शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

हजारो शेतकऱ्यांचे डोळे लागले आकाशाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 05:00 IST

जिल्ह्यात २०१६ ते २०२० या कालखंडातील पावसाचा आराखडा चिंता वाढविणारा आहे. सर्वाधिक पाऊस बरसणाऱ्या यवतमाळ जिल्ह्याकडे वरूणराजाने पाठ फिरविली आहे. यामुळे हमखास पाऊस बरसणाऱ्या प्रांतावर चिंतेचे ढग दाटले आहेत. पावसाच्या या अनिश्चिततेने पीक लागवडीमध्ये मोठा फेरबदल पहायला मिळत आहे.

ठळक मुद्देपेरण्या आटोपल्या, पावसाचा पत्ता नाही : साडेसात लाख हेक्टरवरील पिके वाचविण्यासाठी धडपड

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गत पाच वर्षातील पावसाचा आराखडा पाहिला तर जूनच्या अखेरीस पावसाला प्रारंभ झाला. मात्र यावर्षी जुनच्या पहिल्याच तारखेला पाऊस बरसला. नंतर पावसाने दडी मारली. त्यात उन्हाचा कडाका वाढला आहे. यामुळे पीक वाचविण्यासाठी साडेसात लाख हेक्टरवर धडपड सुरू झाली आहे.जिल्ह्यात २०१६ ते २०२० या कालखंडातील पावसाचा आराखडा चिंता वाढविणारा आहे. सर्वाधिक पाऊस बरसणाऱ्या यवतमाळ जिल्ह्याकडे वरूणराजाने पाठ फिरविली आहे. यामुळे हमखास पाऊस बरसणाऱ्या प्रांतावर चिंतेचे ढग दाटले आहेत. पावसाच्या या अनिश्चिततेने पीक लागवडीमध्ये मोठा फेरबदल पहायला मिळत आहे.जिल्ह्यात पूर्वी ८० टक्के क्षेत्र कापसाचे होते. इतर क्षेत्रात संमिश्र पिके घेतली जात होती. पावसाच्या अनिश्चिततेने या पेरणी क्षेत्रात मोठे फेरबदल झाले आहे. अल्पावधीत हाती येणाऱ्या पिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. यामध्ये जंगली जनावर आणि रानडुकरांपासून संरक्षण करता येईल असेच पीक शेतकऱ्यांनी लागवडीसाठी घेतले आहे.यामुळे जिल्ह्यात दरवर्षी सोयाबीनचा पेरा वाढत चालला आहे. अशातच बोगस बियाण्याचा शिरकाव झाला आहे. यामुळे शेतकरी धास्तावले आहेत. त्याला पर्यायी पीक नव्याने शोधत आहे.२०१६ ते २०१९ या वर्षात पावसाचे आकडेवारी डोळे विस्फारणारी आहे. या काळात हवामान खात्याने दरवर्षी चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त केला. ऐनवेळी पावसाने उपघडीप दिली. जूनच्या अखेरीस पाऊस सुरू झाला. २०१६ मध्ये जूनमध्ये १०९ मिमी पाऊस झाला. हा पाऊस १५ ते २५ जूनच्या सुमारासच बरसला आहे.२०१७ मध्ये १४४ मिमी पावसाची नोंद झाली. मधात काही काळ पावसाचा खंड राहीला. यानंतर पाऊस बरसला. २०१८ मध्ये १५२ मिमी पाऊस झाला. २०१९ मध्ये पावसाचे सर्व गणित बिघडले. सुरूवातीला पाऊस आला. नंतर पाऊसच आला नाही. २५ जूनपर्यंत २१ मिमी पावसाचीच नोंद करण्यात आली. २०२० वर्षामध्ये सर्वात विरोधाभासी चित्र पाहायला मिळाले. २५ जूनपर्यंत १३४ मिमी पाऊस बरसला.निसर्गाच्या लहरीपणाचाच परिचय पावसाच्या आकडेवारीतून दिसून येतो. कुठल्या वर्षी किती पाऊस प्रारंभीच्या काळात पडेल, याचा नेम राहिला नाही. यातून शेतकऱ्यांच्या पेरणीचे गणित बिघडले आहे. विशेष म्हणजे, शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन क रावा लागला आहे.८५ टक्के पेरण्या आटोपल्या सर्वाधिक कपाशीजेमतेम उगविलेली पीक काही भागात दृष्टीस पडत आहेत. कोवळ्या पिकांना प्रखर उष्णतेचा सामना करावा लागत आहे. त्यातही कृषी फिडरवर वीज भारनियमन आहे. यामुळे शेतकऱ्यांना पीक वाचविण्यासाठी प्रचंड कसरत करावी लागत आहे. प्रारंभापासून शेतकऱ्यांना या मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे. यामुळे शेतकरी धास्तावले आहेत.जिल्ह्यात आतापर्यंत ८५ टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक चार लाख १७ हजार हेक्टर क्षेत्र कापसाच्या लागवडीखाली आले आहे. दोन लाख ३८ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे. ९० हजार हेक्टरवर तुरीची लागवड झाली आहे. चार हजार हेक्टरवर मूग तर दोन हजार हेक्टरवर उडिदाची पेरणी झाली आहे. सात हजार हेक्टरवर ज्वारी तर २७०० हेक्टरवर ऊसाची लागवड झाली आहे. या सर्व पिकांना पावसाची नितांत गरज आहे. मात्र १२ दिवसांपासून पाऊसच गायब आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस