शहरं
Join us  
Trending Stories
1
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
2
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
3
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
4
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
5
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
6
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
7
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
8
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
9
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
10
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
11
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?
12
खळबळजनक! पोलीस अधिकारी बनून गरब्याला VIP एन्ट्री; आयोजकांना संशय येताच पोलखोल अन्...
13
Maruti ची ऐतिहासिक कामगिरी; फोर्ड आणि फॉक्सवॅगनरख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकले...
14
रॉकेट बनला हा स्मॉलकॅप शेअर, जपानच्या कंपनीसोबत डील; सचिन तेंडुलकरचीही आहे गुंतवणूक
15
विद्यार्थ्याला मारहाण अन् उलटे टांगल्या प्रकरणी मुख्याध्यापक, ड्रायव्हरला अटक; शाळा बंद केली
16
Dussehra 2025: मृत्युच्या शेवटच्या क्षणी रावणाने लक्ष्मणाला दिलेला कानमंत्र माहितीय का?
17
अहिल्यानगर: ज्या रांगोळीवरून वाढला तणााव, ती काढणाऱ्याला अटक; एफआरआयमध्ये काय?
18
टीम इंडियानं आशिया कप जिंकताच मोदींनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला, विरोधकांनी असा टोला लगावला
19
“गुवाहाटीतून आणलेले पैसे दिले तर लोकांचा त्रास एका मिनिटात संपेल”; शिंदे गटाला कुणाचा टोला?
20
३ वर्षांत ₹२४१ कोटींची कमाई! एवढा पैसा कुठून आला? स्वतः प्रशांत किशोर यांनी केला खुलासा 

राज्यातील २०७ तालुक्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस; किडीच्या प्रादुर्भावाने शेतकरी संकटात असताना आता पिकांवरच संक्रात

By रूपेश उत्तरवार | Updated: August 7, 2025 12:30 IST

अशा स्थितीत पिकांची वाढ करण्यासाठी लागणाऱ्या खतांचा तुटवडा निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे किडींचे आक्रमण झाले आहे. यातून खरिपाच्या उत्पादनाला मोठा फटका बसण्याचा धोका आहे...

रूपेश उत्तरवारयवतमाळ : संपूर्ण राज्यभरात १० दिवस उशिरा पेरण्या सुरू झाल्या. आता पावसाने पाठ फिरविल्याने विदर्भ-भराठवाड्यातील  पिके संकटात सापडली आहेत. राज्यातील २०७ तालुक्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यात उन्हाचा चटका वाढल्याने पिके काेमेजत आहेत. पिकांची वाढ खुंटली आहे. अशा स्थितीत पिकांची वाढ करण्यासाठी लागणाऱ्या खतांचा तुटवडा निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे किडींचे आक्रमण झाले आहे. यातून खरिपाच्या उत्पादनाला मोठा फटका बसण्याचा धोका आहे.संपूर्ण राज्यभरात ३५८ तालुके आहेत. यातील २०७ तालुक्यांमध्ये निर्धारित क्षमतेपेक्षा कमी पाऊस कोसळला आहे. यामुळे पिकांची परिस्थिती नाजूक झाली आहे. यात विदर्भ आणि मराठवाड्यातील तालुक्यांचा समावेश आहे. या ठिकाणचे कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद ही पिके संकटात सापडली आहेत. वाढीच्या अवस्थेत पाणी न मिळाल्याने पिके कोमेजण्यास सुरुवात झाली आहे. यात अल्पावधीत हाती येणाऱ्या पिकांचे मोठे नुकसान होण्याचा धोका आहे.

पावसाची टक्केवारी २५ ते ५० टक्के पाऊस बरसलेले १० तालुके ५० ते ७५ टक्के पाऊस बरसणारे ६७ तालुके ७५ ते १०० टक्के पाऊस  १४० तालुके १०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस १३७ तालुके 

सोलापुरात पाच तासात १०९ मिमी पाऊससोलापूर : जुलै महिन्यातील कसर भरून काढताना बुधवार, ६ ऑगस्ट रोजी शहरात पाऊस धो-धो बरसला. मध्यरात्री २ वाजता सुरू झालेला पाऊस सकाळी ८ वाजेपर्यंत पडत होता. पाच तासांत १०९ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली असून, घरांमध्ये आणि शाळांमध्येही पाणी शिरले आहे.

एक कोटी ३७ लाख हेक्टरवर पेरण्याराज्यात एक कोटी ४४ लाख हेक्टरपैकी एक कोटी ३७ लाख हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. या ठिकाणी पिकांच्या वाढीसाठी खतांचा तुटवडा निर्माण झाला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात पिकांवर हुमणी अळीचा उद्रेक वाढला आहे.यातून शेत शिवार उधवस्त होत आहेत. मे महिन्याच्या अखेरीस जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसला. जून, जुलै महिन्यांत अपुरा पाऊस बरसला. ऑगस्टमध्ये आता कडकडीत ऊन पडत आहे.  यातून शेतकरी धास्तावले आहेत.

यवतमाळ जिल्ह्यात वीज पडून पाच जणांचा मृत्यूयवतमाळ : शेतात काम करताना अंगावर वीज पडून जिल्ह्यात पाच जणांचा मृत्यू झाला. वणी तालुक्यातील अडेगाव खंड क्रमांक दोन, पांढरकवडा तालुक्यातील गोपालपूर आणि यवतमाळ तालुक्यातील रोहटेक शेतशिवारात या घटना घडल्या.

 

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी