शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

७३० हेक्टर शेतजमीन वर्ग १ मध्ये परावर्तित, ३० गावातील २६८ शेतकऱ्यांना लाभ 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2018 10:30 AM

महसूल विभागाच्यावतीने कार्यक्रम राबवून तब्बल ७३० हेक्टर शेतजमीन वर्ग २ मधून वर्ग १ मध्ये रूपांतरित करण्याची कार्यवाही करण्यात आली.

ठळक मुद्दे महसूल विभागाच्यावतीने कार्यक्रम राबवून तब्बल ७३० हेक्टर शेतजमीन वर्ग २ मधून वर्ग १ मध्ये रूपांतरित करण्याची कार्यवाही करण्यात आली.तहसीलदार अरुण शेलार यांनी पुढाकार घेऊन दारव्हा तालुक्यातील ३० गावातील २६८ शेतकऱ्यांच्या जमिनीचा वर्ग बदलला.शेतजमिनी वर्ग २ मध्ये असल्यामुळे  शेतकऱ्यांना अनेक लाभांपासून वंचित राहावे लागत होते.

मुकेश इंगोले

यवतमाळ - तालुक्यात महसूल विभागाच्यावतीने कार्यक्रम राबवून तब्बल ७३० हेक्टर शेतजमीन वर्ग २ मधून वर्ग १ मध्ये रूपांतरित करण्याची कार्यवाही करण्यात आली. तहसीलदार अरुण शेलार यांनी पुढाकार घेऊन दारव्हा तालुक्यातील ३० गावातील २६८ शेतकऱ्यांच्या जमिनीचा वर्ग बदलल्याने त्यांना अनेक लाभ मिळणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पायलट स्किम अंतर्गत मध्यप्रदेश जमीन महसूल संहिता १९५४ चे कलम १६४ (३) अन्वये भूमिधारी धारणाधिकाराकाराने किंवा हस्तांतरणाच्या हक्कावरील निर्बंधासह भूमिस्वामी हक्कान्वे वाटप करण्यात आलेल्या जमिनींचा धारणाधिकार भोगवटदार वर्ग १ मध्ये रूपांतरित करण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार तहसील कार्यालयाच्या वतीने कार्यक्रम राबविण्यात आला. ज्या नागरिकांकडे मध्यप्रदेश जमीन महसूल संहिता १९५४ च्या तरतुदीनुसार जमीन वाटप केल्याचा पुरावा, सनद, हक्क नोंदणी आदी कागदपत्रे उपलब्ध आहे त्यांच्या जमिनीचा वर्ग बदलण्याची कार्यवाही करण्यात आली.

तालुक्यातील राजुरा, कुऱ्हाड, कुंड, साजेगाव, ब्रह्मनाथ, निळोण, शिंदी, तळेगाव, इरथळ, मांगकिन्ही, हरू, उमरी, ईजारा, वागद (खु.), लोही, सेवादासनगर, जवळा, शेलोडी, गणेशपूर, सावळी, दुधगाव, वाकी,महागाव(क.), चिकणी, लाखखिंड, वडगाव(आंध), मोझर तरोडा, सावळी, पळशी या तीस गावातील २६८ शेतकऱ्यांची ७३० हेक्टर जमीन वर्ग २ मधून वर्ग १ मध्ये रुपांतरीत करण्यात आली. यापूर्वी  या सर्व शेतजमिनी वर्ग २ मध्ये असल्यामुळे  शेतकऱ्यांना अनेक लाभांपासून वंचित राहावे लागत होते. परंतु २१ एप्रिल २०१८ च्या शासन राजपत्रांन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ कलम २९ मध्ये सुधारणा करण्यात आली. कलम २९ चे पोटकलम (३) खंड (ब) उपखंड (एक) वगळण्यात आल्यामुळे शेतजमिनीच्या वर्गात हा बदल करण्यात आला असून याचे अनेक फायदे संबंधित शेतकऱ्यांना मिळणार आहे.

दारव्हा तालुका जिल्ह्यात अव्वल 

विभागीय आयुक्तांनी विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये हा कार्यक्रम राबविण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात या शेतजमिनीच्या वर्गांमध्ये बदल करण्यात आला असला तरी याबाबतीत दारव्हा तहसील कार्यालयाची कामगिरी जिल्ह्यात अव्वल ठरल्याचे बोलले जात आहे. कमी वेळात मोठ्या प्रमाणातील शेतकऱ्यांना लाभ मिळाल्याने महसूलच्या कार्यवाहीबाबत समाधान व्यक्त केलं जात आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीYavatmalयवतमाळ