शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

कर्मकांडापेक्षा आत्मशुद्धी अधिक महत्त्वाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 21:30 IST

कर्मकांड करण्यापेक्षा आत्मशुद्धी अधिक महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन लातूर येथील जीवनदादा पाटील यांनी केले. अनेक दृष्टांत देऊन त्यांनी संयमित जीवनाचे महत्त्व पटवून सांगितले.

ठळक मुद्देजीवनदादा पाटील : दिग्रस येथे भगवान आदिनाथ जन्मोत्सव, शहिदांना श्रद्धांजली

लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : कर्मकांड करण्यापेक्षा आत्मशुद्धी अधिक महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन लातूर येथील जीवनदादा पाटील यांनी केले. अनेक दृष्टांत देऊन त्यांनी संयमित जीवनाचे महत्त्व पटवून सांगितले.येथील दिगंबर जैन मंदिरात आयोजित सोहळ्यात ते बोलत होते. श्री १००८ बाबजी महाराज दिगंबर जैन मंदिरात भगवान आदिनाथ जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. याप्रसंगी पंचकल्याणकांपैकी गर्भकल्याणक व जन्मकल्याणक विधीवत संपन्न झाले. सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी रूपचंदजी जैन होते. तर जीवनदादा पाटील यांचे धर्मविषयक प्रबोधन सोहळ्याचे आकर्षण ठरले. जीवनदादा यांनी केवळ उक्तीतून नव्हेतर कृतीतून सन्यस्त जीवनाचा आदर्श ठेवला. त्यामुळे त्यांच्या वक्तृत्वाचा श्रावकांवर सखोल प्रभाव पडला. ओघवती वाणी साधी व सोपी भाषा शैली उपस्थितांच्या हृदयाचा ठाव घेऊन गेली. धार्मिक वाङ्मयाच्या माध्यमातून नैतिक आचरणाला बळ मिळते. त्यासाठीच धर्मग्रंथांचे वाचन व नियमित स्वाध्याय अपरिहार्य असल्याचे त्यांनी सांगितले.पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांना या धार्मिक सोहळ्यात सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. विंग कमांडर अभिनंदन यांच्या धाडसाला मानवंदना देण्यासाठी ‘अभिनंदन शौर्यवंदन’ असा छोटेखानी कार्यक्रमही घेण्यात आला. त्यात डॉ.अल्फा प्रशांत यांनी अभिनंदन यांच्या पराक्रमाचे शब्दचित्र उपस्थितांसमोर मांडले. ‘कसम मुझे इस मिट्टी की मै देश नही मिटने दुंगा’ ही प्रतिज्ञा सर्वांनी घेतली.संस्थांचे अध्यक्ष डॉ.प्रशांत रोकडे यांनी कार्य अहवाल सादर केला. सूत्रसंचालन डॉ.अल्फा प्रशांत यांनी केले. यशस्वीतेसाठी संस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.