शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

भूमाफियांविरूद्ध अखेर पोलिसात तीन तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 21:40 IST

शहर व परिसरातील बेवारस भूखंड परस्पर विक्री करणाऱ्या भूमाफियांविरोधात पोलिसांकडे अखेर तीन तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती असून त्यात दूध विक्रेत्याचाही समावेश आहे. त्याद्वारे भूमाफियांशिवाय आणखी कुणा-कुणाविरोधात गुन्हे दाखल होतात, याकडे नजरा लागल्या आहेत.

ठळक मुद्देबॅँकांमध्येही खळबळ : बेवारस भूखंडांची परस्पर विक्री रडारवर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहर व परिसरातील बेवारस भूखंड परस्पर विक्री करणाऱ्या भूमाफियांविरोधात पोलिसांकडे अखेर तीन तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती असून त्यात दूध विक्रेत्याचाही समावेश आहे. त्याद्वारे भूमाफियांशिवाय आणखी कुणा-कुणाविरोधात गुन्हे दाखल होतात, याकडे नजरा लागल्या आहेत.यवतमाळ शहरात बेवारस भूखंडांची संख्या बरीच आहे. या भूखंडांचे मालक बाहेरगावी राहतात, वर्षानुवर्षे यवतमाळात येत नाहीत. असे भूखंड प्रॉपर्टी ब्रोकर्सने हेरुन भूमाफियांना त्याची माहिती दिली. या माफियांनी खोटे विक्रेते, खरेदीदार उभे करून संबंधित तमाम शासकीय यंत्रणेला हाताशी धरत या भूखंड विक्रीचे व्यवहार केले. हेच भूखंड किंमत वाढवून येथील काही बँकांमध्ये तारण ठेवले गेले. त्यावर कोट्यवधींचे कर्ज उचलून हिस्सेवाटणी केली गेली. या कर्जातील काही वाटा बँकांमधील संबंधित आॅथिरीटींनासुद्धा मिळाल्याचे सांगितले जाते.भूमाफियांच्या या टोळीत एका राकेशने महत्वाची भूमिका वठविली. तो काही महिन्यांपासून चार ते पाच कोटी रुपये घेऊन फरार असल्याचे सांगितले जाते. याच राकेशने शहरातील एका नामांकित दूध विक्रेत्यासह बँकेलाही संदीप टॉकीज परिसरातील दुकान गाळ्यांच्या विक्रीप्रकरणात चुना लावला. अखेर या दूध विक्रेत्याने पोलिसांकडे तक्रार नोंदविली आहे. याशिवाय आणखी दोन तक्रारदार पोलिसांपुढे आल्याचे सांगितले जाते. पोलीस अनेक दिवसांपासून या प्रकरणावर वॉच ठेऊन आहे. आतापर्यंत बरीच चौकशीही झाली आहे. आता प्रत्यक्ष गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस आणखी किती वेळ घेतात याकडे नजरा लागल्या आहेत. राकेशला फसवणुकीचा हा मार्ग दाखविणारा त्याचा साथीदार तर राकेशपूर्वीच फरार झाल्याचे सांगण्यात येते.५० लाखांच्या प्रॉपर्टीवर चक्क सहा कोटींचे कर्जबेवारस भूखंड विक्रीच्या या व्यवहारात काही बँका सहभागी आहेत. काही प्रकरणात मालकांचे कन्सेन्ट आहे. तर काही प्रकरणात तेथील अधिकाºयांनी मालकांना अंधारात ठेऊन स्वत:च मलिदा लाटला आहे. ‘नदी’च्या नावाने चर्चेत असलेल्या एका बँकेने दोन भूखंडांवर तीन-तीन कोटींचे कर्ज मंजूर केले आहे. वास्तविक त्या भूखंडांची खरेदी किंमत अवघी २५ लाख आहे. ५० लाखांच्या दोन भूखंडांना चक्क सहा कोटींचे कर्ज मंजूर केले गेले आहे. अडीच टक्के प्रोसेसिंग फी आणि दहा टक्के शेअर्स या अटीवर हे कर्ज दिले गेले आहे. दरदिवशी १५ ते २० हजार परतावा (कर्ज परतफेड) या पद्धतीने हे कर्ज देण्यात आले. काही महिने हे कर्ज नियमित भरले गेले. मात्र आता ते थकीत झाले आहे. तेवढी प्रॉपर्टीच तारण नसल्याने या कर्जाची वसुली वांद्यात सापडली आहे. बँकींगचा दीर्घ अनुभव असलेल्या अधिकाऱ्याने हे कर्ज मंजूर केले. सदर अधिकारी आता दोन बँका एकत्र करून स्वत:ची स्वतंत्र बँक काढण्याच्या तयारीत असल्याचेही सांगितले जाते. याच बँकेतून अशी आणखीही कर्ज प्रकरणे मंजूर झाली आहे. अशाच पॅटर्ननुसार अन्य काही बँकांनीही दिलेले कर्ज वांद्यात सापडले आहेत. संबंधित शासकीय आॅथिरीटीने प्रामाणिकपणे आॅडिट केल्यास जनतेच्या पैशांचा हा घोळ सिद्ध होण्यास वेळ लागणार नाही.विदेशात वास्तव्य असणाऱ्यांचे भूखंड हेरलेभूमाफियांनी बेवारस भूखंडांची बोगस खरेदी-विक्रीसाठी निवड करताना शक्यतोवर मालक दूर कोठे तरी असेल याला प्राधान्य दिले. दोन डझनावर भूखंडांचे या माफियांनी व्यवहार केल्याचे बोलले जाते. यातील बहुतांश भूखंडांचे मालक विदेशात राहत असल्याचेही सांगितले जाते. ते तक्रार देण्यासाठी येथे प्रत्यक्ष येण्याची तसदी घेणार नाही, असेच भूखंड निवडण्यात आले. मात्र या मालकांना आॅनलाईन फिर्याद देण्याचा पर्यायही सूचविण्यात आल्याची माहिती आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा