शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
2
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
3
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
4
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
5
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
6
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
7
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
8
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
9
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
10
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
11
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
12
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
13
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
14
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
15
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
16
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
17
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
18
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
19
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
20
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!

चोरट्यांच्या जाचामुळे ढळतोय शेतकऱ्यांचा संयम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2022 22:57 IST

जिल्ह्यातील कोणत्याच तालुक्यातील शेतशिवार चोरांपासून सुरक्षित नाही. काही दिवसांपूर्वी कधी तरी शिवारात चोरीची घटना घडत होती. आता मात्र हा प्रकार नित्याचाच झाला आहे. शेतातील विहिरी, बोअरवेल यावर लावलेले मोटारपंप, त्याचे केबल, स्टार्टर हे सर्रास चोरीला जात आहे. चोरटे अधिकच बिनधास्त झाले असून तुषार संच, ठिबक संचाचे पाइपसुद्धा उखडून घेऊन जात आहे. रात्रंदिवस शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यावर हे नवे संकट उभे ठाकले आहे.

सुरेंद्र राऊतलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : निसर्गाशी दोन हात करून शेतकरी आपले काळे शिवार हिरव करतो. अन्नदाता म्हणून वाट्याला येणारी दु:ख व कष्ट मुकाट सोसतो. व्यवस्थाही त्याची वारंवार कसोटी पाहते. अशा शेतकऱ्यांचा आता संयम सुटायला लागला आहे. शेती साहित्य, धान्य, जनावरे चोरीच्या घटना नित्याच्याच झाल्या आहेत. हे नवे संकट परतवून लावण्यासाठी शेतकऱ्यांनी हातात काठी घेतली तर अघटित घडते, अशीच घटना बाभूळगाव तालुक्यातील मादणी येथे घडली. हकनाक शेतकरी खुनाचे आरोपी झाले. जिल्ह्यातील कोणत्याच तालुक्यातील शेतशिवार चोरांपासून सुरक्षित नाही. काही दिवसांपूर्वी कधी तरी शिवारात चोरीची घटना घडत होती. आता मात्र हा प्रकार नित्याचाच झाला आहे. शेतातील विहिरी, बोअरवेल यावर लावलेले मोटारपंप, त्याचे केबल, स्टार्टर हे सर्रास चोरीला जात आहे. चोरटे अधिकच बिनधास्त झाले असून तुषार संच, ठिबक संचाचे पाइपसुद्धा उखडून घेऊन जात आहे. रात्रंदिवस शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यावर हे नवे संकट उभे ठाकले आहे. गोठ्यातील गाय, म्हैस, बैल ही जनावरेसुद्धा सुरक्षित नाहीत. आता सध्या रब्बी हंगामाची तयारी शेतकरी करीत आहेत. रब्बीच्या हंगामात सिंचनासाठी मोटारपंप व तुषार संचाची गरज भासते. यंदा मुसळधार कोसळलेल्या पावसाने खरीप हंगामात शेतकऱ्यांची पुरती दैना केली. झालेले नुकसान निघणार नाही, मात्र पुढील काही दिवस व्यवहार चालविता येईल इतके उत्पन्न रब्बीतून मिळावे या आशेने शेतकरी पुन्हा कष्ट उपसायला तयार झाला आहे. त्याला चोरट्यांकडून खोडा घातला जात आहे.  पोलिस ठाण्यांमध्ये दररोज कृषी साहित्य चोरीच्या तक्रारी  दाखल होतात. पोलिसांकडून याची गांभीर्याने दखल घेतली जात नाही. चोरी गेलेल्या कृषी साहित्याची किंमत पोलिसांच्या लेखी फार कमी आहे. मात्र हंगामात हातचे अवजार निघून गेले तर किती नुकसान होते, काय अडचणी सोसाव्या लागतात, हे शेतकऱ्यांनाच ठावूक आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांचा चोरट्यांवरील राग वाढला आहे. हाती लागला तर बेदम मारहाणीत शेतकरी आरोपी होत आहेत. मादणी येथे सोयाबीन चोरीच्या संशयातूनच एकाला शिवारात नेऊन हातपाय बांधून बदडला. यात त्याचा जीव गेला. तिघे जण खुनाच्या गुन्ह्यात आरोपी झाले. अशा घटना भविष्यात होऊ नये यासाठी पोलिसांनी कृषी साहित्य चोरणाऱ्यांचा कडक बंदोबस्त करणे गरजेचे आहे.  

शेतकरी म्हणतात, पोलिसांचा धाक नाही 

माझ्या शेतातून आतापर्यंत सात मोटारपंप चोरीला गेले. चारवेळा तक्रार दिली. पोलिसांची   काहीच कारवाई नाही. त्यानंतर तीनवेळा मोटारपंप चोरीस जाऊनही तक्रार केली नाही. चोरट्यांवर पोलिसांचा  धाक नाही. आम्ही शेतकरी भीतीच्या सावटात जगत आहोत. तक्रार घेण्यासही पोलिस टाळाटाळ करतात.- संजय रावेकर, शेतकरी, कळंब

दोनवेळा मोटारपंप व शेतीपयोगी साहित्य चोरीला गेले. शेतातील पाइप पोलिसांनी तपासाकरिता नेले. आता तेही द्यायला तयार नाहीत. मोटारपंप चोरीला जाऊ नये, असे वाटत असले तर शेतात जाऊन झोपत जा, असा उलट सल्ला पोलीस देतात.आता आम्ही दाद तरी कोणाकडे मागायची.- ज्ञानेश्वर केशव लोखंडे, शेतकरी, कळंब

शेतातून तीन मोटार पंपाची चोरी झाली. प्रत्येक वेळा तक्रार दिली. काहीच उपयोग झाला नाही. उलट पोलिस म्हणतात, सुगावा लागला तर सांगा. माहिती दिली तर तपास करीत नाहीत. वारंवारच्या चोरीमुळे आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. भीतीच्या सावटात जगत आहोत.- प्रवीण राऊत शेतकरी, कोठा

आजूबाजूच्या शेतातील मोटारपंप चोरीस जात आहे. त्यामुळे आम्हाला आमचे मोटारपंप सुरक्षित राहील की नाही, याची काळजी असते. वारंवार शेतात चकरा माराव्या लागत आहे. यामध्ये अधिकचा वेळ जातो. मोटार चोरांची टोळी पकडून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. - प्रल्हाद पांडुरंग झामरे शेतकरी, बोरीमहल

 

टॅग्स :Thiefचोर