शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
3
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
4
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
5
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
6
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
7
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
8
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
9
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
10
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
11
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
12
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
13
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
14
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
15
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 
16
'शिंदेंसोबत जायला मी विरोध केला होता'; गजानन किर्तीकरांच्या पत्नीने मांडली रोखठोक भूमिका
17
...अन् अचानक तरुण झाला कोट्यधीश; खात्यात आले 9900 कोटी, बँक मॅनेजरही हैराण
18
"ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे...", अभिनेत्री वैशाली भोसलेला मतदान करता न आल्यामुळे व्यक्त केला संताप
19
अहमदाबाद विमानतळावर मोठी कारवाई, इस्लामिक स्टेटचे ४ दहशतवादी पकडले, श्रीलंकेचे कनेक्शन उघड
20
Maharashtra HSC 12th Result 2024 राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: उद्या १२ वीचा निकाल जाहीर होणार

दुसरा दिवसही अवकाळीचाच, शेतकऱ्यांत धडकी कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 2:51 PM

पाच लाख हेक्टरवरील कापसाची केली पावसाने माती

यवतमाळ : जिल्ह्यातील शेतीवर अवकाळी पावसाचे संकट ओढवले आहे. सलग दुसऱ्या दिवशी पावसाचा कहर सुरूच होता. जिल्हाभरात मंगळवारी १६ मिमी. पावसाची नोंद झाली. त्यातही उमरखेड व पुसद उपविभागात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. जवळपास ५ लाख हेक्टरवरील कापसाचे पीक जमीनदोस्त झाले आहे. कापूस पावसात भिजल्याने त्याची प्रतवारी खराब झाली आहे. हवामान खात्याने आणखीन पुढील काही दिवस पावसाचा जोर सांगितल्याने शेतकऱ्यांमध्ये धडकी भरली आहे.

सरकारी शिरस्त्याप्रमाणे मंत्रालय स्तरावरून कृषी विभागाला नुकसानीचा पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत. सध्या गारठवून टाकणारी थंडी व वादळी वारा असल्याने कृषी विभागाची यंत्रणा शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचलेली नाही. यापूर्वी नैसर्गिक संकटात झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्यात आले. त्या मोबदल्यात मात्र शेतकऱ्यांना एक छदामही मिळालेला नाही. हक्काचा पीक विमासुद्धा देण्यात आला नाही. आता रब्बी हंगामात या अवकाळी पावसाचे नवे संकट उभे ठाकले आहे. अशा स्थितीत सरकारी यंत्रणा व राज्य शासन शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी पुढे येताना दिसत नाही. कापूस, तूर, कांदा, संत्रा या सर्वच प्रमुख पिकांचा हंगाम हातचा गेला आहे. कापूस ओला झाल्याने सरकीला कोंब फुटण्याचा धोका आहे. तुरीला फुले व कळ्या लागलेल्या असून, त्यावर या वातावरणात बुरशीचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त होत आहे. अशा संकटात शेतकरी सापडला आहे.

जिल्ह्यात १६ मिमी. पावसाची नोंद

n पहाटे ८ पर्यंत १६ मिमी. पावसाची नोंद करण्यात आली. त्यात सर्वाधिक ५७ मिमी. पाऊस पुसद तालुक्यात पडला. यामुळे या ठिकाणच्या नदीनाल्यांना पूर आला. वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. याशिवाय या भागातील पिकांना मोठा फटका बसला. यवतमाळ शहरात १२ मिमी. पाऊस नाेंदविण्यात आला. बाभूळगाव १८, कळंब ७, दारव्हा २८, दिग्रस २६, आर्णी १२, नेर ३६, उमरखेड २, महागाव ३२, वणी १२, महागाव ५, झरी ६, केळापूर ३, घाटंजी २, राळेगाव ४ मिमी. पावसाची नोंद करण्यात आली.

टॅग्स :environmentपर्यावरणRainपाऊसYavatmalयवतमाळ