शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

पुसद तालुक्यात भीषण पाणीटंचाईचा पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 10:09 PM

सूर्य आग ओकत असल्यामुळे तालुक्यात भूजल पातळी झपाट्याने खालावली. विहीर, बोअर कोरडे पडले आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर आला. भीषण पाणीटंचाईमुळे तालुक्यातील उन्हाळी पिकांना फटका बसत आहे.

ठळक मुद्देकेळी बागा करपल्या : शेतकरी संकटात, आर्थिक नुकसानीत भर

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : सूर्य आग ओकत असल्यामुळे तालुक्यात भूजल पातळी झपाट्याने खालावली. विहीर, बोअर कोरडे पडले आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर आला. भीषण पाणीटंचाईमुळे तालुक्यातील उन्हाळी पिकांना फटका बसत आहे.उन्हाचा तडाखा सतत वाढत आहे. परिणामी पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर सिंचनाचा प्रश्न उभा ठाकला आहे. शेतात उन्हाळी पीक उभे आहे. मात्र विहीर, बोअर आटल्याने सिंचन करणे अवघड झाले आहे. डोळ्यादेखत पिके वाळत आहे. यामुळे शेतकरी राजा पुरता हतबल झाला आहे. तालुक्यातील सेलू, भोजला, मुंगशी, जामबाजार, एरंडा, कोपरा आदी परिसरात केळीच्या बागा मोठ्या प्रमाणात आहे. मात्र दुष्काळ व अति उष्ण तापमानामुळे बागा करपत आहे. तालुक्यातील शेकडो हेक्टरवरील केळी धोक्यात आल्याने अर्थकारण अडचणीत सापडले. अति उष्ण तापमानामुळे पिल बाग, दुबार बहर असलेली बाग, निसवणीवर आलेले केळीचे धड तुटून नुकसान होत. काही बागांमध्ये केळीचे खोड मधून तुटून पडत आहे. उष्णतेची लाट कायम राहिल्यास नुकसान होणार आहे.पीक जगविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपडयावर्षी तालुक्यावर दुष्काळाचे संकट ओढवले. केळी उत्पादक ठिबक, तुषार सिंचन किंवा प्रसंगी टँकरने पाणी आणून मोठ्या मेहनतीने केळी बाग जगविण्याची धडपड करीत आहे. मात्र अति उष्णेमुळे बागा करपत आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे. केळी बागांचे नुकसान, ही नैसर्गिक आपत्ती मानली जात नसल्याने शेतकºयांना पीक विम्याचा दावा करता येत नाही.

टॅग्स :Farmerशेतकरीwater shortageपाणीटंचाई