शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

सरपंचांनो, गुणवत्तापूर्ण कामांवर भर द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 23:27 IST

चौदाव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून गावांना स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सरपंचांना गाव विकासाची मोठी संधी मिळाली आहे.

ठळक मुद्देपोपटराव पवार : जलयुक्त शिवारअंतर्गत कृषी विभागाचा सरपंच मेळावा

ऑनलाईन लोकमतयवतमाळ : चौदाव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून गावांना स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सरपंचांना गाव विकासाची मोठी संधी मिळाली आहे. या संधीचे सोने करीत आता गुणवत्तापूर्ण कामावर भर देण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन आदर्शगाव प्रकल्प समितीचे अध्यक्ष पोपटराव पवार यांनी यवतमाळात केले.रविवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील स्वातंत्र्यसंग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा श्रोतृगृहात आयोजित सरपंच मेळाव्यात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. कृषी विभाग, जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत सरपंच मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होेते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री मदन येरावार होते. तर उद्घाटक म्हणून वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, आमदार डॉ. अशोक उईके, कृषी अधीक्षक नवनाथ कोळपकर, कृषी शास्त्रज्ञ डॉ. प्रमोद यादगीरवार, प्रकल्प संचालक पाटील आणि सर्व उपविभागीय कृषी अधिकारी उपस्थित होते.पोपटराव पवार म्हणाले, गावासाठी योजनांचा महापूर आहे. राज्यात ८२ टक्के भूभाग वरच्या पाण्यावर होणाºया सिंचनावरच विसंबून आहे. गावाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी राजकीय, प्रशासकीय बदलासोबतच समाजव्यवस्था बदलण्याची गरज आहे. त्यासाठी परावलंबी विचार सोडावा लागेल. सिंचनातून गावाला समृद्ध करण्यासाठी पाणी आडवावे लागेल. उपलब्ध पाण्यातून कुठले पीक घ्यायचे याचा विचार करावा लागेल. बाजारात कुठल्या वस्तू विकल्या जातात, याचा विचार करूनच पीक पद्धतीचे नियोजन करावे. समाज तमाशाने बिघडत नाही. कीर्तनाने सुधारत नाही. त्यासाठी स्वत:ची तयारी असावी लागते. तर मी सरपंच का झालो, याचा विचार मनात येणे गरजेचे आहे. चांगल्या कामासाठी आपण पुढे आलो तर गाव आपल्याला मदत करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.भविष्यात शाश्वत शेती आणि शाश्वत आनंदाच्या दिशेने वाटचाल करण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. जिल्ह्यावरील शेतकरी आत्महत्येचा कलंक पुसून काढण्याचे आवाहन यावेळी सरपंचांना करण्यात आले.यावेळी पालकमंत्री मदन येरावार यांनी शेवटच्या घटकापर्यंत योजना पोहोचण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. प्रत्यक्ष काम करून स्वत:च्या कल्पकतेतून गावाचे चित्र बदलण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. पंचायत विकासाचा पाय गाव आणि सरपंचाचे पद असल्याचे ते म्हणाले.उद्घाटनपर भाषणात किशोर तिवारी म्हणाले, गावामध्ये पाण्याचे दुर्भीक्ष्य जाणवत आहे. कृषी संकटावर मात करण्यासाठी विविध प्रयत्न करणे गरजेचे आहे. लोकांना भाषणाची नव्हे तर कृतीची गरज आहे. यावेळी शास्त्रज्ञांचीही भाषणे झालीत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी अधीक्षक नवनाथ कोळपकर यांनी केले. तर सूत्रसंचालन कृषी विकास अधिकारी कैलास वानखडे यांनी केले.

टॅग्स :sarpanchसरपंच