शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

ऐका हो ऐका... शिक्षकांच्या अडचणी संपल्या; शिक्षक संवाद दिन कागदावरच

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2023 14:25 IST

म्हणे वर्षभरात केवळ दोन तक्रारी

अविनाश साबापुरे

यवतमाळ : वेतन विलंब, मेडिकल बिलांचा खोळंबा, जुनी पेन्शन असे एक ना अनेक प्रश्न राज्यातील सात लाखांहून अधिक शिक्षकांना भेडसावत आहेत. पण, गेल्या वर्षभरात राज्यातील केवळ दोन शिक्षकांनीच संवाद दिनात तक्रारी केल्या आणि सेवा हमी अधिनियमाचे पालन होत नसल्याबाबत तर एकही तक्रार नसल्याची माहिती शिक्षण संचालक कार्यालयाने जाहीर केली आहे. त्यावरून शिक्षण खात्याचा कारभार तक्रारमुक्त, कोरा करकरीत असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. मात्र, दुसरीकडे तक्रारी ऐकून घेण्यासाठी आवश्यक असलेला ‘संवाद दिन’ उपक्रम केवळ कागदोपत्री राबविल्याचे दिसून येत आहे.

शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी २९ एप्रिल २०२२ रोजी शिक्षकांच्या अडचणी सोडवून घेण्यासाठी ‘शिक्षक संवाद दिन’ हा उपक्रम जाहीर केला. त्यानुसार, प्रत्येक जिल्ह्यात शिक्षणाधिकाऱ्यांनी प्रत्येक महिन्यात असा ‘संवाद दिन’ आयोजित करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. त्यासाठी शिक्षकांना १५ दिवस आधी आपल्या तक्रारी सादर कराव्या लागणार आहेत. शिक्षणाधिकाऱ्यांच्या दरबारात न्याय न मिळाल्यास शिक्षण उपसंचालकांकडे होणाऱ्या संवाद दिनात दाद मागता येणार आहे. तेथेही न्याय न मिळाल्यास संचालक कार्यालयात होणाऱ्या संवाद दिनात तक्रारी ऐकल्या जाणार होत्या. मात्र, अनेक शिक्षणाधिकारी कार्यालयात संवाद दिनच झाला नाही. जेथे झाला, तेथे केवळ कागदोपत्री झाला.

हाच धागा धरून आरटीआय कार्यकर्ते अनिल सोनवणे यांनी माहिती अधिकार वापरला. गेल्या वर्षभरात संवाद दिनात किती तक्रारी प्राप्त झाल्या, याची माहिती त्यांनी प्राथमिक तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक अशा दोन्ही शिक्षण संचालकांकडून मागितली होती. यासंदर्भात माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक कार्यालयाने दिलेली माहिती आश्चर्यकारक ठरली आहे. आरटीआयअंतर्गत त्यांनी दिलेल्या माहितीनुसार वर्षभरात संवाद दिनात केवळ दोन तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. तसेच शिक्षण आयुक्तांनी गेल्या वर्षी १८ एप्रिल २०२२ रोजी लोकसेवा हक्क अधिनियमात शिक्षण विभागातील अनेक कामे अधिसूचित केली होती. ती कामे करण्यासाठी २ दिवस ते १५ दिवस असा कालावधी निश्चित केला हाेता. एकीकडे शिक्षक आपली कामे प्रलंबित असल्याची ओरड करीत असताना संचालक कार्यालयाने मात्र आपल्याकडे लोकसेवा हक्क अधिनियमाचे उल्लंघन होत असल्याची वर्षभरात एकही तक्रार आलेली नाही, अशी माहिती आरटीआयमध्ये जाहीर केली आहे. त्यामुळे शिक्षण विभाग आपला कारभार ‘स्वच्छ’ असल्याचा कागदोपत्री आव आणत असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

राज्यात किती आहेत शिक्षक?

- प्राथमिक शिक्षक : १,५९,८८४

- उच्च प्राथमिक शिक्षक : २,२७,०५१

- माध्यमिक शिक्षक : १,९०,५८६

- उच्च माध्यमिक शिक्षक : २,०६,३२६

- राज्यात एकूण शिक्षक : ७,८३,८४७

राज्यात शिक्षक संवाद दिनाचा उपक्रम किंवा लोकसेवा हक्क अधिनियमाची अंमलबजावणीच होत नाही. त्यामुळे शिक्षण विभागातून न्यायप्रविष्ट होणाऱ्या प्रकरणांची संख्या वाढत आहेत.

- अनिल सोनवणे, आरटीआय कार्यकर्ता

टॅग्स :Teacherशिक्षकEducationशिक्षणGovernmentसरकार