शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
2
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
3
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
4
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
5
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
6
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
7
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
8
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
9
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
10
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
11
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
12
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
13
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
14
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
15
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
16
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
17
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
18
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
19
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
20
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...

जिल्हाभर पाणी पेटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 05:00 IST

गेल्या दीड महिन्यांपासून जिल्हा कोरोनाच्या समस्येला तोंड देत आहे. बाधितांची संख्या वाढल्याने जिल्ह्याचा थेट रेड झोनमध्ये समावेश झाला. कोरोनाच्या संकटाशी झुंज देत असताना आता जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट गडद झाले आहे. मागील वर्षी विलंब व उशिरा आलेल्या पावसाने नदी, नाले, प्रकल्प पूर्णपणे भरले नाही. भूगर्भातील जलपातळीही वाढली नाही. त्यामुळे जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे.

ठळक मुद्देनऊ टँकर, २०० विहिरी : दीड लाख नागरिकांना चटके

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गेल्या दीड महिन्यांपासून जिल्ह्यावर कोरोनाचे संकट घोंगावत आहे. या संकटातून बाहेर पडण्याआधीच जिल्ह्यावर पाणी टंचाईचे संकट गडद झाले आहे. सुमारे दीड लाख लोकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. तूर्तास जिल्ह्यात नऊ टँकर सुरू करण्यात आले असून १३२ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.गेल्या दीड महिन्यांपासून जिल्हा कोरोनाच्या समस्येला तोंड देत आहे. बाधितांची संख्या वाढल्याने जिल्ह्याचा थेट रेड झोनमध्ये समावेश झाला. कोरोनाच्या संकटाशी झुंज देत असताना आता जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट गडद झाले आहे. मागील वर्षी विलंब व उशिरा आलेल्या पावसाने नदी, नाले, प्रकल्प पूर्णपणे भरले नाही. भूगर्भातील जलपातळीही वाढली नाही. त्यामुळे जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे. कोरोनाशी दोन हात करीत असताना जनतेला पाणी समस्येलाही तोंड द्यावे लागत आहे. सध्या जिल्ह्यातील १३२ गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या गावातील जनतेला पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. यात महिलांची फरपट होत आहे.जिल्हा प्रशासनाने पाणीटंचाई दूर करण्यासाठी तूर्तास नऊ टँकर सुरू केले. त्यात पुसद तालुक्यातील लोहरा (खुर्द), लोहरा (ईजारा), बुटी (ई), आर्णी तालुक्यातील सुधाकरनगर, पाळोदी, चिमटा, घाटंजीतील ससानी आणि यवतमाळ तालुक्यातील इचोरी व जांभुळणी येथे टँंकर सुरू करण्यात आले. गेल्या वर्षी १४ मेपर्यंत जिल्ह्यात २३ टँकर सुरू होते.याशिवाय प्रशासनाने १३२ गावांमध्ये १३२ खासगी विहिरींचे अधिग्रहण करून पाणीटंचाईवर मात करण्याचा प्रयत्न चालविला आहे. यात आर्णी तालुक्यातील १९, महागाव ३९, घाटंजी चार, दिग्रस १६, पुसद २, उमरखेड ३०, वणी ३, यवतमाळ १३, दारव्हा १, केळापूर २ आणि झरी जामणी तालुक्यातील चार गावांचा समावेश आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत १९८ खासगी विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या होत्या. १३२ खासगी विहिरी अधिग्रहित करून एक लाख ३३ हजार २१८ नागरिकांची तहान भागविली जात आहे. टँकरद्वारे नऊ गावातील आठ हजार १४ लोकांना पाणी पुरविले जात आहे.महिलांना करावी लागते पायपीटपाण्यासाठी ग्रामीण भागातील महिलांना पायपीट करावी लागत आहे. टँकर सुरू असलेल्या काही गावांमध्ये टँकरने विहिरीत पाणी सोडले जाते. विहिरीतून पाणी उपसण्यासाठी महिलांची एकच झुंबड उडते. पुसद तालुक्यातील माळपठार पाणी पुरवठा योजना कुचकामी ठरली आहे. या परिसरातील लोहरा (खुर्द) येथे एकाच विहिरीवर पाणी भरण्यासाठी महिलांची मोठी गर्दी होते. या गर्दीमुळे कोरोना संसर्गाची भीती आहे. 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीकपात