शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
2
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
3
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
4
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
5
"सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
6
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
7
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
8
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
9
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
10
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
11
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
12
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
13
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
14
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
15
रशिया युक्रेन युद्ध संपूर्ण युरोपात पसरणार, NATO देशांचं सैन्य सज्ज; झेलेन्स्कींचा जगाला मोठा इशारा
16
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण
17
VIRAL : भूकंपाच्या झटक्यानं आसाम हादरलं, नर्सनी धाडस दाखवलं! स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले बाळांचे प्राण 
18
'दशावतार' पाहायला गेलेल्या अमराठी प्रेक्षकाच्या डोळ्यांत पाणी, दिलीप प्रभावळकरांना दिला कडक सॅल्यूट, थिएटरमधील व्हिडीओ
19
हृदयद्रावक! BMW ने घेतला भारत सरकारच्या मोठ्या अधिकाऱ्याचा जीव; नेमकं काय घडलं?
20
UPI Rule Change: आजपासून मोठा बदल, मोठा दिलासा; आता UPI मधून एका दिवसात करू शकता 'इतक्या' लाखांचं ट्रान्झॅक्शन

प्रशासनाने जाणल्या शेतकऱ्यांच्या व्यथा; येत्या पाच दिवसात आंदोलनाची पुढील दिशा ठरविली जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2024 16:54 IST

Yavatmal : अन्नत्याग आंदोलनाची दखल घेत शेतकऱ्यांच्या मागण्या आणि समस्या सोडवण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी बैठक बोलावली. ही बैठक सकारात्मक असली तरी बहुतांश मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन कायम ठेवण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी शेतकरी पुत्रांची जिल्हा प्रशासनासोबत बैठक झाली. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अनेक प्रश्न निकाली काढण्यात आले; तर अनेक प्रश्न धोरणात्मक असल्याने त्यावर राज्यस्तरावर निर्णय होणे अपेक्षित आहे. 

सोयाबीन-कापूस दरवाढ, पीकविमा, अतिवृष्टीची पूर्णता नुकसानभरपाई, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती, जंगली जनावरांपासून संरक्षणासाठी शेतीला मजबूत कंपौंड यांसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी कृष्णा पुसनाके, सचिन मनवर व कृषी अभ्यासक प्रा. पंढरी पाठे यांनी यवतमाळ येथे आझाद मैदानात अन्नत्याग आंदोलन केले होते. 

या आंदोलनाची दखल घेत जिल्हा प्रशासनाने बैठक आयोजित केली होती. यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक प्रमोद लहाळे, जिल्हा पणन अधिकारी अर्चना माळवे, अग्रणी बँक प्रबंधक अमर गजभिये, निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश राऊत, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सतीश मून, उपविभागीय अधिकारी गोपाळ देशपांडे, अॅड. जयसिंग चव्हाण यांसह विमा कंपन्यांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थितीत होते. 

तब्बल दीड तास ही बैठक चालली. या बैठकीत प्रा. पंढरी पाठे यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या आणि समस्या सविस्तरपणे मांडल्या. छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना व महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेमध्ये अनेक शेतकऱ्यांचे पैसे सरकारकडे बाकी आहेत. जंगली जनावरांच्या त्रासापासून मुक्तता होण्यासाठी शेतीला मजबूत कंपौंडच्या योजनेचा प्रस्ताव उपवनसंरक्षक यांच्या माध्यमातून कॅबिनेटकडे पाठवू, असे सांगण्यात आले. यावेळी विविध प्रश्नांवर शेतकऱ्यांनी आपले मत मांडले. 

यावेळी माजी मुख्याध्यापक ज्ञानेश्वर गायकवाड, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण देशमुख, प्रा. निनाद सुरपाम, ऋषिकेश सराफ, प्रज्ज्वल तुरकाने, नितीन मिर्झापुरे, तर सहकारी म्हणून शेतकरी प्रकाश कांबळे, राहुल भानावत, अनिल चवरे, अभय अनासाने, अनिकेत हांडे, प्रशांत कुटे यांची उपस्थिती होती. 

मध्यप्रदेशाप्रमाणे यवतमाळात आंदोलन मागण्या पदरात पडत नाहीत तोपर्यंत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच राहणार आहे. पुढील चार ते पाच दिवसांत समोरील आंदोलनाची दिशा ठरणार आहे. मध्यप्रदेशमध्ये जसे आंदोलन सुरू आहे, तसेच आंदोलन महाराष्ट्रातही होणार असल्याचे आंदोलकांनी यावेळी स्पष्ट केले. 

टॅग्स :YavatmalयवतमाळfarmingशेतीFarmerशेतकरी