शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

शेतकऱ्याच्या डोळ्यांत मिरचीपूड टाकून सव्वातीन लाख पळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2022 15:59 IST

घाटामध्ये त्यांच्या पाठीमागून दुचाकीने दोन भामटे आले. त्यांनी राठोड यांच्या डोळ्यांत तिखट फेकले. नंतर पैशाची बॅग हिसकावून त्यांनी पोबारा केला.

ठळक मुद्देशेतकऱ्याची झटापट निंगनूर ते मेट दरम्यानची घटना

ढाणकी (यवतमाळ) : कापूस विक्रीचा चुकारा घेऊन दुचाकीने घरी जाणाऱ्या शेतकऱ्याच्या डोळ्यांत तिखट फेकून दोन भामट्यांनी रोख तीन लाख २० हजार रुपये चोरून नेले. ही घटना गुरुवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास उमरखेड तालुक्यातील निंगनूर ते मेट दरम्यानच्या घाटात घडली.

गणेश राठोड असे शेतकऱ्याचे नाव आहे. ते मेट येथील रहिवासी असून, गुरुवारी त्यांनी फुलसावंगी येथे कापूस विक्रीसाठी नेला होता. कापूस विकल्यानंतर तीन लाख २० हजार रुपयांचा चुकारा घेऊन ते सहकाऱ्यासह आपल्या दुचाकीने निंगनूर मार्गे मेटकडे निघाले होते. दरम्यान, घाटामध्ये त्यांच्या पाठीमागून दुचाकीने दोन भामटे आले. त्यांनी राठोड यांच्या डोळ्यांत तिखट फेकले. त्यामुळे राठोड व त्यांचा मित्र दुचाकीवरून खाली आदळले. भामट्यांनी त्यांच्याजवळील पैशाची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र बॅग राठोड यांच्या खांद्याला लटकवलेली असल्याने निघत नव्हती. त्यामुळे दोन्ही भामट्यांनी राठोड व त्यांच्या मित्रासोबत झटापट करून चाकूचा धाक दाखविला. नंतर पैशाची बॅग हिसकावून त्यांनी पोबारा केला.

दरम्यान, दुचाकीवरून आदळल्याने आणि डोळ्यांत तिखट गेल्याने गणेश राठोड व त्यांचा सहकारी भांबावले होते. त्यांना काही सुचत नव्हते. त्यांनी आपल्या मोबाईलद्वारे कशीबशी गावकऱ्यांना घटनेची माहिती दिली. भामटे निंगनूरच्या दिशेने गेल्याबाबत तेथील पोलीस पाटील उत्तम मुडे यांना माहिती दिली. त्यांनी बिटरगावचे ठाणेदार प्रताप भोस यांना कळविले. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. राठोड यांच्याकडून माहिती घेतली. मात्र तोपर्यंत भामटे गायब झाले होते. बिटरगाव पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात लुटारूंविरुद्ध भादंवि ३९२, ३४ कलमानुसार गुन्हा दाखल केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFarmerशेतकरीtheftचोरीMONEYपैसाumarkhed-acउमरखेड