शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर आमदारकीचा राजीनामा देईन; आमदार मंदा म्हात्रेंचं गणेश नाईकांना चॅलेंज, भाजपात वाद पेटला
2
'अश्रू, आक्रोश अन् उद्रेक'; तिकीट नाकारल्याने निष्ठावंतांचा संभाजीनगर भाजप कार्यालयात राडा
3
नाशिकमध्ये थरार! AB फॉर्म घेऊन जाणाऱ्या कारचा पाठलाग, भाजपा इच्छुकांचा कारनामा
4
“बहुजन विकास आघाडीचा वसई-विरार निवडणुकीतही पराभव करू, आमचाच महापौर होईल”: स्नेहा दुबे पंडित
5
शक्तिप्रदर्शन करत आला, पण अर्जच विसरला! धापा टाकत कार्यकर्ता अखेर अर्ज घेऊन आला
6
२०२५ सरता सरता...! Google वर '67' सर्च करताच तुमची स्क्रीन थरथरू लागतेय? तुम्हीही करून पहा...
7
VIDEO: 'धुरंधर' फिव्हर सुरूच! चिमुरडीचा FA9LA गाण्यावरील जबरदस्त डान्स सोशल मीडियावर VIRAL
8
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर जोरदार आपटले; Silver ₹३९७३ नं घसरली, Gold किती झालं स्वस्त? पटापट पाहा रेट्स
9
Amit Shah : Video - "बंगालमधील घुसखोरी संपवणार, प्रत्येकाला शोधून बाहेर काढणार", अमित शाह कडाडले
10
एचआयव्ही पॉझिटिव्ह कर्मचाऱ्याला दिलासा; नोकरी कायम करण्याचे हायकाेर्टाने दिले निर्देश
11
"पक्षासाठी केसेस अंगावर, तिकीट मात्र दुसऱ्यांना"; संभाजीनगरात भाजप पदाधिकाऱ्यांचा राडा
12
मनपा निवडणुकांसाठी ठाकरे बंधूंच्या किती संयुक्त सभा होणार?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
13
नाराजी टाळण्यासाठी एबी फॉर्मबाबत सस्पेन्स, उमेदवारीसाठी आज अखेरचा दिवस : युतीची शक्यता कमीच
14
उद्धवसेना, मनसेने अमराठी उमेदवारांनाही दिलं तिकीट; 'मराठीचा नारा' देणाऱ्या ठाकरे बंधूंचं काय आहे 'गणित'?
15
जालना मनपा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा; शिंदेसेना-भाजपात १२ प्रभागांतील जागांवर एकमत
16
Nashik Municipal Corporation Election : नाशकात शिंदेसेना-राष्ट्रवादी एकत्र; महायुतीत फूट तर मविआत एकजूट, भाजपकडून 'ही' नावं निश्चित
17
काहीतरी मोठं घडणार! चीनची आक्रमक हालचाल, तैवानला सैन्याने वेढा घातला; विमानांची उड्डाणेही रद्द
18
Nashik Municipal Election 2026: आमदारांच्या वारसांचा पत्ता कट; पक्षाचा निर्णय शिरसावंद्य, हिरे, फरांदे माघार घेणार
19
वादळाने दृष्टी हिरावली, 'दिव्यदृष्टी'ने भाकितं वर्तवली; बाबा वेंगा कोण होत्या? त्यांनी खरंच हे सगळं लिहून ठेवलंय?
20
फोटोग्राफर, प्रोड्यूसर, नॅशनल लेव्हल फुटबॉलपटू... कोण आहे प्रियंका गांधींची होणारी सून?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील २०७ तालुक्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस; किडीच्या प्रादुर्भावाने शेतकरी संकटात असताना आता पिकांवरच संक्रात

By रूपेश उत्तरवार | Updated: August 7, 2025 12:30 IST

अशा स्थितीत पिकांची वाढ करण्यासाठी लागणाऱ्या खतांचा तुटवडा निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे किडींचे आक्रमण झाले आहे. यातून खरिपाच्या उत्पादनाला मोठा फटका बसण्याचा धोका आहे...

रूपेश उत्तरवारयवतमाळ : संपूर्ण राज्यभरात १० दिवस उशिरा पेरण्या सुरू झाल्या. आता पावसाने पाठ फिरविल्याने विदर्भ-भराठवाड्यातील  पिके संकटात सापडली आहेत. राज्यातील २०७ तालुक्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यात उन्हाचा चटका वाढल्याने पिके काेमेजत आहेत. पिकांची वाढ खुंटली आहे. अशा स्थितीत पिकांची वाढ करण्यासाठी लागणाऱ्या खतांचा तुटवडा निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे किडींचे आक्रमण झाले आहे. यातून खरिपाच्या उत्पादनाला मोठा फटका बसण्याचा धोका आहे.संपूर्ण राज्यभरात ३५८ तालुके आहेत. यातील २०७ तालुक्यांमध्ये निर्धारित क्षमतेपेक्षा कमी पाऊस कोसळला आहे. यामुळे पिकांची परिस्थिती नाजूक झाली आहे. यात विदर्भ आणि मराठवाड्यातील तालुक्यांचा समावेश आहे. या ठिकाणचे कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद ही पिके संकटात सापडली आहेत. वाढीच्या अवस्थेत पाणी न मिळाल्याने पिके कोमेजण्यास सुरुवात झाली आहे. यात अल्पावधीत हाती येणाऱ्या पिकांचे मोठे नुकसान होण्याचा धोका आहे.

पावसाची टक्केवारी २५ ते ५० टक्के पाऊस बरसलेले १० तालुके ५० ते ७५ टक्के पाऊस बरसणारे ६७ तालुके ७५ ते १०० टक्के पाऊस  १४० तालुके १०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस १३७ तालुके 

सोलापुरात पाच तासात १०९ मिमी पाऊससोलापूर : जुलै महिन्यातील कसर भरून काढताना बुधवार, ६ ऑगस्ट रोजी शहरात पाऊस धो-धो बरसला. मध्यरात्री २ वाजता सुरू झालेला पाऊस सकाळी ८ वाजेपर्यंत पडत होता. पाच तासांत १०९ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली असून, घरांमध्ये आणि शाळांमध्येही पाणी शिरले आहे.

एक कोटी ३७ लाख हेक्टरवर पेरण्याराज्यात एक कोटी ४४ लाख हेक्टरपैकी एक कोटी ३७ लाख हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. या ठिकाणी पिकांच्या वाढीसाठी खतांचा तुटवडा निर्माण झाला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात पिकांवर हुमणी अळीचा उद्रेक वाढला आहे.यातून शेत शिवार उधवस्त होत आहेत. मे महिन्याच्या अखेरीस जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसला. जून, जुलै महिन्यांत अपुरा पाऊस बरसला. ऑगस्टमध्ये आता कडकडीत ऊन पडत आहे.  यातून शेतकरी धास्तावले आहेत.

यवतमाळ जिल्ह्यात वीज पडून पाच जणांचा मृत्यूयवतमाळ : शेतात काम करताना अंगावर वीज पडून जिल्ह्यात पाच जणांचा मृत्यू झाला. वणी तालुक्यातील अडेगाव खंड क्रमांक दोन, पांढरकवडा तालुक्यातील गोपालपूर आणि यवतमाळ तालुक्यातील रोहटेक शेतशिवारात या घटना घडल्या.

 

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी