शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

रेड झोन गावांना पुनर्वसनाची प्रतीक्षा

By admin | Updated: June 9, 2014 00:10 IST

पैनगंगा नदी तीरावर असलेल्या पूरग्रस्त गावांचे पुनर्वसन गेल्या कित्येक वर्षांपासून रखडले आहे. पावसाळा आला की कागदी घोडे नाचविले जातात. मात्र पुनर्वसन होत नाही. तालुक्यातील रेडझोनमधील अनेक

उमरखेड (कुपटी) : पैनगंगा नदी तीरावर असलेल्या पूरग्रस्त गावांचे पुनर्वसन गेल्या कित्येक वर्षांपासून रखडले आहे. पावसाळा आला की कागदी घोडे नाचविले जातात. मात्र पुनर्वसन होत नाही. तालुक्यातील रेडझोनमधील अनेक गावांना पुनर्वसनाची प्रतीक्षा कायम आहे. लोकप्रतिनिधी आणि अधिकारीही दुर्लक्ष करीत असल्याने पावसाळ्यात ही मंडळी जीव मुठीत घेऊन राहत आहे. उमरखेड तालुक्यातील बहुतांश गावे पैनगंगेच्या तीरावर आहे. दरवर्षी पैनगंगेला पूर येतो. डझनावर गावांना पुराचा तडाखा बसतो. अनेक गावातील नागरिक महापुराच्या वेढय़ात अकडून पडतात. कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते. मात्र पुनर्वसनाचा प्रश्न तसाच रेंगाळत राहतो. तालुक्यातील पळशी, देवसरी, संगम चिंचोली येथील नागरिकांना २00६ साली महापुराचा फटका बसला. त्यानंतर पुनवर्सनाची आश्‍वासन देण्यात आले. १९५८ पासून २00६ पर्यंंत पुनर्वसनासाठी पाठपुरावा करण्यात आला. परंतु पुनर्वसन झाले नाही. पळशी, देवसरी, संगमचिंचोली या गावांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया लालफितीत अडकली आहे. खरे तर २00६ च्या महापुरानंतर तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी वर्षभरात पुनर्वसन करण्याचे आश्‍वासन दिले होते. परंतु आता आठ पावसाळे झाले तरी पुनर्वसन झालेच नाही. अतवृष्टी आणि इसापूर धरणातील अतिरिक्त पाणी सोडण्यात येत असल्याने पैनगंगेला महापूर येतो. शेकडो एकर जमीन बाधित होते. नागरिक यात उद्ध्वस्त होतात. पुनर्वनासाठी अनेकदा उपोषणासह आंदोलने करण्यात आली. प्रत्येक वेळी राजकीय मंडळींनी आश्‍वासने दिली. प्रशासनाने त्यावेळी मान डोलावली. परंतु कुणीही लक्ष दिले नाही. रेडझोनमधील गावांना महापुराचा फटका बसणार नाही, यासाठी कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नाही. पळशी, चिंचोली, मार्लेगाव, चातारी, देवसरी, खरूस, बंदी टाकळी, गाडीबोरी आदी गावांना महापुराचा फटका बसतो. यावर्षी पुन्हा पावसाळा तोंडावर आला आहे. मृग नक्षत्र सुरू झाले आहे. लवकरच पावसालाही सुरुवात होईल. नदी तिरावरील गावांमध्ये पुन्हा पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर येणार आहे. (वार्ताहर)