शहरं
Join us  
Trending Stories
1
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
2
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
3
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
4
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
5
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
6
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
7
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
8
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
9
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
10
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
11
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
12
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
13
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
14
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
15
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
16
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
17
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
18
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
19
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
20
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका

बियाणे खरेदीचा व्यवहार ठप्प

By admin | Updated: June 6, 2017 01:28 IST

जिल्ह्यात खरीपाची आठ लाख हेक्टरवर पेरणी केली जाते. मे अखेर पर्यंतच बियाणे खरेदीची शेतकऱ्यांकडून लगबग केली जाते.

कॅश नसल्याचा फटका : ३०० कोटींची उलाढाल थांबलीलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात खरीपाची आठ लाख हेक्टरवर पेरणी केली जाते. मे अखेर पर्यंतच बियाणे खरेदीची शेतकऱ्यांकडून लगबग केली जाते. मात्र यंदा कॅशलेस व्यवस्थेने हा बाजार कोलमडला आहे. जूनचा पहिला आठवडा सुरू होऊनही शेतकऱ्यांकडून बियाणे खरेदीला सुरूवातही नाही. जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून रोख मिळत नाही, त्यांनी कृषी केंद्र चालकाच्या खात्यात आरटीजीएस करण्यासही मनाई केल्याने जवळपास साडेतीनशे कोटींची उलाढाल थांबली आहे. शेतकऱ्यांची खरीपातील बियाणे खरेदीची भिस्त ही तूर आणि भुईमूग या प्रमुख पिकांवर अवलंबून असते. कापूस आणि सोयाबिन मधून जुनी देणी दिली जाते. दैनंदिन गरजा भागविण्यावर या पिकांतून आलेली रक्कम खर्च होते. खरीपाच्या पेरणीसाठी तूर व उन्हाळी भुईमूगच ठेवल्या जातो. यावर्षी दोन्ही पिकात शेतकऱ्यांची फसगत झाली. तुरीला बाजारात किंमत नाही, नाबार्डकडे विकली तर पैसा नाही अशी स्थिती आहे. भुईमूगात तर शेतकऱ्यांना काढणीचा खर्चही हाती येणे शक्य नाही. अशा स्थितीत शेतकरी बियाणे खरेदीसाठी बाजाराकडे फिरकलाच नाही. केवळ खत खरेदीसाठी शासन पॉस मशिन लावणार असल्याने शेतकऱ्यांकडून खतांची खरेदी करण्यात आली आहे. शासनाने खताच्या खरेदीवर नियंत्रण घातल्याने शेतकरी धास्तावून आहेत. मागील वर्षी मे महिन्यातच बियाणे खरेदीला शेतकऱ्यांनी सुरूवात केली. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तब्बल ८० टक्के खरेदी प्रक्रिया पूर्ण झाली होती. यातून साडेतीनशे कोटींची आर्थिक उलाढाल झाली. यावर्षी मंदीसदृश्य स्थिती आहे. शेतकऱ्यांकडे पैसाच नाही. ज्यांच्याकडे आहे त्यांचा बँकेत अडकून पडला आहे. बहुतांश शेतकरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचा खातेधारक आहे. ही बँक शेतकऱ्यांच्या खात्यातून कृषी केंद्र चालकाच्या खात्यात आरटीजीएस करण्यास तयार नाही. त्यामुळे बियाण्याचे मोठे आणि छोटे वितरक सुध्दा अडचणीत आहेत. शेतकरी बियाणे खरेदीसाठी केव्हा बाहेर पडतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अनेकांनी मोठी आर्थिक गुतंवणूक करून ठेवली असून आता व्यापारी सुध्दा अडचणीत सापडला आहे. बँकांनी शेतकऱ्यांना झटपट पीककर्ज मंजूर करून रोख रक्कम दिल्या शिवाय बियाणे खरेदीचा बाजार खुलणार नाही, अशी स्थिती आहे. मान्सून सक्रीय झाला असून जिल्ह्यातही काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. त्यानंतरही शेतकरी बाजारात फिरकताना दिसत नाही. यामुळे बियाणे विक्रेत्या व्यापाऱ्यांनाही हूर-हूर सुटली आहे.