शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
2
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
3
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
4
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
5
Rohini Acharya : "मला घाणेरड्या शिव्या दिल्या, मारायला चप्पल उचलली, आई-वडिलांना..."; रोहिणी यांची भावुक पोस्ट
6
प्यार किया तो डरना क्या! ८३ वर्षीय आजीच्या प्रेमात वेडा झाला २३ वर्षांचा तरुण, कुटुंबाने दिली साथ
7
याला म्हणतात धमाका शेअर...! फक्त 2 वर्षांत दिला 16000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल आता 5 बोनस शेअर वाटणार कंपनी
8
जैश टेरर मॉड्यूलवर मोठी कारवाई: अनंतनागमध्ये छाप्यानंतर हरियाणाची महिला डॉक्टर ताब्यात
9
अ‍ॅसिड फेकलं, छतावरुन ढकललं; 'तो' वाद टोकाला गेला, नवरा थेट बायकोच्या जीवावर उठला
10
Mumbai: वाकोला ते बीकेसी उन्नत मार्गाचे ८० टक्के काम पूर्ण; लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार!
11
गोरखपूरमध्ये उभारलं जातंय जागतिक दर्जाचे विज्ञान उद्यान; योगी सरकारने घेतला मोठा निर्णय
12
National Jamboree: ६१ वर्षांनंतर लखनौत ऐतिहासिक 'राष्ट्रीय जंबोरी'; ३२,००० हून अधिक स्काउट्स होणार सहभागी
13
घरबसल्या पैसे दुप्पट कसे होतील? तेजस्वी प्रकाशने सांगितला फॉर्म्युला, मुलींना दिला आर्थिक सल्ला
14
Mumbai: मुंबई महापालिकेच्या ३०० कोटींच्या उद्यान देखभालीच्या निविदा प्रक्रियेत संशयाच्या भोवरा
15
बिहार निवडणूक; 'या' मतदारसंघात भाजप उमेदवाराचा अवघ्या 30 मतांनी पराभव
16
IPL 2026 : रवींद्र जडेजाच्या पगारात ४ कोटींची कपात होण्यामागचं कारण काय? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
17
Tata Sierra आता नव्या रुपता! मिळणार ट्रिपल स्क्रीन सेटअप अन् अ‍ॅडव्हॉन्स फीचर्स, किती असेल किंमत? जाणून घ्या सविस्तर
18
BMC Election: सर्वपक्षीय १२८ माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेला पालिकेत हव्या १२५ जागा!
19
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: कसे कराल व्रत? शिवशंकर देतील शुभाशिर्वाद, कल्याण-मंगलच होणार!
20
Cyber Security: सर्वांचा डेटा आता होणार सुरक्षित, पुढील १८ महिन्यांत नियम आणखी कडक होणार!
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस मुख्यालयात पाण्यासाठी हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 22:44 IST

पाण्याच्या भीषण टंचाईने सारेच वैतागले आहेत. शासकीय वसाहतीमधील कुटुंबांचेही पाण्यासाठी मोठे हाल होत आहेत. पोलीस मुख्यालयातील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना तर टंचाईची मोठी झळ बसली आहे.

ठळक मुद्देकर्मचाऱ्यांचे कुटुंबीय त्रस्त : मध्यरात्री हापशीवर ठिय्या, कर्तव्य बजावल्यावर पाण्याचा शोध

रुपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पाण्याच्या भीषण टंचाईने सारेच वैतागले आहेत. शासकीय वसाहतीमधील कुटुंबांचेही पाण्यासाठी मोठे हाल होत आहेत. पोलीस मुख्यालयातील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना तर टंचाईची मोठी झळ बसली आहे. दिवसभर कर्तव्य बजावल्यानंतर पोलिसांना रात्री मुलाबाळांसह पाण्यासाठी जाण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे, याची वाच्यताही कोणाकडे करता येत नाही. केली तर कारवाईची भीती आहे. यामुळे मुख्यालयातील सारेच कुटुंब पेचात सापडले आहेत.तहसील कार्यालयालगत असलेल्या पोलीस मुख्यालयात शेकडो कुटुंब राहतात. या कुटुंबांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सर्वाधिक गंभीर आहे. मात्र हा प्रश्न सोडविण्यासाठी पोलीस प्रशासनाने कुठलीही दखल घेतली नाही.पोलीस मुख्यालयात पाणी वितरण करण्यासाठी स्वतंत्र टँकर आहे. मात्र हे टँकर आठ दिवसांत एकदाच आणि एकच फेरी मारते. या फेरीत एक ड्रमभर पाणी मिळते. इतके पाणी आठ दिवस कसे पुरवावे, हा प्रश्न येथील रहिवाशांना पडलेला आहे. या ठिकाणी जीवन प्राधिकरणाचा नळ आहे. २० ते २५ दिवसानंतर नळ येत आहेत. त्यातही तासभराच्या वर पाणी मिळत नाही. या पाण्यावर काहीच भागत नाही. मुख्यालयाच्या परिसरात दोन हापशाही आहेत. पण त्या बंद पडल्या आहेत. यामुळे पोलीस मुख्यालयाबाहेर असलेल्या शिवमंदिराजवळील हापशीवरूनच पाणी भरावे लागत आहे. या ठिकाणी मोठी गर्दी असते. रात्रीला तासन्तास थांबल्यानंतरच पिण्याचे पाणी अन् वापराचे पाणी भरल्या जाते. या भागात ‘स्ट्रिट लाईट’ नाही. यामुळे रात्री अंधारात पाणी आणावे लागते.दिवसा कर्तव्य बजावल्यानंतर रात्री पाणी भरण्याची वेळ पोलिसांवर आली आहे. यामुळे पोलीस कर्मचाºयांच्या कुटुंबीयांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर आहे. मात्र पर्याय नाही. म्हणून सारेच निमूटपणे सहन करीत आहेत.टंचाईतही वर्दीचा रूबाबघरचे सगळे कपडे बाजूला ठेवून आधी वर्दी धुवावी लागते. अनेक गृहिणी तर त्यासाठीच पाणी वाचवून ठेवतात. मोजकेच कपडे धुवून पाण्याची बचत केली जाते आणि वर्दी मात्र स्वच्छ ठेवली जाते. टंचाईतही पोलीस कुटुंबीय वर्दीचा रूबाब राखतात, हे येथे दिसून आले.पाण्याला दुर्गंध, अंगाला खाजअनेक वेळा वितरित होणाऱ्या पाण्याला वास येतो. यातून अंगाला खाज सुटण्यासारखे प्रकारही घडत आहेत. यामुळे पाणी उकळून पिले जाते. पाण्याचे बॅरल आणावे लागतात. अन्यथा जीवन प्राधिकरणाच्या टाकीवरून पाणी आणावे लागते. त्याकरिताही लांबच लांब रांगा असतात. हातरिक्षा, आॅटोरिक्षावरून पाणी आणले जात आहे.मुलभूत सुविधांचा अभावया ठिकाणी स्वच्छता, नाल्यांची साफसफाई, स्ट्रिट लाईट, शुद्ध पाण्याची व्यवस्था या सुविधांचा अभाव दिसून येतो. मात्र त्याची वरिष्ठांकडे तक्रार करण्यासाठी कोणीही पुढे येत नाही.पाहुण्यांना बंदीपोलीस मुख्यालयात पाण्याची भीषण स्थिती आहे. यामुळे येथील नागरिकांनी पाहुण्यांना न येण्याच्या सूचना दिल्या आहेत. अनेक कुटुंब पाण्यासाठी बाहेरगावी जाण्याच्याही तयारीत आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई