शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

बियाणे खरेदीचा व्यवहार ठप्प

By admin | Updated: June 6, 2017 01:28 IST

जिल्ह्यात खरीपाची आठ लाख हेक्टरवर पेरणी केली जाते. मे अखेर पर्यंतच बियाणे खरेदीची शेतकऱ्यांकडून लगबग केली जाते.

कॅश नसल्याचा फटका : ३०० कोटींची उलाढाल थांबलीलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात खरीपाची आठ लाख हेक्टरवर पेरणी केली जाते. मे अखेर पर्यंतच बियाणे खरेदीची शेतकऱ्यांकडून लगबग केली जाते. मात्र यंदा कॅशलेस व्यवस्थेने हा बाजार कोलमडला आहे. जूनचा पहिला आठवडा सुरू होऊनही शेतकऱ्यांकडून बियाणे खरेदीला सुरूवातही नाही. जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून रोख मिळत नाही, त्यांनी कृषी केंद्र चालकाच्या खात्यात आरटीजीएस करण्यासही मनाई केल्याने जवळपास साडेतीनशे कोटींची उलाढाल थांबली आहे. शेतकऱ्यांची खरीपातील बियाणे खरेदीची भिस्त ही तूर आणि भुईमूग या प्रमुख पिकांवर अवलंबून असते. कापूस आणि सोयाबिन मधून जुनी देणी दिली जाते. दैनंदिन गरजा भागविण्यावर या पिकांतून आलेली रक्कम खर्च होते. खरीपाच्या पेरणीसाठी तूर व उन्हाळी भुईमूगच ठेवल्या जातो. यावर्षी दोन्ही पिकात शेतकऱ्यांची फसगत झाली. तुरीला बाजारात किंमत नाही, नाबार्डकडे विकली तर पैसा नाही अशी स्थिती आहे. भुईमूगात तर शेतकऱ्यांना काढणीचा खर्चही हाती येणे शक्य नाही. अशा स्थितीत शेतकरी बियाणे खरेदीसाठी बाजाराकडे फिरकलाच नाही. केवळ खत खरेदीसाठी शासन पॉस मशिन लावणार असल्याने शेतकऱ्यांकडून खतांची खरेदी करण्यात आली आहे. शासनाने खताच्या खरेदीवर नियंत्रण घातल्याने शेतकरी धास्तावून आहेत. मागील वर्षी मे महिन्यातच बियाणे खरेदीला शेतकऱ्यांनी सुरूवात केली. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तब्बल ८० टक्के खरेदी प्रक्रिया पूर्ण झाली होती. यातून साडेतीनशे कोटींची आर्थिक उलाढाल झाली. यावर्षी मंदीसदृश्य स्थिती आहे. शेतकऱ्यांकडे पैसाच नाही. ज्यांच्याकडे आहे त्यांचा बँकेत अडकून पडला आहे. बहुतांश शेतकरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचा खातेधारक आहे. ही बँक शेतकऱ्यांच्या खात्यातून कृषी केंद्र चालकाच्या खात्यात आरटीजीएस करण्यास तयार नाही. त्यामुळे बियाण्याचे मोठे आणि छोटे वितरक सुध्दा अडचणीत आहेत. शेतकरी बियाणे खरेदीसाठी केव्हा बाहेर पडतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अनेकांनी मोठी आर्थिक गुतंवणूक करून ठेवली असून आता व्यापारी सुध्दा अडचणीत सापडला आहे. बँकांनी शेतकऱ्यांना झटपट पीककर्ज मंजूर करून रोख रक्कम दिल्या शिवाय बियाणे खरेदीचा बाजार खुलणार नाही, अशी स्थिती आहे. मान्सून सक्रीय झाला असून जिल्ह्यातही काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. त्यानंतरही शेतकरी बाजारात फिरकताना दिसत नाही. यामुळे बियाणे विक्रेत्या व्यापाऱ्यांनाही हूर-हूर सुटली आहे.