शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
5
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
7
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
8
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
9
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
10
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
11
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
12
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
13
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
14
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
15
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
16
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
17
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
18
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
19
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
20
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
Daily Top 2Weekly Top 5

भारनियमनाची समस्या झाली गंभीर

By admin | Updated: November 12, 2014 22:52 IST

पांढरकवडा उपविभागाअंतर्गत येणाऱ्या पाटणबोरी येथे महावितरणच्या भोंगळ कारभाराने कळस गाठला आहे. परिसरातील नागरिकांमध्ये महावितरणप्रती तीव्र असंतोष खदखदत आहे़

पाटणबोरी : पांढरकवडा उपविभागाअंतर्गत येणाऱ्या पाटणबोरी येथे महावितरणच्या भोंगळ कारभाराने कळस गाठला आहे. परिसरातील नागरिकांमध्ये महावितरणप्रती तीव्र असंतोष खदखदत आहे़येथे भारनियमन हे दैनंदिन झाले आहे. सोबतच कधी वीज गुल होईल, याचा काहीच नेम नाही़ येथे वीज कधीही जाते आणि कधीही परत येते. वीज नसताना विचारणा केली असता, येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे नेहमी नवीन उत्तरे असतात़ कधी वरूनच वीज बंद आहे, कधी ट्रान्सफार्मर जळाले, कधी मेंटेनन्सचे कारण सांगितले जाते. कधी बिघाड झाला आहे, फॉल्ट सापडत नसल्याचे सांगितले जाते़ यावरून कंपनी अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये कामचुकारपणा व अनुभवाची कमी असल्याचे दिसून येत आहे़ यापूर्वीचे कर्मचारी प्रामाणिक व नोकरीप्रती गंभीर होते़ मात्र सध्या कर्मचारी निर्ढावले आहे़ त्यांना कामाबद्दल व नागरिकांच्या समस्यांबद्दल काहीही देणे-घेणे नाही़ कोणतीही समस्या घेऊन गेलेल्या वीज ग्राहकाला उडवाउडवीची उत्तरे देऊन परत पाठविले जाते़ वीज देयकात दुरूस्तीकरिता ग्राहकांना पांढरकवड्याचा रस्ता दाखविला जातो़ वीज पुरवठा अखंड पुरविण्यास गंभीर नसलेले महावितरणचे अधिकारी व कर्मचारी वीज पुरवठा तोडण्यात मात्र चांगलेच वस्ताद आहे़ कार्यालयात न दिसणारी ही मंडळी वीज कापण्याचे साहित्य सोबत घेऊन गावात हिंडताना नेहमी दृष्टीपथास पडते.येथील दुय्यम दर्जाच्या उपअभियंत्यांकरिता स्वतंत्र निवासस्थानाची व्यवस्था आहे. मात्र सदर अभियंता पांढरकवडा येथून ये-जा करतात़ यावरून नोकरीप्रती त्यांची गंभीरता लक्षात येते़ ते सतत ये-जा करीत असल्याने कर्मचाऱ्यांवर वचक नाही. परिणामी कर्मचारीच अधिकारी बनले आहे़ लगतच्या मांडवी येथील कृषी पंपाचे ट्रान्सफार्मर जळाले़ या ट्रान्सफार्मरवर थकीत देयक नसतानाही ते एक हप्त्यानंतरही बदलविण्यात आले नाही़ या ट्रान्सफार्मरवरील शेतकरी आनंद चोपडा, श्रीनिवास अडपावार, वासुदेव जन्नावार, हिवराज मेश्राम, मधू बनपेल्लीवार आदींनी उपअभियंत्यांची भेट घेऊन व्यथा मांडल्या़ त्वरित ट्रान्सफार्मर न लावल्यास सामूहिक फाशी घेतल्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशाराही दिला. उपअभियंत्याने ट्रान्सफार्मरची मागणी मुख्य कार्यालयाला कळविल्याचे सांगून ते आल्यानंतर बसवू, एवढेच उत्तर देऊन पळवाट शोधली. (वार्ताहर)