शहरं
Join us  
Trending Stories
1
'दक्षिणेतील लोक आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
2
४ जूनच्या निकालानंतर सगळं स्पष्ट होईल; शरद पवारांच्या विधानावर पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
सॅम पित्रोदांनी ईशान्य आणि दक्षिण भारतातील लोकांच्या रंगावरून केलेल्या टिप्पणीला मोदींचं प्रत्युत्तर, म्हणाले...   
4
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
5
उत्तर मुंबईतील सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रीत करणार; पीयूष गोयल यांनी दिली ग्वाही
6
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर; ४ जागांसाठी 'या' तारखेला मतदान
7
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
परशुराम जन्मोत्सव: विष्णूंचा सहावा अवतार, शस्त्र-शास्त्रात पारंगत चिरंजीव; वाचा, महात्म्य
9
अरे देवा! ब्युटी पार्लरमध्ये भेटल्या, एकमेकींच्या प्रेमात पडल्या अन् घरातून पळाल्या; कोर्ट म्हणतं...
10
...अन् सुरेश रैनाने सिद्धार्थ जाधवला मारली मिठी, अभिनेता म्हणाला- "तुम्ही माझं कौतुक केलं..."
11
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
12
30 वर्ष सहन केला नवऱ्याचा अत्याचार; बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्रीचे लग्नानंतर झाले अतोनात हाल
13
Babar Azam म्हणजे बिन कामाचा भाऊ; पाकिस्तानातील अभिनेत्रींनी कर्णधाराची उडवली खिल्ली
14
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
15
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?
16
रश्मिका मंदानाला विसरा, आता ही साऊथ अभिनेत्री बनली 'नॅशनल क्रश'; दुप्पट केलं मानधन
17
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
18
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
19
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
20
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  

वाहतूक सुरू होताच एसटीचे उत्पन्न ३७ लाखांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 5:00 AM

दिवाळीनंतर लांब पल्ल्यांच्या गाड्यांना पहिली पसंती मिळाली आहे. याशिवाय ग्रामीण भागातील बसफेऱ्या सर्वाधिक उत्पन्न मिळवून देत आहे. लांब पल्ल्यांच्या बसमध्ये अकोला, नागपूर, अमरावती, चंद्रपूर, सांगली, नांदेड या गाड्यांमध्ये सर्वाधिक प्रवासी मिळाले आहे.  दरवर्षी पुण्यावरून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळते. मात्र यावर्षी लॉकडाऊनमुळे सर्व प्रवासी दिवाळीपूर्वीच गावी आल्याने एसटीला या उत्पन्नास मुकावे लागले. पुढील काळात एसटी पूर्वप्रमाणेच उत्पन्न वाढेल.

ठळक मुद्देदररोज ४२ हजार प्रवाशांची वर्दळ

  लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ :   कोरोनामुळे एसटीचा प्रवास बंद झाला होता. राज्य परिवहन महामंडळाने बससेवा सुरू केल्यानंतरही प्रवासी बसमध्ये जाण्यासाठी तयार नव्हते. दिवाळीपूर्वी फार कमी गर्दी बसमध्ये होती. मात्र दिवाळी संपताच हे चित्र बदलले आहे. दर दिवसाला ४२ हजार प्रवासी प्रवास करीत आहे. यातून राज्य परिवहन महामंडळाचे उत्पन्न ३७ लाखांवर पोहोचले आहे. दिवाळीनंतर लांब पल्ल्यांच्या गाड्यांना पहिली पसंती मिळाली आहे. याशिवाय ग्रामीण भागातील बसफेऱ्या सर्वाधिक उत्पन्न मिळवून देत आहे. लांब पल्ल्यांच्या बसमध्ये अकोला, नागपूर, अमरावती, चंद्रपूर, सांगली, नांदेड या गाड्यांमध्ये सर्वाधिक प्रवासी मिळाले आहे. दरवर्षी पुण्यावरून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळते. मात्र यावर्षी लॉकडाऊनमुळे सर्व प्रवासी दिवाळीपूर्वीच गावी आल्याने एसटीला या उत्पन्नास मुकावे लागले. पुढील काळात एसटी पूर्वप्रमाणेच उत्पन्न वाढेल. हे उत्पन्न ७० लाखापर्यंत जाईल, अशी आशा आहे. कोरोना आणि प्रवाशांचा प्रवास सुरक्षित करण्यासाठी सॅनिटायझरचा स्प्रे बंधनकारक करण्यात आला आहे. 

दररोज सॅनिटायझर वाढविण्याची गरजप्रत्येक आगाराने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सॅनिटायझर फवारणी बंधनकारक आहे. मात्र वाढलेली गर्दी पाहता या नियमाचे पालन होत नाही. बसमध्ये प्रवासी खचाखच भरलेले असतात. अशा परिस्थितीत सॅनिटायझरचा फवारा करताच येत नाही. हा फवारा झाल्यास प्रवसी अधिक सुरक्षित होतील.  

फिजिकल डिस्टन्सचा उडतोय बोजवाराबसफेऱ्या कमी आणि प्रवासी जास्त अशा परिस्थितीत बसमध्ये जागा नसल्यामुळे अनेकांना उभे राहात प्रवास करावा लागतो. या परिस्थितीत दोन जागेच्या सीटवर तीन जण बसलेले असतात. कंडक्टरलाही तिकीट काढण्यासाठी दाटीहून पुढे मार्ग काढावा लागतो. 

एसटीचा प्रवास सर्वाधिक सुरक्षितराज्य परिवहन महामंडळाने एसटी बस सुरू करताच खासगी वाहनांकडे प्रवास भाडे कमी झाले आहे. सर्वाधिक सुरक्षित सेवा म्हणून प्रवासी एसटीकडे वळले आहे. ग्रामीण भागातून सर्वाधिक प्रवासीदिवाळीनंतर माहेरी जाण्यासाठी गृहिणी मोठ्या प्रमाणात प्रवासाला निघाल्या आहे. गावखेड्यातून प्रवासी मोठ्या प्रमाणात शहराकडे आणि जिल्ह्यातील इतर गावांकडे वळले. 

टॅग्स :state transportएसटी