शहरं
Join us  
Trending Stories
1
१० टोलनाक्यांवर नवीन टोल प्रणाली सुरु; चाचणीनंतर वर्षभरात देशभर...; गडकरींची लोकसभेला माहिती
2
आता 'या' राज्यात महिलांच्या खात्यात 2100 नाही, थेट 6300 रुपये जमा होणार! सरकारचा मोठा निर्णय, खुद्द मुख्यमंत्र्यांनीच सांगितला नवा 'प्लॅन'
3
FD पेक्षा जास्त परतावा देणाऱ्या 'या' ३ सरकारी योजना: तुमचे भविष्य होईल सुरक्षित, टॅक्समध्येही मोठी सूट!
4
पंतप्रधान मोदींसोबत कारमध्ये काय चर्चा झाली? पुतिन यांनी सांगितला चीनमधील 'तो' किस्सा...
5
"आम्ही कठीण प्रसंगातून जात आहोत...", भावाचं लग्न पुढे ढकलल्यानंतर पलक मुच्छलची प्रतिक्रिया
6
मोबाईलच्या चार्जरमुळे मुलाला लागला शॉक; तुमच्यासोबतही घडू शकते दुर्घटना! 'या' चुका आधीच टाळा
7
२००० मंत्र, २०० वर्ष असाध्य; १९ वर्षीय देवव्रतने ५० दिवसात केलेले दंडक्रम पारायण नेमके काय?
8
गुगल सर्चवर काय काय शोधत होते भारतीय? आत्ताची धर्मेंद्र यांच्या मृत्यूची अफवा ते जानेवारीपर्यंत...
9
तुमचा खिसा हलका होणार! मोबाईल, टीव्ही, एसी आणि गाड्यांच्या दरात ३ ते १० टक्क्यांची वाढ अटळ
10
AUS vs ENG : ऑस्ट्रेलियन सुंदरीचा 'तो' मेसेज अन् अखेर इंग्लंडच्या जो रुटचा शतकी दुष्काळ संपला!
11
पुतिन फक्त लँडलाइन का वापरतात? स्मार्टफोन टाळण्यामागे आहे भीती; हातही लावत नाहीत
12
३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक! IT शेअर्सच्या बळावर सेन्सेक्स-निफ्टी हिरव्या रंगात बंद; टॉप गेनर्स-लूजर्स
13
वक्री गुरूचा गजकेसरी राजयोग: १० राशींना सुख-सुबत्ता, धनलक्ष्मी भरघोस देईल; ५४ तास वरदान काळ!
14
मदीनाहून १८० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या इंडिगो विमानाला बॉम्बची धमकी, अहमदाबादमध्ये आपत्कालीन लँडिंग
15
'पंतप्रधान मोदी कोणाच्याही दबावापुढे झुकणार नाहीत', ट्रम्प यांच्या 'टॅरिफ वॉर'वर व्लादिमीर पुतिन यांनी स्पष्टच सांगितलं
16
पुतीन यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे फाईव्ह स्टार हॉटेल्सची चांदी, किमान भाडं ₹८५ हजारांच्या पार
17
सर्वात कर्जबाजारी देशांमध्ये अमेरिकेचाही आहे समावेश! बलाढ्य देशाला कोण देते कर्ज? जाणून घ्या..
18
"मी सर्वांचा नाश करेन", पूनमच्या शरीरात शिरायचा आत्मा; कुटुंबीयांनी सांगितलं कसं बदललं वागणं?
19
जैशची नवी 'लेडी आर्मी'! मसूद अजहरचा धक्कादायक खुलासा; मोठ्या कटासाठी ५००० हून अधिक महिलांची भरती
20
साधुग्रामसाठी राखीव १५० एकर जागा कुठे गायब झाली?; कुणाच्या आशीर्वादाने?
Daily Top 2Weekly Top 5

सरपंचांनो, गुणवत्तापूर्ण कामांवर भर द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 23:27 IST

चौदाव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून गावांना स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सरपंचांना गाव विकासाची मोठी संधी मिळाली आहे.

ठळक मुद्देपोपटराव पवार : जलयुक्त शिवारअंतर्गत कृषी विभागाचा सरपंच मेळावा

ऑनलाईन लोकमतयवतमाळ : चौदाव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून गावांना स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सरपंचांना गाव विकासाची मोठी संधी मिळाली आहे. या संधीचे सोने करीत आता गुणवत्तापूर्ण कामावर भर देण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन आदर्शगाव प्रकल्प समितीचे अध्यक्ष पोपटराव पवार यांनी यवतमाळात केले.रविवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील स्वातंत्र्यसंग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा श्रोतृगृहात आयोजित सरपंच मेळाव्यात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. कृषी विभाग, जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत सरपंच मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होेते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री मदन येरावार होते. तर उद्घाटक म्हणून वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, आमदार डॉ. अशोक उईके, कृषी अधीक्षक नवनाथ कोळपकर, कृषी शास्त्रज्ञ डॉ. प्रमोद यादगीरवार, प्रकल्प संचालक पाटील आणि सर्व उपविभागीय कृषी अधिकारी उपस्थित होते.पोपटराव पवार म्हणाले, गावासाठी योजनांचा महापूर आहे. राज्यात ८२ टक्के भूभाग वरच्या पाण्यावर होणाºया सिंचनावरच विसंबून आहे. गावाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी राजकीय, प्रशासकीय बदलासोबतच समाजव्यवस्था बदलण्याची गरज आहे. त्यासाठी परावलंबी विचार सोडावा लागेल. सिंचनातून गावाला समृद्ध करण्यासाठी पाणी आडवावे लागेल. उपलब्ध पाण्यातून कुठले पीक घ्यायचे याचा विचार करावा लागेल. बाजारात कुठल्या वस्तू विकल्या जातात, याचा विचार करूनच पीक पद्धतीचे नियोजन करावे. समाज तमाशाने बिघडत नाही. कीर्तनाने सुधारत नाही. त्यासाठी स्वत:ची तयारी असावी लागते. तर मी सरपंच का झालो, याचा विचार मनात येणे गरजेचे आहे. चांगल्या कामासाठी आपण पुढे आलो तर गाव आपल्याला मदत करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.भविष्यात शाश्वत शेती आणि शाश्वत आनंदाच्या दिशेने वाटचाल करण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. जिल्ह्यावरील शेतकरी आत्महत्येचा कलंक पुसून काढण्याचे आवाहन यावेळी सरपंचांना करण्यात आले.यावेळी पालकमंत्री मदन येरावार यांनी शेवटच्या घटकापर्यंत योजना पोहोचण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. प्रत्यक्ष काम करून स्वत:च्या कल्पकतेतून गावाचे चित्र बदलण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. पंचायत विकासाचा पाय गाव आणि सरपंचाचे पद असल्याचे ते म्हणाले.उद्घाटनपर भाषणात किशोर तिवारी म्हणाले, गावामध्ये पाण्याचे दुर्भीक्ष्य जाणवत आहे. कृषी संकटावर मात करण्यासाठी विविध प्रयत्न करणे गरजेचे आहे. लोकांना भाषणाची नव्हे तर कृतीची गरज आहे. यावेळी शास्त्रज्ञांचीही भाषणे झालीत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी अधीक्षक नवनाथ कोळपकर यांनी केले. तर सूत्रसंचालन कृषी विकास अधिकारी कैलास वानखडे यांनी केले.

टॅग्स :sarpanchसरपंच