शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळचा पाणी प्रश्न जटील झाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 05:01 IST

यवतमाळ शहराला पाणीपुरवठा होत असलेल्या निळोणा आणि चापडोह प्रकल्पात शहरवासीयींची गरज पूर्ण होईल एवढा पाणीसाठा आहे. सुदैवाने या प्रकल्पांनी साथ दिली असली तरी प्राधिकरणाच्या नियोजनाने मात्र सोडली आहे. भर पावसाळ्यातही पाण्याचे वेळापत्रक प्राधिकरणाला पाळता आले नाही.

ठळक मुद्देवेळापत्रकाचे भानच नाही : संपूर्ण उन्हाळाभर चटके

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कारभाराने शहरवासीय त्रस्त झाले आहेत. पाणीपुरवठ्याच्या कोलमडलेल्या नियोजनामुळे संपूर्ण उन्हाळाभर नागरिकांना पाणीटंचाईचे चटके सोसावे लागत आहे. ठरलेल्या दिवशी नळाला पाणी आले, असे अपवादानेही घडले नाही. एवढेच नव्हे तर काही भागात आठ ते दहा दिवसाआड नळ येत आहे.यवतमाळ शहराला पाणीपुरवठा होत असलेल्या निळोणा आणि चापडोह प्रकल्पात शहरवासीयींची गरज पूर्ण होईल एवढा पाणीसाठा आहे. सुदैवाने या प्रकल्पांनी साथ दिली असली तरी प्राधिकरणाच्या नियोजनाने मात्र सोडली आहे. भर पावसाळ्यातही पाण्याचे वेळापत्रक प्राधिकरणाला पाळता आले नाही. खंडित वीज पुरवठा, लिकेज पाईपलाईन आदी कारणे त्यावेळी सांगितली गेली. उन्हाळ्यात तरी लोकांना पाण्यासाठी भटकावे लागणार नाही, अशी अपेक्षा होती, मात्र ती फोल ठरली.शहराच्या अनेक भागात असलेल्या खासगी स्रोतांनी तळ गाठला आहे. विहिरी, हातपंपांना पाणी नाही. अशावेळी प्राधिकरणाचे पाणी हा एकमेव प्रमुख स्रोत ठरतो. परंतु या विभागानेही लोकांचा हा प्रश्न गांभीर्याने घेतला नाही. शहरात अनेक ठिकाणी लिकेजचा प्रश्न निर्माण झाला आहे. विकास कामांच्या नावाखाली हे सर्व ढकलले जात आहे. एकदा काढण्यात आलेला बिघाड वारंवार निघतो. अर्थातच झालेले काम निकृष्ट राहिले हे स्पष्ट होते. काही ठिकाणी पाण्याचा प्रचंड प्रमाणात अपव्यय होताना दिसत आहे.अनेक लोकांकडे पाण्याची साठवणूक करण्यासाठी आवश्यक तेवढी साधने नाही. जास्तीत जास्त चार किंवा पाच दिवस पुरेल एवढेच पाणी ते साठवून ठेवू शकतात. अशावेळी निर्धारित काळात नळ येईल अशी अपेक्षा त्यांना असते. परंतु सात-आठ काही भागात तर नऊ-दहा दिवस लोटूनही पाणी येत नाही. त्रस्त झालेल्या नागरिकांनी प्राधिकरणाकडे वारंवार तक्रारी करूनही उपयोग होत नाही. नेमकी काय अडचण आहे हेसुद्धा स्पष्टपणे सांगितले जात नाही. थातुरमातूर कारण सांगून नागरिकांना परत पाठविले जाते. बहुतांश वेळा तर या विभागाचे जबाबदार अधिकारी उपलब्ध होत नसल्याची ओरड आहे.कमी दाबाने पाणीपुरवठायवतमाळ शहरातील काही भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नळ जाईपर्यंत दोन ते तीन हजार लिटर पाण्याचीही साठवणूक होत नाही. नागरिकांनी तक्रार केल्यानंतर कधीतरी एखादा कर्मचारी पाहून जातो. पुढे मात्र काहीही उपाययोजना होत नाही. अनेक भागात अमृत योजनेंतर्गत नवीन पाईपलाईन टाकण्यात आली आहे. त्यावर जुने कनेक्शन जोडण्याची गती गेली अनेक महिन्यांपासून अतिशय संथ आहे.

टॅग्स :water shortageपाणीकपात