शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस मुख्यालयात पाण्यासाठी हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 22:44 IST

पाण्याच्या भीषण टंचाईने सारेच वैतागले आहेत. शासकीय वसाहतीमधील कुटुंबांचेही पाण्यासाठी मोठे हाल होत आहेत. पोलीस मुख्यालयातील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना तर टंचाईची मोठी झळ बसली आहे.

ठळक मुद्देकर्मचाऱ्यांचे कुटुंबीय त्रस्त : मध्यरात्री हापशीवर ठिय्या, कर्तव्य बजावल्यावर पाण्याचा शोध

रुपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पाण्याच्या भीषण टंचाईने सारेच वैतागले आहेत. शासकीय वसाहतीमधील कुटुंबांचेही पाण्यासाठी मोठे हाल होत आहेत. पोलीस मुख्यालयातील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना तर टंचाईची मोठी झळ बसली आहे. दिवसभर कर्तव्य बजावल्यानंतर पोलिसांना रात्री मुलाबाळांसह पाण्यासाठी जाण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे, याची वाच्यताही कोणाकडे करता येत नाही. केली तर कारवाईची भीती आहे. यामुळे मुख्यालयातील सारेच कुटुंब पेचात सापडले आहेत.तहसील कार्यालयालगत असलेल्या पोलीस मुख्यालयात शेकडो कुटुंब राहतात. या कुटुंबांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सर्वाधिक गंभीर आहे. मात्र हा प्रश्न सोडविण्यासाठी पोलीस प्रशासनाने कुठलीही दखल घेतली नाही.पोलीस मुख्यालयात पाणी वितरण करण्यासाठी स्वतंत्र टँकर आहे. मात्र हे टँकर आठ दिवसांत एकदाच आणि एकच फेरी मारते. या फेरीत एक ड्रमभर पाणी मिळते. इतके पाणी आठ दिवस कसे पुरवावे, हा प्रश्न येथील रहिवाशांना पडलेला आहे. या ठिकाणी जीवन प्राधिकरणाचा नळ आहे. २० ते २५ दिवसानंतर नळ येत आहेत. त्यातही तासभराच्या वर पाणी मिळत नाही. या पाण्यावर काहीच भागत नाही. मुख्यालयाच्या परिसरात दोन हापशाही आहेत. पण त्या बंद पडल्या आहेत. यामुळे पोलीस मुख्यालयाबाहेर असलेल्या शिवमंदिराजवळील हापशीवरूनच पाणी भरावे लागत आहे. या ठिकाणी मोठी गर्दी असते. रात्रीला तासन्तास थांबल्यानंतरच पिण्याचे पाणी अन् वापराचे पाणी भरल्या जाते. या भागात ‘स्ट्रिट लाईट’ नाही. यामुळे रात्री अंधारात पाणी आणावे लागते.दिवसा कर्तव्य बजावल्यानंतर रात्री पाणी भरण्याची वेळ पोलिसांवर आली आहे. यामुळे पोलीस कर्मचाºयांच्या कुटुंबीयांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर आहे. मात्र पर्याय नाही. म्हणून सारेच निमूटपणे सहन करीत आहेत.टंचाईतही वर्दीचा रूबाबघरचे सगळे कपडे बाजूला ठेवून आधी वर्दी धुवावी लागते. अनेक गृहिणी तर त्यासाठीच पाणी वाचवून ठेवतात. मोजकेच कपडे धुवून पाण्याची बचत केली जाते आणि वर्दी मात्र स्वच्छ ठेवली जाते. टंचाईतही पोलीस कुटुंबीय वर्दीचा रूबाब राखतात, हे येथे दिसून आले.पाण्याला दुर्गंध, अंगाला खाजअनेक वेळा वितरित होणाऱ्या पाण्याला वास येतो. यातून अंगाला खाज सुटण्यासारखे प्रकारही घडत आहेत. यामुळे पाणी उकळून पिले जाते. पाण्याचे बॅरल आणावे लागतात. अन्यथा जीवन प्राधिकरणाच्या टाकीवरून पाणी आणावे लागते. त्याकरिताही लांबच लांब रांगा असतात. हातरिक्षा, आॅटोरिक्षावरून पाणी आणले जात आहे.मुलभूत सुविधांचा अभावया ठिकाणी स्वच्छता, नाल्यांची साफसफाई, स्ट्रिट लाईट, शुद्ध पाण्याची व्यवस्था या सुविधांचा अभाव दिसून येतो. मात्र त्याची वरिष्ठांकडे तक्रार करण्यासाठी कोणीही पुढे येत नाही.पाहुण्यांना बंदीपोलीस मुख्यालयात पाण्याची भीषण स्थिती आहे. यामुळे येथील नागरिकांनी पाहुण्यांना न येण्याच्या सूचना दिल्या आहेत. अनेक कुटुंब पाण्यासाठी बाहेरगावी जाण्याच्याही तयारीत आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई