शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
2
२ डॉक्टर अन् मशिदीच्या इमामासह ७ जणांना अटक, 'व्हाइट कॉलर' दहशतवाद्यांचा पर्दाफाश, पोलिसांनी केले धक्कादायक खुलासे
3
ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील 'हा' शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, वर्षात ५७% रिटर्न, अजूनही संधी?
4
SIP ने केले मालामाल! ५ वर्षांत २९ फंड्सचा २०% हून अधिक परतावा; 'मिड कॅप'ची जबरदस्त कामगिरी
5
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
6
मत फुटले तरी लंकेंनी नगरपंचायत राखली! पारनेरच्या नगराध्यक्षपदी डॉ. विद्या कावरे, मविआने उधळला विजयाचा गुलाल
7
'महेंद्र दळवी डोक्यावर पडलेले आमदार'; शिंदेंची शिवसेना-अजित पवारांच्या राष्ट्रवादीत संघर्षाचा भडका
8
आयटी क्षेत्रामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीची मोठी झेप; पण, टाटा समूहातील 'हा' शेअर भयावह घसरला
9
CSK ‘खिडकी’तून बाहेर काढणार असल्याची चर्चा! त्यातच जड्डू Insta वरून ‘गायब’
10
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
11
५ स्टार सेफ्टी रेटिंग अन् तब्बल ७५००० डिस्काउंट असणारी कार ह्युंदाईने वेबसाईटवरूनच काढून टाकली! विक्रीही बंद होणार?
12
भंगार विक्रीतून सरकार झालं मालमाल; इतक्या कमाईत खरेदी करू शकतात ७ वंदे भारत ट्रेन
13
Video - दारूने भरलेले ग्लास, तळलेले शेंगदाणे... बंगळुरूच्या सेंट्रल जेलमध्ये कैद्यांची जंगी पार्टी
14
सत्य साईबाबा: चमत्कारी जीवन, भक्तांमध्ये दिग्गज सेलिब्रेटी, आजही जगभर अनुयायी; काय होते वैशिष्ट्य?
15
भारतात लाँच होणार लठ्ठपणावरचं नवं औषध, कंपनीचा शेअर बनला रॉकेट; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
16
दिल्लीचे जवाहरलाल नेहरू स्टेडियम तोडले जाणार; केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचा मोठा निर्णय
17
भाजपाची त्सुनामी! १२२ पैकी १०७ जागा जिंकून ‘या’ ठिकाणी मिळवला मोठा विजय, काँग्रेसला २ जागा
18
रुपाली ठोंबरे पाटील, अमोल मिटकरींना अजित पवारांचा धक्का; राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून हटवलं
19
भोपाळमध्ये मॉडेल खुशबूचा संशयास्पद मृत्यू; आईनं लावला 'लव्ह जिहाद'चा आरोप, प्रियकराला अटक
20
आता घरबसल्या आधारकार्डमध्ये करा बदल; UIDAI कडून नवीन आधार अ‍ॅप लाँच, वैशिष्ट्ये पाहून शॉक व्हाल

जिल्हाभर पाणी पेटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 05:00 IST

गेल्या दीड महिन्यांपासून जिल्हा कोरोनाच्या समस्येला तोंड देत आहे. बाधितांची संख्या वाढल्याने जिल्ह्याचा थेट रेड झोनमध्ये समावेश झाला. कोरोनाच्या संकटाशी झुंज देत असताना आता जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट गडद झाले आहे. मागील वर्षी विलंब व उशिरा आलेल्या पावसाने नदी, नाले, प्रकल्प पूर्णपणे भरले नाही. भूगर्भातील जलपातळीही वाढली नाही. त्यामुळे जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे.

ठळक मुद्देनऊ टँकर, २०० विहिरी : दीड लाख नागरिकांना चटके

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गेल्या दीड महिन्यांपासून जिल्ह्यावर कोरोनाचे संकट घोंगावत आहे. या संकटातून बाहेर पडण्याआधीच जिल्ह्यावर पाणी टंचाईचे संकट गडद झाले आहे. सुमारे दीड लाख लोकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. तूर्तास जिल्ह्यात नऊ टँकर सुरू करण्यात आले असून १३२ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.गेल्या दीड महिन्यांपासून जिल्हा कोरोनाच्या समस्येला तोंड देत आहे. बाधितांची संख्या वाढल्याने जिल्ह्याचा थेट रेड झोनमध्ये समावेश झाला. कोरोनाच्या संकटाशी झुंज देत असताना आता जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट गडद झाले आहे. मागील वर्षी विलंब व उशिरा आलेल्या पावसाने नदी, नाले, प्रकल्प पूर्णपणे भरले नाही. भूगर्भातील जलपातळीही वाढली नाही. त्यामुळे जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे. कोरोनाशी दोन हात करीत असताना जनतेला पाणी समस्येलाही तोंड द्यावे लागत आहे. सध्या जिल्ह्यातील १३२ गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या गावातील जनतेला पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. यात महिलांची फरपट होत आहे.जिल्हा प्रशासनाने पाणीटंचाई दूर करण्यासाठी तूर्तास नऊ टँकर सुरू केले. त्यात पुसद तालुक्यातील लोहरा (खुर्द), लोहरा (ईजारा), बुटी (ई), आर्णी तालुक्यातील सुधाकरनगर, पाळोदी, चिमटा, घाटंजीतील ससानी आणि यवतमाळ तालुक्यातील इचोरी व जांभुळणी येथे टँंकर सुरू करण्यात आले. गेल्या वर्षी १४ मेपर्यंत जिल्ह्यात २३ टँकर सुरू होते.याशिवाय प्रशासनाने १३२ गावांमध्ये १३२ खासगी विहिरींचे अधिग्रहण करून पाणीटंचाईवर मात करण्याचा प्रयत्न चालविला आहे. यात आर्णी तालुक्यातील १९, महागाव ३९, घाटंजी चार, दिग्रस १६, पुसद २, उमरखेड ३०, वणी ३, यवतमाळ १३, दारव्हा १, केळापूर २ आणि झरी जामणी तालुक्यातील चार गावांचा समावेश आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत १९८ खासगी विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या होत्या. १३२ खासगी विहिरी अधिग्रहित करून एक लाख ३३ हजार २१८ नागरिकांची तहान भागविली जात आहे. टँकरद्वारे नऊ गावातील आठ हजार १४ लोकांना पाणी पुरविले जात आहे.महिलांना करावी लागते पायपीटपाण्यासाठी ग्रामीण भागातील महिलांना पायपीट करावी लागत आहे. टँकर सुरू असलेल्या काही गावांमध्ये टँकरने विहिरीत पाणी सोडले जाते. विहिरीतून पाणी उपसण्यासाठी महिलांची एकच झुंबड उडते. पुसद तालुक्यातील माळपठार पाणी पुरवठा योजना कुचकामी ठरली आहे. या परिसरातील लोहरा (खुर्द) येथे एकाच विहिरीवर पाणी भरण्यासाठी महिलांची मोठी गर्दी होते. या गर्दीमुळे कोरोना संसर्गाची भीती आहे. 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीकपात