शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
5
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
6
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
7
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
8
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
9
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
10
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
11
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
12
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
13
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
14
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
15
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
16
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
17
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
18
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
19
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...

सरपंचांनो, गुणवत्तापूर्ण कामांवर भर द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 23:27 IST

चौदाव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून गावांना स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सरपंचांना गाव विकासाची मोठी संधी मिळाली आहे.

ठळक मुद्देपोपटराव पवार : जलयुक्त शिवारअंतर्गत कृषी विभागाचा सरपंच मेळावा

ऑनलाईन लोकमतयवतमाळ : चौदाव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून गावांना स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सरपंचांना गाव विकासाची मोठी संधी मिळाली आहे. या संधीचे सोने करीत आता गुणवत्तापूर्ण कामावर भर देण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन आदर्शगाव प्रकल्प समितीचे अध्यक्ष पोपटराव पवार यांनी यवतमाळात केले.रविवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील स्वातंत्र्यसंग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा श्रोतृगृहात आयोजित सरपंच मेळाव्यात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. कृषी विभाग, जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत सरपंच मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होेते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री मदन येरावार होते. तर उद्घाटक म्हणून वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, आमदार डॉ. अशोक उईके, कृषी अधीक्षक नवनाथ कोळपकर, कृषी शास्त्रज्ञ डॉ. प्रमोद यादगीरवार, प्रकल्प संचालक पाटील आणि सर्व उपविभागीय कृषी अधिकारी उपस्थित होते.पोपटराव पवार म्हणाले, गावासाठी योजनांचा महापूर आहे. राज्यात ८२ टक्के भूभाग वरच्या पाण्यावर होणाºया सिंचनावरच विसंबून आहे. गावाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी राजकीय, प्रशासकीय बदलासोबतच समाजव्यवस्था बदलण्याची गरज आहे. त्यासाठी परावलंबी विचार सोडावा लागेल. सिंचनातून गावाला समृद्ध करण्यासाठी पाणी आडवावे लागेल. उपलब्ध पाण्यातून कुठले पीक घ्यायचे याचा विचार करावा लागेल. बाजारात कुठल्या वस्तू विकल्या जातात, याचा विचार करूनच पीक पद्धतीचे नियोजन करावे. समाज तमाशाने बिघडत नाही. कीर्तनाने सुधारत नाही. त्यासाठी स्वत:ची तयारी असावी लागते. तर मी सरपंच का झालो, याचा विचार मनात येणे गरजेचे आहे. चांगल्या कामासाठी आपण पुढे आलो तर गाव आपल्याला मदत करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.भविष्यात शाश्वत शेती आणि शाश्वत आनंदाच्या दिशेने वाटचाल करण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. जिल्ह्यावरील शेतकरी आत्महत्येचा कलंक पुसून काढण्याचे आवाहन यावेळी सरपंचांना करण्यात आले.यावेळी पालकमंत्री मदन येरावार यांनी शेवटच्या घटकापर्यंत योजना पोहोचण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. प्रत्यक्ष काम करून स्वत:च्या कल्पकतेतून गावाचे चित्र बदलण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. पंचायत विकासाचा पाय गाव आणि सरपंचाचे पद असल्याचे ते म्हणाले.उद्घाटनपर भाषणात किशोर तिवारी म्हणाले, गावामध्ये पाण्याचे दुर्भीक्ष्य जाणवत आहे. कृषी संकटावर मात करण्यासाठी विविध प्रयत्न करणे गरजेचे आहे. लोकांना भाषणाची नव्हे तर कृतीची गरज आहे. यावेळी शास्त्रज्ञांचीही भाषणे झालीत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी अधीक्षक नवनाथ कोळपकर यांनी केले. तर सूत्रसंचालन कृषी विकास अधिकारी कैलास वानखडे यांनी केले.

टॅग्स :sarpanchसरपंच