शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
4
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
5
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
6
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
7
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
8
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
9
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
10
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
11
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
12
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
13
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
14
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
15
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
16
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
17
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
18
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
19
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
20
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?

शेतमालाला भाव नसल्याने अडचण

By admin | Updated: June 7, 2017 00:54 IST

खरीप हंगाम जवळ येवून ठेपला असताना मागील हंगामात उत्पादित मालालाच बाजारपेठेत योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त आहे.

बाजारात शुकशुकाट : खरीप हंगामावरही दुष्काळाचे सावट लोकमत न्यूज नेटवर्क उमरखेड : खरीप हंगाम जवळ येवून ठेपला असताना मागील हंगामात उत्पादित मालालाच बाजारपेठेत योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त आहे. आतापर्यंत भाव वाढेल या आशेवर शेतकऱ्यांनी मालाची साठवण केली होती. पंरतु शासनाचे धोरण शेतकऱ्यांसाठी पोषक नसल्याने आणि त्यातच खरिपाची पेरणी करावी लागत असल्याने शेतकऱ्यांना नाईलाजास्तव मिळेल त्या भावात आपला माल विकावा लागत आहे. कापूस, सोयाबीन, तूर व अन्य पिकांना यावर्षी बऱ्यापैकी पोषक वातावरण लाभल्याने अनेकांना चांगले उत्पादन झाले. कधी पाऊस कमी तर कधी अधिक अशा वाईट परिस्थितीत कोपलेल्या निसर्गासोबतच तडजोड करीत चार वर्षे शेतकऱ्यांनी काढली. यावर्षीच्या हंगामाने बऱ्यापैकी साथ दिली असल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. परंतु मालाला बाजारात उठावच नसल्याने पुन्हा एकदा शेतकरी काळजीत पडला आहे. राज्य व केंद्र शासन शेतकऱ्यांपेक्षा इतर अनेक बाबींना प्राधान्य देत असल्याचे दिसून येते. त्यामुळे शेतकऱ्यांचे मनोबल कुठेतरी खच्ची होत आहे. बदल्या राजकीय समीकरणात शेतकऱ्यांची बाजू ठोसपणे मांडण्याचे धाडस कुणीही नेता अथवा पक्ष करीत नसल्याचे दिसून येते. प्रत्येकजण आपल्या सोयीची भूमिका घेत आहे. त्यामुळे आता कुणाकडे बघावे, असा प्रश्न बळीराजाला पडला आहे. मृग नक्षत्र आले असतानाही यावर्षी उकाडा व उष्णतेची लाट कायम आहे. तेव्हा खरिपाच्या पेरणीतून आवक होईल की नाही हा प्रश्न आहेच. बी-बियाणे आणि खते कशी खरेदी करावी ही काळजी शेतकऱ्यांना पडली आहे. त्यातच दुय्यम दर्जाचे बियाणे आणि खते बाजारात येवून पडली आहे. याचाही फटका सोसावा लागतो. शासनाकडून केवळ कारवाई करण्याचे चित्र उभे केले जाते. प्रत्यक्षात तसे होत नसल्याने शेतकऱ्यांना फसविणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.