शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
3
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
4
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
5
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
6
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
7
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
8
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
9
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
10
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
11
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
12
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
13
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
14
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
15
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
16
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
17
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
18
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
19
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
20
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 

दोन वेच्यातच शेताची उलंगवाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2018 10:00 PM

यंदा ऐनवेळी पावसाने दगा दिल्याने कोरडवाहू शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे ठाकले आहे. एक ते दोन वेच्यातच शेताची उलंगवाडी होत आहे. सोयाबीन आणि तूर पिकाचीही अवस्था बिकट असून यावर्षी उत्पादन अर्ध्यावर होणार असल्याने शेतकऱ्यांना चांगलाच आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देउत्पादन अर्ध्यावर : सोयाबीन, कापूस, तुरीला अल्प पावसाचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : यंदा ऐनवेळी पावसाने दगा दिल्याने कोरडवाहू शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे ठाकले आहे. एक ते दोन वेच्यातच शेताची उलंगवाडी होत आहे. सोयाबीन आणि तूर पिकाचीही अवस्था बिकट असून यावर्षी उत्पादन अर्ध्यावर होणार असल्याने शेतकऱ्यांना चांगलाच आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.यावर्षी सुरूवातीपासूनच चांगला पाऊस पडल्याने पिकांची वाढ समाधानकारक झाली. मात्र दसरा सणाच्या पूर्वी एखादा मोठा पावसाचा ठोक पिकांच्या वाढीसाठी आवश्यक होता. मात्र तो न आल्याने आता कपाशीची झाडे सुकू लागली आहेत. पाऊस चांगला झाल्यास कोरडवाहू शेतकऱ्यांना तीन ते चारवेळा कापसाचा वेचा करावा लागतो. मात्र यंदा पावसाने कापूस उत्पादकांचे सारे गणितच बिघडवून टाकले आहे.मागील वर्षी बोंडअळीच्या प्रकोपाचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागला. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी उद्वीग्न होऊन आपल्या शेतातील हिरव्यागार कपाशीवर नांगर फिरवून पीक उद्ध्वस्त केले. मात्र त्यातूनही स्वत:ला सावरत शेतकऱ्यांनी यावर्षी हंगामाची तयारी केली. हवामान खात्याच्या अंदाजानुसार अगदी वेळेवर पावसाला सुरूवात झाली. शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपल्या. मात्र नंतर गरजेच्यावेळी पावसाने पुन्हा दडी मारली. परिणामी अनेक शेतकऱ्यांना दुबार, तिबार पेरणी करावी लागली. त्यानंतर मात्र पावसाने साथ दिल्याने शेतकरी सावरला. शेतात हिरवीगार पिके डोलू लागली. बोंडअळीचे संकट फारसे न आल्याने शेतकरी आनंदी होता. गरज होती ती एका मोठ्या पावसाची. मात्र परतीच्या पावसानेही शेतकऱ्यांना दगा दिला. या भागात परतीचा पाऊसदेखील हवा तसा कोसळला नाही. त्यामुळे शेतातील ओल कमी होऊन आता कपाशीची झाडे सुकू लागली आहे. अनेक शेतकऱ्यांनी केवळ एकच वेचा केला. त्यांचे उत्पादन अर्ध्यावर आले. एकीकडे शेतकरी संकटात असताना दुसरीकडे मात्र वणी तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यासंबंधाने सरकारने अद्यापही पाऊल न उचलल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष आहे. दिवाळीच्या सणामुळे शेतकऱ्यांनी व्यापारी मागेल त्या भावात कापसाची विक्री केली. सोयाबीन, तुरीचेदेखील तेच हाल झालेत. अनेक शिवारे आता पिकांअभावी ओस दिसू लागली आहे. ओलित करणाºया शेतकऱ्यांत बोंडअळीची भीती अद्यापही आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती