शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
8
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
9
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
10
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
11
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
12
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
13
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
14
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
15
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
16
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
17
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
18
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
19
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
20
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल

खाण परिसरात दोन वाघांचा वावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2018 10:43 PM

तालुक्याच्या पूर्व भागातील वेकोलिच्या खाण परिसरात दोन वाघांचा संचार होत असल्याने मागील दोन महिन्यापासून नागरिक दहशतीखाली वावरत आहे. वाघाच्या भितीने श्ेताकऱ्यांना कामासाठी मजुर मिळणे अवघड झाले असून शेतकऱ्यांना स्वत:च्या शेतात एकटेदुकटे जाण्यास भीती वाटत आहे.

ठळक मुद्देनागरिक भयभीत : शेतकऱ्यांना मजूर मिळण्याची अडचण

विनोद ताजने ।लोकमत न्यूज नेटवर्कवणी : तालुक्याच्या पूर्व भागातील वेकोलिच्या खाण परिसरात दोन वाघांचा संचार होत असल्याने मागील दोन महिन्यापासून नागरिक दहशतीखाली वावरत आहे. वाघाच्या भितीने श्ेताकऱ्यांना कामासाठी मजुर मिळणे अवघड झाले असून शेतकऱ्यांना स्वत:च्या शेतात एकटेदुकटे जाण्यास भीती वाटत आहे.तालुक्याच्या पूर्व भागात वेकोलिच्या पाच ते सहा खुल्या कोळसा खाणी आहेत. खाणीच्या मानवनिर्मीत दºया व मातीच्या ढिगाऱ्याचे डोंगर झाले आहे. या डोंगरावर झुडूपे वाढल्याने जंगल सदृश्य परिसर बनला आहे. लागूनच केसुर्ली व शेवाळांचे जंगलही आहे. त्यामुळे येथे दोन वाघांनी आपले बस्तान मांडले आहे. मागील दोन महिन्यापासून अनेकांना या वाघांनी दर्शन दिले आहेत. काही दिवसांपूर्वी शिरपूर परिसरात हा वाघ लोकांनी पाहिला. महिनाभरापूर्वीच सुंदरनगरच्या शाळेजवळ भरदिवसा हा वाघ येऊन गेला. आता दोन दिवसांपूर्वी कोलारपिंपरी खाण परिसरात अनेकांनी या पट्टेदार वाघाला पाहिले. या वाघांनी आतापर्यंत माणसांवर हल्ला केला नसला तरी अनेक जनावरांना फस्त केले आहे.मागील आठवड्यातच केसुर्ली जंगलात दोन गायींना वाघाने ठार मारले. १५ दिवसांपूर्वी उकणी परिसरात एक गोऱ्हा वाघाने मारला, तर अनेक जनावरांवर हल्ले करून जखमी केले आहे. गुराख्यांनीही अनेकदा वाघ बघितले आहे. नागरिकांच्या तक्रारीनंतर येथील वनविभागाने केसुर्ली व निलजई परिसरात ट्रॅप कॅमेरे लावले. या कॅमेऱ्यातही हे दोन्ही वाघ टिपले गेले, अशी माहिती वनविभागाचे अधिकारी पटवारी यांनी दिली. मात्र वरिष्ठ पातळीवरून या वाघांना पकडण्याचे कोणतेही आदेश न आल्याने वाघांना पकडता येत नाही. त्यामुळे या परिसरातील नागरिक, गुराखी, शेतकऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना वनविभागाने दिल्या आहेत. तसेच ठिकठिकाणी वनविभागाचे कर्मचारी तैनात करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. शेतात फुटून असलेला कापूस वेचण्यासाठी मजूर धजावत नसल्याने शेतकºयांमध्ये चिंता पसरली आहे.वेकोलि कर्मचाऱ्यांमध्ये धास्तीवेकोलिमध्ये तीन पाळ्यांमध्ये काम सुरू असते. त्यामुळे कर्मचारी व कामगारांना रात्रपाळीतही कामावर जावे लागते. परंतु वाघाच्या संचारामुळे वेकोलि कामगारांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. कामगारांनी रात्रीच्यावेळी एकटे-दुकटे येण्याचे टाळावे, अशा सूचना वेकोलि प्रशासनाने कामगारांना देण्याची गरज असल्याचे येथील उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :Tigerवाघ