शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

दैवतांना निरोप देताना प्रदूषणाला पाठबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 6:00 AM

नुकतेच घरोघरी गौरी-गणपतीची प्रतिष्ठापना करून पूजन केले गेले. महालक्ष्मी गौरीचे मोठ्या प्रमाणात पूजन करून सर्वांना सुख समृद्धी लाभो अशी प्रार्थना केली गेली. महाप्रसादाचे कार्यक्रम झाल्यावर वापरलेले प्लास्टिक, थर्माकोलचे द्रोण पत्रावळी मात्र स्वच्छ वाहत्या पाण्यात टाकून दिले.

ठळक मुद्देसंडे अँकर । जलस्त्रोतांमध्ये कचरा, यवतमाळ नगर पालिकेची यंत्रणा करतेय स्वच्छता

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गणेशोत्सवाचे दहा दिवस मोठ्या जल्लोषात साजरे झाले. विसर्जनही तेवढ्याच उत्साहात पार पडले. मात्र विसर्जनानंतर गणरायाच्या मूर्तींची अवस्था काय, असा प्रश्न निर्माण व्हावा, असे चित्र शहरानजीकच्या विविध जलस्त्रोतांमध्ये सध्या दिसत आहे. भाविकांनी पाण्यात सोडलेल्या मूर्ती दोन दिवसानंतरही विसर्जित होण्याचीच वाट पाहात आहे. त्यामुळे नगरपालिकेच्या यंत्रणेलाच त्यांची व्यवस्था करावी लागत आहे.मॉर्निंग वॉककरिता जाणाऱ्या सामान्य नागरिकांनाच हे विचित्र चित्र आढळले, हे विशेष. त्यांनी याबाबत खंतही व्यक्त केली. ते म्हणाले, सध्याचे दिवस हे सणावारांचे आहेत. नुकतेच घरोघरी गौरी-गणपतीची प्रतिष्ठापना करून पूजन केले गेले. महालक्ष्मी गौरीचे मोठ्या प्रमाणात पूजन करून सर्वांना सुख समृद्धी लाभो अशी प्रार्थना केली गेली. महाप्रसादाचे कार्यक्रम झाल्यावर वापरलेले प्लास्टिक, थर्माकोलचे द्रोण पत्रावळी मात्र स्वच्छ वाहत्या पाण्यात टाकून दिले. तेलकट असणारे हे नष्ट न होणारे द्रोण -पत्रावळी पुढे अनेक वर्ष पर्यावरणाचे नुकसान करत राहणार आहे. पाण्यात राहणारे जीव या तेलाच्या तवंगाने आणि द्रोण पत्रावळीच्या कचऱ्याने गुदमरून जाणार आहेत.घरोघरी आणि सार्वजनिक ठिकाणी विराजमान झालेल्या गणरायाला आम्ही ‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या’ असे आर्जव करीत नुकताच निरोप दिला. ढोल ताशांच्या, भजनांच्या गजरात गणराया विसर्जित झाले. आम्ही फार मोठे धार्मिक कार्य संपन्न झाल्याच्या भावनेने कृतकृत्य झालो. आजकाल आमचे लाडके बाप्पा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमधून विराजमान होऊन आमच्याकडे येतात. आम्हाला गणपती बाप्पाला विराजमान तर करायचे असते, पण महाग नको म्हणून प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तीमधील बाप्पांना घातक रंगासहीत आम्ही विराजमान करतो.दहा दिवस अगदीच मनोभावे पूजा अर्चना केल्यानंतर आम्हाला लगबग असते ती बाप्पांना विसर्जित करण्याची. गणरायांना आम्ही सार्वजनिक अथवा नैसर्गिक स्वच्छ जलस्रोतांमध्ये भक्तिभावाने विसर्जित करतो. प्लॅस्टर ऑफ पॅरिसमुळे आणि रासायनिक रंगांमुळे गणराया प्रत्यक्षात विसर्जित होतच नाहीत. आम्ही मात्र बाप्पांचे विसर्जन झालेय या पूज्य भावनेने घरी जाऊन प्रसादाचे वाटप करतो. इकडे आमचे लाडके बाप्पा मात्र पाण्यात इतस्तत: पडून विसर्जित होण्याची वाट पाहत आहेत.एरवी प्रशासन स्वच्छतेच्या बाबतीत काहीच करीत नाहीत असे ओरडणारे आम्ही सर्वत्र प्रदूषण करीत असतो. स्थानिक प्रशासन मात्र विसर्जनाच्या दुसऱ्या दिवसापासून उपलब्ध मानव यंत्रणेला सोबत घेऊन जलस्रोत स्वच्छ करण्यासाठी आणि आमच्या आराध्य गणरायाची विटंबना रोखण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहे. दैवतांचे देवत्व आणि पर्यावरणाचे संरक्षण हेसुद्धा धार्मिक कार्यच आहे. धर्माचे पालन उन्मादाने नव्हे तर उन्मेषाने केले पाहिजे.- मिलिंद देशपांडेशिक्षक (यवतमाळ)

टॅग्स :Ganesh Visarjanगणेश विसर्जन