शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

शेतमालाला भाव नसल्याने अडचण

By admin | Updated: June 7, 2017 00:54 IST

खरीप हंगाम जवळ येवून ठेपला असताना मागील हंगामात उत्पादित मालालाच बाजारपेठेत योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त आहे.

बाजारात शुकशुकाट : खरीप हंगामावरही दुष्काळाचे सावट लोकमत न्यूज नेटवर्क उमरखेड : खरीप हंगाम जवळ येवून ठेपला असताना मागील हंगामात उत्पादित मालालाच बाजारपेठेत योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त आहे. आतापर्यंत भाव वाढेल या आशेवर शेतकऱ्यांनी मालाची साठवण केली होती. पंरतु शासनाचे धोरण शेतकऱ्यांसाठी पोषक नसल्याने आणि त्यातच खरिपाची पेरणी करावी लागत असल्याने शेतकऱ्यांना नाईलाजास्तव मिळेल त्या भावात आपला माल विकावा लागत आहे. कापूस, सोयाबीन, तूर व अन्य पिकांना यावर्षी बऱ्यापैकी पोषक वातावरण लाभल्याने अनेकांना चांगले उत्पादन झाले. कधी पाऊस कमी तर कधी अधिक अशा वाईट परिस्थितीत कोपलेल्या निसर्गासोबतच तडजोड करीत चार वर्षे शेतकऱ्यांनी काढली. यावर्षीच्या हंगामाने बऱ्यापैकी साथ दिली असल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. परंतु मालाला बाजारात उठावच नसल्याने पुन्हा एकदा शेतकरी काळजीत पडला आहे. राज्य व केंद्र शासन शेतकऱ्यांपेक्षा इतर अनेक बाबींना प्राधान्य देत असल्याचे दिसून येते. त्यामुळे शेतकऱ्यांचे मनोबल कुठेतरी खच्ची होत आहे. बदल्या राजकीय समीकरणात शेतकऱ्यांची बाजू ठोसपणे मांडण्याचे धाडस कुणीही नेता अथवा पक्ष करीत नसल्याचे दिसून येते. प्रत्येकजण आपल्या सोयीची भूमिका घेत आहे. त्यामुळे आता कुणाकडे बघावे, असा प्रश्न बळीराजाला पडला आहे. मृग नक्षत्र आले असतानाही यावर्षी उकाडा व उष्णतेची लाट कायम आहे. तेव्हा खरिपाच्या पेरणीतून आवक होईल की नाही हा प्रश्न आहेच. बी-बियाणे आणि खते कशी खरेदी करावी ही काळजी शेतकऱ्यांना पडली आहे. त्यातच दुय्यम दर्जाचे बियाणे आणि खते बाजारात येवून पडली आहे. याचाही फटका सोसावा लागतो. शासनाकडून केवळ कारवाई करण्याचे चित्र उभे केले जाते. प्रत्यक्षात तसे होत नसल्याने शेतकऱ्यांना फसविणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.