शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

दोन कोटींच्या मोबदल्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर जप्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2022 17:09 IST

वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्ग : वाढीव मोबदला प्रकरण

यवतमाळ : वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गासाठी २०१६ मध्ये तिवारी यांची शेतजमीन हस्तगत करण्यात आली. २०१७ मध्ये जमिनीचे हस्तांतरण झालेे. जमिनीला मोजकाच मोबदला मिळाला. यामुळे भूमी संपादन प्राधिकरणाकडे न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. यावर न्यायालयाने वाढीव मोबदल्यासाठी आदेश काढले. यानंतरही मोबदला न मिळाल्याने जप्तीची कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. दोन कोटींच्या मोबदला प्रकरणात एक महिन्याचा अवधी जिल्हा प्रशासनाकडून मागण्यात आला. यामुळे तूर्त जिल्हा प्रशासनाची नामुष्की टळली आहे.

यवतमाळ येथील कुलभूषण तिवारी, प्रमोद तिवारी, प्रकाश तिवारी, प्रभात तिवारी, जितेंद्र तिवारी, विवेक तिवारी यांची १६ आर. जमीन नांदेड-वर्धा-यवतमाळ मार्गाच्या भूसंपादनासाठी हस्तांतरित करण्यात आली. या जमिनीचा मोजकाच मोबदला मिळाल्याने तिवारी यांनी नागपूरच्या भूमी संपादन प्राधिकरणाकडे वाढीव मोबदल्यासाठी प्रकरण दाखल केले. २९ जानेवारी २०२१ ला न्यायालयाने एक कोटी ५० लाख रुपयांचा मूळ मोबदला आणि व्याजासह ही संपूर्ण रक्कम दोन कोटी २२ लाख ६७ हजार ७२८ रुपये देण्याचे आदेश दिले. तीन महिन्यांत ही रक्कम शेतकऱ्यांना देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. मात्र, तिवारी यांना मोबदला मिळाला नाही.

यामुळे तिवारी यांनी यवतमाळच्या दिवाणी न्यायालयात मोबदला मिळविण्यासाठी बरखास्त प्रकरण दाखल केले. न्यायालयाच्या नोटिसीनंतर जिल्हा प्रशासनाकडून, रेल्वेकडून कारवाई झाली नाही. यामुळे कोर्टाने मंगळवारी जप्तीचे आदेश काढले. यात जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध साहित्यांचा समावेश होता. त्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीसह इतर पाच खुर्च्या जप्त करण्यात आल्या. यानंतर सुपूर्दनाम्यावर त्या परत जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या. या प्रकरणात जिल्हा प्रशासनाकडून एक महिन्याची मुदत मागण्यात आली आहे. या कालावधीत शेतकऱ्यांना मोबदला देऊ, असे आश्वासन जिल्हा प्रशासनाकडून शेतकऱ्यांना देण्यात आले. यावेळी ॲड. अभिजित मानेकर, ॲड. हेमंत भुमरे आणि बेलिफ धर्मेंद्र बी. इंगाेले उपस्थित होते.

बुधवारी मध्य रेल्वेच्या कार्यालयावर जप्ती

या प्रकरणात मोबदला मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी नागपूरमध्ये मध्य रेल्वेच्या विभागीय कार्यालयावरही जप्ती आणली आहे. बुधवारी वाढीव मोबदल्यासाठी जप्तीची कारवाई केली जाणार आहे.

धोरणात्मक निर्णयाची गरज

भूसंपादन प्रकरणामध्ये अनेकवेळा रक्कम देताना दिरंगाई होते. या प्रकरणात शेतकऱ्याला नाहक विविध अडचणींचा सामना करावा लागतो. या काळात मूळ रकमेवर मोठ्या प्रमाणात व्याज चढते. मूळ रकमेपेक्षा व्याजाची रक्कम मोठी होते. अनेकवेळा इतर कारणांनीदेखील दिरंगाई झाल्याने सरकारच्या तिजोरीवर मोठा आर्थिक भार पडतो. या प्रकरणात संबंधित विभागाने वसुलीचा निपटारा लवकर केला तर सरकारच्या तिजोरीवरील कोट्यवधींचा भार कमी होईल आणि शेतकऱ्यांना तत्काळ दिलासा मिळेल. यासाठी अधिवेशन काळामध्ये सरकारने धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे. लोकसभेत आणि विधानसभा अधिवेशन सुरू आहे. या काळात लोकप्रतिनिधींनी धोरणात्मक निर्णय घेतला तर शेतकऱ्यांना त्याचा दिलासा मिळेल. यामुळे सरकारची आणि अधिकाऱ्यांची समाजात होणारी नाचक्की टळेल. यासाठी सरकारकडून लवकरात लवकर पाऊले उचलली गेली तर सरकारचा आर्थिक भार कमी होईल आणि भूसंपादन प्रकरणात प्रत्येकाचा वेळ वाचेल. त्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.

टॅग्स :Courtन्यायालयFarmerशेतकरीYavatmalयवतमाळ