शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

जिल्हाभर पाणी पेटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 05:00 IST

गेल्या दीड महिन्यांपासून जिल्हा कोरोनाच्या समस्येला तोंड देत आहे. बाधितांची संख्या वाढल्याने जिल्ह्याचा थेट रेड झोनमध्ये समावेश झाला. कोरोनाच्या संकटाशी झुंज देत असताना आता जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट गडद झाले आहे. मागील वर्षी विलंब व उशिरा आलेल्या पावसाने नदी, नाले, प्रकल्प पूर्णपणे भरले नाही. भूगर्भातील जलपातळीही वाढली नाही. त्यामुळे जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे.

ठळक मुद्देनऊ टँकर, २०० विहिरी : दीड लाख नागरिकांना चटके

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गेल्या दीड महिन्यांपासून जिल्ह्यावर कोरोनाचे संकट घोंगावत आहे. या संकटातून बाहेर पडण्याआधीच जिल्ह्यावर पाणी टंचाईचे संकट गडद झाले आहे. सुमारे दीड लाख लोकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. तूर्तास जिल्ह्यात नऊ टँकर सुरू करण्यात आले असून १३२ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.गेल्या दीड महिन्यांपासून जिल्हा कोरोनाच्या समस्येला तोंड देत आहे. बाधितांची संख्या वाढल्याने जिल्ह्याचा थेट रेड झोनमध्ये समावेश झाला. कोरोनाच्या संकटाशी झुंज देत असताना आता जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट गडद झाले आहे. मागील वर्षी विलंब व उशिरा आलेल्या पावसाने नदी, नाले, प्रकल्प पूर्णपणे भरले नाही. भूगर्भातील जलपातळीही वाढली नाही. त्यामुळे जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे. कोरोनाशी दोन हात करीत असताना जनतेला पाणी समस्येलाही तोंड द्यावे लागत आहे. सध्या जिल्ह्यातील १३२ गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या गावातील जनतेला पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. यात महिलांची फरपट होत आहे.जिल्हा प्रशासनाने पाणीटंचाई दूर करण्यासाठी तूर्तास नऊ टँकर सुरू केले. त्यात पुसद तालुक्यातील लोहरा (खुर्द), लोहरा (ईजारा), बुटी (ई), आर्णी तालुक्यातील सुधाकरनगर, पाळोदी, चिमटा, घाटंजीतील ससानी आणि यवतमाळ तालुक्यातील इचोरी व जांभुळणी येथे टँंकर सुरू करण्यात आले. गेल्या वर्षी १४ मेपर्यंत जिल्ह्यात २३ टँकर सुरू होते.याशिवाय प्रशासनाने १३२ गावांमध्ये १३२ खासगी विहिरींचे अधिग्रहण करून पाणीटंचाईवर मात करण्याचा प्रयत्न चालविला आहे. यात आर्णी तालुक्यातील १९, महागाव ३९, घाटंजी चार, दिग्रस १६, पुसद २, उमरखेड ३०, वणी ३, यवतमाळ १३, दारव्हा १, केळापूर २ आणि झरी जामणी तालुक्यातील चार गावांचा समावेश आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत १९८ खासगी विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या होत्या. १३२ खासगी विहिरी अधिग्रहित करून एक लाख ३३ हजार २१८ नागरिकांची तहान भागविली जात आहे. टँकरद्वारे नऊ गावातील आठ हजार १४ लोकांना पाणी पुरविले जात आहे.महिलांना करावी लागते पायपीटपाण्यासाठी ग्रामीण भागातील महिलांना पायपीट करावी लागत आहे. टँकर सुरू असलेल्या काही गावांमध्ये टँकरने विहिरीत पाणी सोडले जाते. विहिरीतून पाणी उपसण्यासाठी महिलांची एकच झुंबड उडते. पुसद तालुक्यातील माळपठार पाणी पुरवठा योजना कुचकामी ठरली आहे. या परिसरातील लोहरा (खुर्द) येथे एकाच विहिरीवर पाणी भरण्यासाठी महिलांची मोठी गर्दी होते. या गर्दीमुळे कोरोना संसर्गाची भीती आहे. 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीकपात