शहरं
Join us  
Trending Stories
1
“कोणी कुणाला काढलंय तेच कळत नाही”; राज ठाकरेंचा ECवर निशाणा, मतदारयादीतील एकसमान नावंच वाचून दाखवली
2
"...तेव्हा तर अजित पवार तावातावाने बोलत होते"; मतदार याद्यांच्या घोळावरुन बोलताना राज ठाकरेंनी सुनावलं
3
अजब देश! संसद, सरकार, सैन्य सगळं आहे, पण जगाच्या नकाशावर अस्तित्वच नाही, कारण काय?
4
तामिळनाडूत हिंदी गाणी, चित्रपट आणि जाहिरातींवर बंदी; स्टॅलिन सरकारने आणले विधेयक
5
महागाई ते ट्रेड डील पर्यंत... मोदी सरकारसाठी दोन दिवसांत आल्या एका पाठोपाठ एक ४ गुड न्यूज
6
'निवडणूक आयोगाची वेबसाईट बाहेरुन कोण तर चालवतंय', जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
"माझ्या नवऱ्याला मार, नाहीतर मी..."; ५ मुलांच्या आईचा हट्ट, बॉयफ्रेंडपेक्षा १२ वर्षांनी आहे मोठी
8
“माओवाद १०० टक्के संपणार, भूपतीची शरणागती मोठी गोष्ट”; CM फडणवीसांनी केले पोलिसांचे अभिनंदन
9
“राहुल गांधींनी मतदारयादीतील घोळ देश पातळीवर मांडला, हे निकोप लोकशाहीला घातक”: थोरात
10
प्रॅक्टिस वेळी 'दादागिरी'; Live मॅचमध्ये आली तोंडावर पडण्याची वेळ! पृथ्वीसह चौघांच्या पदरी भोपळा
11
"पत्नीला म्हणाले, बसमध्ये बसलोय", तो कॉल ठरला शेवटचा, जितेशचा होरपळून गेला जीव; ओळखही पटेना
12
तालिबानकडे मिसाईल कुठून आली? हल्ला होताच गाफिल पाकिस्तान हादरला; ६५ वर्षांपूर्वी...
13
Pankaj Dhir: 'महाभारत'मधील 'कर्ण' काळाच्या पडद्याआड, अभिनेते पंकज धीर यांचं कर्करोगानं निधन
14
बाबासाहेब पाटलांनी पालकमंत्रिपद सोडलं, त्यांच्या जागी 'या' नेत्याला मिळाली जबाबदारी
15
दिवाळीपूर्वी 'या' दिग्गज कंपनीचा मोठा झटका! १५ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार? काय आहे कारण?
16
मोठी रिअल इस्टेट डील; अदानी खरेदी करणार सहाराच्या 88 मालमत्ता; किती कोटींचा व्यवहार?
17
Priyal Yadav : प्रेरणादायी! वडील तिसरी, आई सातवी पास; अकरावी नापास प्रियल कशी झाली डेप्युटी कलेक्टर?
18
'जंगलात जरी बोलवलं तरी गेलो असतो'; पोलिसांना दिलेले वचन CM फडणवीसांनी पूर्ण केले, कार्यक्रम रद्द करुन पोहोचले गडचिरोलीत
19
“...तोपर्यंत निवडणुका घेऊच नका, मतदारयादीची लपवाछपवी का?”; राज ठाकरेंची आयोगाला विचारणा
20
आधी बंपर लॉटरी लावली... आता एलजीच्या एमडींनी हिंदीत भाषण केलं; मन जिंकताच दिग्गज उद्योजकानंही केलं कौतुक

रस्ता इतका खराब की बससेवा केली बंद ! 'त्या' रस्त्याने वाहन चालविताना उडतो थरकाप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 20:19 IST

Yavatmal : खड्ड्यांतून नागरिकांचा जीवघेणा प्रवास, अपघाताची दाट शक्यता, अवजड वाहतूक सुरूच

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : रस्ते हे देशाच्या विकासाचे प्रतीक आहे. रस्त्यावरून देशाच्या विकासाची व्याख्या ठरवली जाते. मात्र, ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, वणी विधानसभा क्षेत्रात काही भागांत अजूनही दळणवळणाची व्यवस्था सुरळीत झाली नाही. तालुक्यातील शिरपूरमार्गे शिंदोला व कोरपना या अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने, नागरिकांना जिवाची कसरत करीत जीवघेण्या खड्ड्यातून धोकादायक प्रवास करावा लागत आहे.

वणी तालुक्यातील शिरपूर ते आबई फाटा हा अत्यंत वर्दळीचा मार्ग आहे. या मार्गावरून दिवस-रात्र नागरिकांचे आवागमन सुरू असते. मात्र, पाऊस पडला, तर या मार्गावरील खड्डे पाण्याने भरलेले आहे. त्यामुळे नागरिकांना रस्त्यात खड्डा की खड्ड्यांत रस्ता आहे. महत्त्वाचे म्हणजे या रस्त्यावर कोळसा, सिंमेट व दगड वाहतुकीची जड वाहने रात्रंदिवस सुरू असतात. रस्त्यावरील खड्डे चुकविण्याच्या नादात मागील दोन वर्षांत बरेच अपघात होऊन काहींना जीव गमवावा लागला, तर अनेक नागरिक गंभीर जखमी झाले. बऱ्याचदा खड्यांमुळे वाहने फसतात व त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प होत असते.

दोन वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या रस्त्यावर ५० कोटी रुपये खर्च करण्यात आले. परंतु, नवीन काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने आता मलमपट्टी लावण्याचे काम सुरू आहे. मार्गाची दुरुस्ती करून डांबरीकरण करावे, या मागणीसाठी उद्धव सेनाच्या वतीने आबई फाटा येथे रस्ता रोको आंदोलनही करण्यात आले होते. आंदोलनानंतर तीन दिवस वाहतूक बंद ठेवून दोन ते तीन किलोमीटर रोडवर गिट्टीने खड्डे भरण्यात आले, परंतु गिट्टी आजूबाजूला पसरल्याने पूर्वी पेक्षा परिस्थिती वाईट झाली आहे.

विद्यार्थ्यांना घ्यावा लागतो खासगी वाहनांचा आधार

  • या मार्गाची अवस्था एवढी वाईट आहे की, या मार्गावरून एसटी बस चालविणे शक्य नाही. त्यामुळे नाईलाजाने महामंडळाने आपले नुकसान टाळण्यासाठी या मार्गावरील बस दोन आठवड्यांपूर्वी बंद केल्या.
  • बस बंद झाल्याने विद्यार्थ्यांचे व नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. परिणामी विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचण्यासाठी खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असल्याचे वास्तव या भागात आहे.

ग्रामीण रस्त्याचे भाग्य उजळणार कधी ?

  • वणी तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. अनेक रस्त्यांवर मोठे खड्डे पडल्याने नागरिकांना जीव मुठीत घेऊन जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.
  • शहरी रस्ते स्मार्ट होत असताना 3 ग्रामीण भागातील रस्त्यावर पायी चालणेही कठीण झाले आहे. त्यात ग्रामीण भागातील रस्त्याचे भाग्य उजळणार कथी, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाroad transportरस्ते वाहतूकYavatmalयवतमाळ