शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

मारेगावला हवे एसटी बसस्थानक

By admin | Updated: December 27, 2014 23:00 IST

तालुक्यातील एकमेव मोठी बाजारपेठ असलेले व तालुक्याचे मुख्यालय असलेले मारेगाव अद्याप बसस्थानकाविना आहे. आणखी किती वर्षे मारेगावकरांना बसस्थानकाची प्रतीक्षा करावी लागेल,

मारेगाव : तालुक्यातील एकमेव मोठी बाजारपेठ असलेले व तालुक्याचे मुख्यालय असलेले मारेगाव अद्याप बसस्थानकाविना आहे. आणखी किती वर्षे मारेगावकरांना बसस्थानकाची प्रतीक्षा करावी लागेल, असा संतप्त प्रश्न सर्वसामान्य उपस्थित करीत आहे.सर्व शासकीय कार्यालये आणि शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची वर्दळ असलेल्या राज्य मार्गावर मारेगाव शहर वसलेले आहे. या शहरात अद्याप बसस्थानक अथवा साधा प्रवासी निवारा नाही. त्यामुळे प्रवाशांनी थांबायचे कुठे, असा प्रश्न पडतो. मागील दोन दशकापासून असलेली बसस्थानकाची मागणी अजूपर्यंत पूर्ण झाली नाही. त्यामुळे आणखी किती दिवस बसस्थानकासाठी प्रतीक्षा करायची, असा प्रश्न प्रवाशी करीत आहे. यवतमाळ-चंद्रपूर या राज्य मार्गावर वसलेले मारेगाव शहर तालुक्यातील १०९ गावांसाठी महत्त्वाचे ठिकाण आहे. येथून सर्व भागात जायला बस मिळत असल्याने या ठिकाणी प्रवाशांची नेहमी वर्दळ असते. यातच भर तालुक्यातील महत्वाची शासकीय कार्यालये शहरात आहेत. तालुक्यातील १०९ गावांतील शेकडो ग्रामस्थ दररोज शासकीय अथवा खासगी कामानिमित्त शहरात येतात. संपूर्ण तालुक्यात मारेगाव येथे एकमेव वरिष्ठ महाविद्यालय आहे. या महाविद्यालयात कला, वाणिज्य व विज्ञान शाखा आहेत. वणीच्या महाविद्यायात प्रवेश न मिळालेले वणी-झरी तालुक्यातील विद्यार्थी तेथे प्रवेश घेतात. त्याचसोबत फॉर्मसी महाविद्यालय, अध्यापक विद्यालय, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कृषी महाविद्यालय, सहा माध्यमिक विद्यालये, तीन कनिष्ठ विद्यालये असल्याने शेकडो विद्यार्थी दररोज येथे येतात. शहरात शासकीय निवासस्थानांची दुरवस्था झाली आहे. शहरात पाणी व खोल्या भाड्याने मिळत नसल्याने बहुतांश शासकीय कर्मचारी बाहेर गावावरून ये-जा करतात. मात्र त्यांच्यासह सामान्य जनतेलाही येथील बस थांबा परिसरात साधे उभे राहायलासुद्धा जागा मिळत नाही. या ठिकाणी असलेला प्रवासी निवारा दोन वर्षांपूर्वी रस्ता रूंदीकरणाच्या नावाखाली जमीनदोस्त केला गेला. दोन वर्षात रस्ता रूंदीकरण झाले नाही, मात्र प्रवासी निवारा जमीनदोस्त झाला. या परिसरातील मोकळ्या जागेवर छोट्या व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. परिणामी प्रवाशांना उभे राहायलाही तेथे जागा नसते. प्रवासी तास न् तास झाडांच्या सावलीत दुकानाच्या आश्रयाने उभे असतात.शहराच्या वाढत्या महत्त्वानुसार येथे कित्येक वर्षांपूर्वीच बसस्थानक होणे आवश्यक होते. मात्र लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे ते होऊ शकले नाही. आता राज्यात व केंद्रात एकाच पक्षाचे सरकार असल्याने आणि खासदार व आमदारही त्याच पक्षाचे असल्याने त्यांनी लक्ष घालून मारेगाव शहरात बसस्थानकाची निर्मिती करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. (शहर प्रतिनिधी)