शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

पोलीस मुख्यालयात पाण्यासाठी हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 22:44 IST

पाण्याच्या भीषण टंचाईने सारेच वैतागले आहेत. शासकीय वसाहतीमधील कुटुंबांचेही पाण्यासाठी मोठे हाल होत आहेत. पोलीस मुख्यालयातील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना तर टंचाईची मोठी झळ बसली आहे.

ठळक मुद्देकर्मचाऱ्यांचे कुटुंबीय त्रस्त : मध्यरात्री हापशीवर ठिय्या, कर्तव्य बजावल्यावर पाण्याचा शोध

रुपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पाण्याच्या भीषण टंचाईने सारेच वैतागले आहेत. शासकीय वसाहतीमधील कुटुंबांचेही पाण्यासाठी मोठे हाल होत आहेत. पोलीस मुख्यालयातील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना तर टंचाईची मोठी झळ बसली आहे. दिवसभर कर्तव्य बजावल्यानंतर पोलिसांना रात्री मुलाबाळांसह पाण्यासाठी जाण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे, याची वाच्यताही कोणाकडे करता येत नाही. केली तर कारवाईची भीती आहे. यामुळे मुख्यालयातील सारेच कुटुंब पेचात सापडले आहेत.तहसील कार्यालयालगत असलेल्या पोलीस मुख्यालयात शेकडो कुटुंब राहतात. या कुटुंबांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सर्वाधिक गंभीर आहे. मात्र हा प्रश्न सोडविण्यासाठी पोलीस प्रशासनाने कुठलीही दखल घेतली नाही.पोलीस मुख्यालयात पाणी वितरण करण्यासाठी स्वतंत्र टँकर आहे. मात्र हे टँकर आठ दिवसांत एकदाच आणि एकच फेरी मारते. या फेरीत एक ड्रमभर पाणी मिळते. इतके पाणी आठ दिवस कसे पुरवावे, हा प्रश्न येथील रहिवाशांना पडलेला आहे. या ठिकाणी जीवन प्राधिकरणाचा नळ आहे. २० ते २५ दिवसानंतर नळ येत आहेत. त्यातही तासभराच्या वर पाणी मिळत नाही. या पाण्यावर काहीच भागत नाही. मुख्यालयाच्या परिसरात दोन हापशाही आहेत. पण त्या बंद पडल्या आहेत. यामुळे पोलीस मुख्यालयाबाहेर असलेल्या शिवमंदिराजवळील हापशीवरूनच पाणी भरावे लागत आहे. या ठिकाणी मोठी गर्दी असते. रात्रीला तासन्तास थांबल्यानंतरच पिण्याचे पाणी अन् वापराचे पाणी भरल्या जाते. या भागात ‘स्ट्रिट लाईट’ नाही. यामुळे रात्री अंधारात पाणी आणावे लागते.दिवसा कर्तव्य बजावल्यानंतर रात्री पाणी भरण्याची वेळ पोलिसांवर आली आहे. यामुळे पोलीस कर्मचाºयांच्या कुटुंबीयांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर आहे. मात्र पर्याय नाही. म्हणून सारेच निमूटपणे सहन करीत आहेत.टंचाईतही वर्दीचा रूबाबघरचे सगळे कपडे बाजूला ठेवून आधी वर्दी धुवावी लागते. अनेक गृहिणी तर त्यासाठीच पाणी वाचवून ठेवतात. मोजकेच कपडे धुवून पाण्याची बचत केली जाते आणि वर्दी मात्र स्वच्छ ठेवली जाते. टंचाईतही पोलीस कुटुंबीय वर्दीचा रूबाब राखतात, हे येथे दिसून आले.पाण्याला दुर्गंध, अंगाला खाजअनेक वेळा वितरित होणाऱ्या पाण्याला वास येतो. यातून अंगाला खाज सुटण्यासारखे प्रकारही घडत आहेत. यामुळे पाणी उकळून पिले जाते. पाण्याचे बॅरल आणावे लागतात. अन्यथा जीवन प्राधिकरणाच्या टाकीवरून पाणी आणावे लागते. त्याकरिताही लांबच लांब रांगा असतात. हातरिक्षा, आॅटोरिक्षावरून पाणी आणले जात आहे.मुलभूत सुविधांचा अभावया ठिकाणी स्वच्छता, नाल्यांची साफसफाई, स्ट्रिट लाईट, शुद्ध पाण्याची व्यवस्था या सुविधांचा अभाव दिसून येतो. मात्र त्याची वरिष्ठांकडे तक्रार करण्यासाठी कोणीही पुढे येत नाही.पाहुण्यांना बंदीपोलीस मुख्यालयात पाण्याची भीषण स्थिती आहे. यामुळे येथील नागरिकांनी पाहुण्यांना न येण्याच्या सूचना दिल्या आहेत. अनेक कुटुंब पाण्यासाठी बाहेरगावी जाण्याच्याही तयारीत आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई