शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

राळेगावातील ग्रामीण रस्ते बिघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2020 5:00 AM

खैरी ते करणवाडी हा मार्ग गड्ड्यांचा मार्ग म्हणून ओळखला जावू लागला आहे. खैरी फाटा ते आष्टोना, मंगी, दहेगाव मार्ग ग्रामस्थांची परीक्षा घेणारा ठरत आहे. येवती-चहांद-खडकी रस्ता बांधून फार वर्षे झालेली नाहीत. तरी स्थिती वाईट झाली आहे. किन्ही फाटा ते चाचोरा रस्ता झाडगाव-झरगड रस्त्यांना आता नवनिर्माणाची प्रतीक्षा आहे.

ठळक मुद्देस्थिती शोचनीय : चिखल, खड्ड्यातील मार्गापासून मुक्ती कधी? गुजरी, परसोडा, रानवड, रावेरी, खैरी रस्त्यांची

लोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव : तालुक्यातील ग्रामीण रस्त्यांची अनेक ठिकाणी वाट लागली आहे. चिखल आणि खड्ड्यातून जवळपासच्या गावात ये-जा करण्यात ग्रामस्थांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. बिघडलेले रस्ते कधी दुरुस्त होतील, याबाबत ग्रामस्थ लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांना वारंवार विचारणा करीत आहे.काही ठिकाणी रस्त्यांची कामे मंजूर झाली. त्यातील काही कामे सुरू झाली. अनेक अद्यापही अपूर्ण आहेत. अनेक कामे सुरूच झालेली नाही. जिल्हा परिषद सदस्य मंजूर झालेल्या कामाबद्दल माहिती देत असताना बांधकाम अभियंते त्यास दुजोरा देत नाही. कृषी हंगाम सुरू झाला आहे. पुढे सर्वच महत्त्वाचे सण समोर आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी आता बिघडलेले रस्ते सुयोग्य करण्यास वेगवान हालचाल करणे अपेक्षित आहे.राळेगाव, गुजरी, नागठाणा, परसोडा रस्त्याचे हाल अत्यंत वाईट आहे. गुजरी-परसोडा रस्ता मंजूर असूनही कामास सुरुवात झालेली नाही. राळेगाव-गुजरी रस्त्याचे खड्डे ग्रामस्थांनी श्रमदानाने मागच्या महिन्यात भरून रस्ता थोडाफार वाहतुकीयोग्य केला. रानवड ते पिंपळगाव रस्ता दोन महिन्यांपासून जैसे थेच आहे. राळेगाव-मोहदा मार्गावरील रावेरी-पिंपळखुटी-वरूड-मोहदा रस्त्याची स्थिती आणखी शोचनीय झाली आहे.खैरी ते करणवाडी हा मार्ग गड्ड्यांचा मार्ग म्हणून ओळखला जावू लागला आहे. खैरी फाटा ते आष्टोना, मंगी, दहेगाव मार्ग ग्रामस्थांची परीक्षा घेणारा ठरत आहे. येवती-चहांद-खडकी रस्ता बांधून फार वर्षे झालेली नाहीत. तरी स्थिती वाईट झाली आहे. किन्ही फाटा ते चाचोरा रस्ता झाडगाव-झरगड रस्त्यांना आता नवनिर्माणाची प्रतीक्षा आहे. धानोरा ते रोहिणी रस्ता दुरुस्तीची मागणी करून ग्रामस्थ थकले आहे. उंदरी ते आदिवासी समाजाची पंढरी असलेल्या जागजई रस्त्याची स्थिती अत्यंत वाईट झाली आहे. अनेकदा अधिकारी व लोकप्रतिनिधींना निवेदने देण्यात आली, पण दुर्लक्ष केले जात आहे. या प्रश्नाकडे गांभिर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.राष्ट्रीय महामार्गावर अपघाताची मालिकाराष्ट्रीय महामार्ग असलेला वडकी-करंजी चारपदरी मार्ग दोन वर्षांच्या आतच खड्डेमय झाल्याने दररोज लहान-मोठे अपघात होवू लागले आहे. देखभाल दुरुस्तीच्या काळात खालावलेले रस्ते ठेकेदाराकडून पुन्हा दुरुस्त करून घेण्यास विभागांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

टॅग्स :Socialसामाजिक