्या समस्यांना एवढ्या पोटतिडकीने आणि आक्रमकपणे प्रशासनापुढे मांडू शकतो, याचेच खरे अप्रुप जिल्ह्यातील जनतेला वाटते आहे. कारण त्यांनी समाजातील उपेक्षित घटकांच्या प्रश्नावर जिल्ह्यातील कोणत्याही आमदाराला एवढे आक्रमक होताना कधी पाहिले नाही. जिल्ह्यातील आमदार स्थानिकांच्याच समस्यांना हात घालत नाहीत तर खरंच दुसऱ्या जिल्ह्यातील समस्याग्रस्तांच्या मदतीला धावून जातील का, असा उपरोधिक सवाल जनतेतून विचारला जात आहे. यापूर्वी १५ वर्षे राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता होती. या पक्षातील सर्वच दिग्गज आणि व्हीआयपी असल्याने त्यांच्याकडून जनसामान्यांच्या प्रश्नांवर अशा आक्रमक आंदोलनाची जनतेनेही कधी अपेक्षा ठेवली नाही. एकतर ते कधी रस्त्यावरच उतरले नाही आणि एखादवेळी उतरले तरी ते प्रशासनाला निवेदन देण्यापुरते. विरोधी पक्षात असताना शिवसेना नेत्यांनी सुरुवातीला अशी चार-दोन आक्रमक आंदोलने केलीही, मात्र जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीसोबत सत्तेत बसल्यापासून त्यांचीही अशी आंदोलने जणू बंद झाली होती. आता तर भाजप-सेना सत्तेत असल्याने त्यांच्याकडून अशा आक्रमक आंदोलनाची अपेक्षा ठेवणे गैरच, तर दुसरीकडे विरोधी बाकावर असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना मुळात आंदोलनाची सवयच नाही, आक्रमक आंदोलन तर दूरच. जिल्ह्यातील सत्ताधारी व विरोधी पक्षाकडून जनतेच्या प्रश्नांवर आक्रमक आंदोलनांबाबत नागरिकांचा अपेक्षाभंग झाला असला तरी बच्चू कडू यांच्या आंदोलनाने मात्र आशा पल्लवीत झाल्या आहेत. आंदोलनासाठी जिल्ह्यातीलच आमदार असणे गरजेचे नाही, शेजारील जिल्ह्यातील (जनतेच्या समस्यांची जाणीव असलेले) आमदारही आपल्या जिल्ह्यात येवून आक्रमक आंदोलनाचे नेतृत्त्व करू शकतात याची जाणीव स्थानिक जनतेला झाली आहे. त्यामुळेच जिल्हा परिषदेतील बच्चू कडूंच्या आंदोलनाने यवतमाळकर जनता ‘इम्प्रेस’ झाली आहे. त्याचवेळी स्थानिक आमदारांना एवढ्या वर्षात असे एकही आंदोलन का करता आले नाही, असा सवाल मात्र प्रत्येकच जण एकमेकांना विचारताना दिसतो आहे. (जिल्हा प्रतिनिधी)