शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
3
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
18
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
19
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
20
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत

युती सरकारकडून भ्रष्टाचाराला संरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 10:02 PM

राज्यभरात निर्माण झालेल्या विविध समस्यांना घेऊन जिल्हा काँग्रेस कमिटीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. विविध मागण्या आणि आरोप करणारे निवेदन सादर करण्यात आले. यात प्रामुख्याने सरकारकडून भ्रष्टाचाराला संरक्षण दिले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

ठळक मुद्देकाँग्रेस कमिटीचा आरोप : जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्यभरात निर्माण झालेल्या विविध समस्यांना घेऊन जिल्हा काँग्रेस कमिटीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. विविध मागण्या आणि आरोप करणारे निवेदन सादर करण्यात आले. यात प्रामुख्याने सरकारकडून भ्रष्टाचाराला संरक्षण दिले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.पुराव्यासह भ्रष्टाचार पुढे आणलेला असताना संबंधितांना क्लिन चिट दिली जात आहे. गेल्या आठवड्यात मुंबईच्या मालाडमध्ये सुमारे २१ कोटी रुपये खर्च करून बांधलेली भिंत कोसळली. यात २७ जणांचे बळी गेले. रत्नागिरीतील तिवरे धरण फुटल्याने १९ जणांना जलसमाधी मिळाली. या घटनांना जबाबदार लोकांवर कारवाईसाठी सरकारकडून कमालीची निष्क्रियता दाखविली जात आहे. पीककर्जासाठी बँकांकडून शेतकऱ्यांची अडवणूक केली जात आहे. परिणामी जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राज्यभरात एकूण उद्दिष्टाच्या जेमतेम २५ टक्के पीककर्ज वाटप झाले आहे. याकडे सरकार लक्ष देण्यास तयार नसल्याने शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे.नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात पेट्रोल व डिझेलवर अधिभार लावण्यात आला. परिणामी प्रती लिटर अडीच रुपयांनी वाढ झाली. हा प्रकार ग्राहकांवर मोठा अन्याय आहे. वाढलेल्या किमती तातडीने मागे घ्याव्या, अशी मागणी आहे. या सर्व बाबी जिल्हाधिकाºयांना सादर केलेल्या निवेदनात नमूद करण्यात आल्या आहे.जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार डॉ. वजाहत मिर्झा, माजी मंत्री प्रा. वसंत पुरके, काँग्रेस कमिटीचे माजी जिल्हाध्यक्ष वामनराव कासावार यांच्या नेतृत्त्वात निवेदन देण्यात आले. 

टॅग्स :Vasantrao Purkeyवसंतराव पुरकेcongressकाँग्रेस