शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
2
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
3
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
6
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
7
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
8
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
9
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
10
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
11
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
12
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
17
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
18
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
19
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
20
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा

दोन कोटींच्या मोबदल्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर जप्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2022 17:09 IST

वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्ग : वाढीव मोबदला प्रकरण

यवतमाळ : वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गासाठी २०१६ मध्ये तिवारी यांची शेतजमीन हस्तगत करण्यात आली. २०१७ मध्ये जमिनीचे हस्तांतरण झालेे. जमिनीला मोजकाच मोबदला मिळाला. यामुळे भूमी संपादन प्राधिकरणाकडे न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. यावर न्यायालयाने वाढीव मोबदल्यासाठी आदेश काढले. यानंतरही मोबदला न मिळाल्याने जप्तीची कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. दोन कोटींच्या मोबदला प्रकरणात एक महिन्याचा अवधी जिल्हा प्रशासनाकडून मागण्यात आला. यामुळे तूर्त जिल्हा प्रशासनाची नामुष्की टळली आहे.

यवतमाळ येथील कुलभूषण तिवारी, प्रमोद तिवारी, प्रकाश तिवारी, प्रभात तिवारी, जितेंद्र तिवारी, विवेक तिवारी यांची १६ आर. जमीन नांदेड-वर्धा-यवतमाळ मार्गाच्या भूसंपादनासाठी हस्तांतरित करण्यात आली. या जमिनीचा मोजकाच मोबदला मिळाल्याने तिवारी यांनी नागपूरच्या भूमी संपादन प्राधिकरणाकडे वाढीव मोबदल्यासाठी प्रकरण दाखल केले. २९ जानेवारी २०२१ ला न्यायालयाने एक कोटी ५० लाख रुपयांचा मूळ मोबदला आणि व्याजासह ही संपूर्ण रक्कम दोन कोटी २२ लाख ६७ हजार ७२८ रुपये देण्याचे आदेश दिले. तीन महिन्यांत ही रक्कम शेतकऱ्यांना देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. मात्र, तिवारी यांना मोबदला मिळाला नाही.

यामुळे तिवारी यांनी यवतमाळच्या दिवाणी न्यायालयात मोबदला मिळविण्यासाठी बरखास्त प्रकरण दाखल केले. न्यायालयाच्या नोटिसीनंतर जिल्हा प्रशासनाकडून, रेल्वेकडून कारवाई झाली नाही. यामुळे कोर्टाने मंगळवारी जप्तीचे आदेश काढले. यात जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध साहित्यांचा समावेश होता. त्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीसह इतर पाच खुर्च्या जप्त करण्यात आल्या. यानंतर सुपूर्दनाम्यावर त्या परत जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या. या प्रकरणात जिल्हा प्रशासनाकडून एक महिन्याची मुदत मागण्यात आली आहे. या कालावधीत शेतकऱ्यांना मोबदला देऊ, असे आश्वासन जिल्हा प्रशासनाकडून शेतकऱ्यांना देण्यात आले. यावेळी ॲड. अभिजित मानेकर, ॲड. हेमंत भुमरे आणि बेलिफ धर्मेंद्र बी. इंगाेले उपस्थित होते.

बुधवारी मध्य रेल्वेच्या कार्यालयावर जप्ती

या प्रकरणात मोबदला मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी नागपूरमध्ये मध्य रेल्वेच्या विभागीय कार्यालयावरही जप्ती आणली आहे. बुधवारी वाढीव मोबदल्यासाठी जप्तीची कारवाई केली जाणार आहे.

धोरणात्मक निर्णयाची गरज

भूसंपादन प्रकरणामध्ये अनेकवेळा रक्कम देताना दिरंगाई होते. या प्रकरणात शेतकऱ्याला नाहक विविध अडचणींचा सामना करावा लागतो. या काळात मूळ रकमेवर मोठ्या प्रमाणात व्याज चढते. मूळ रकमेपेक्षा व्याजाची रक्कम मोठी होते. अनेकवेळा इतर कारणांनीदेखील दिरंगाई झाल्याने सरकारच्या तिजोरीवर मोठा आर्थिक भार पडतो. या प्रकरणात संबंधित विभागाने वसुलीचा निपटारा लवकर केला तर सरकारच्या तिजोरीवरील कोट्यवधींचा भार कमी होईल आणि शेतकऱ्यांना तत्काळ दिलासा मिळेल. यासाठी अधिवेशन काळामध्ये सरकारने धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे. लोकसभेत आणि विधानसभा अधिवेशन सुरू आहे. या काळात लोकप्रतिनिधींनी धोरणात्मक निर्णय घेतला तर शेतकऱ्यांना त्याचा दिलासा मिळेल. यामुळे सरकारची आणि अधिकाऱ्यांची समाजात होणारी नाचक्की टळेल. यासाठी सरकारकडून लवकरात लवकर पाऊले उचलली गेली तर सरकारचा आर्थिक भार कमी होईल आणि भूसंपादन प्रकरणात प्रत्येकाचा वेळ वाचेल. त्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.

टॅग्स :Courtन्यायालयFarmerशेतकरीYavatmalयवतमाळ