शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अनेकांशी बोलत होतो, काश्मीरमध्ये पर्यटकांना मारतील'; राज ठाकरेंचा पहलगाम हल्ल्यावर मोठं विधान
2
ऐकत नाही भाऊ! टी-२० क्रिकेटमध्ये विराटचा नवा पराक्रम, 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच
3
'जेव्हा मी फोटो पाहिला, मला पहिला प्रश्न पडला की, भाजप...', 'त्या' फोटोवर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले
4
राज्यात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, मुंबईतील कुख्यात ठाकूर गँगचेही कनेक्शन
5
IPL 2025: चांगल्या सुरुवातीनंतरही आरसीबीच्या पदरात निराशा, हैदराबादचा ४२ धावांनी विजय!
6
सोलापुरात भयंकर घटना! पोटच्या ७ वर्षाच्या मुलीला संपवलं अन् घराशेजारीच पुरलं; पोलिसांनी मृतदेह काढला बाहेर
7
बाप-लेक ज्या गाडीतून झाले फरार, ती थार पोलिसांनी केली जप्त; आणखी दोन गाड्या कोणत्या? 
8
Matthew Forde: गोलंदाजाची आक्रमक फलंदाजी, अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक झळकावलं, डिव्हिलियर्सच्या विक्रमाशी बरोबरी
9
'निश्चितच, ठाकरे-पवार ब्रॅण्ड संपवण्याचा प्रयत्न चाललाय', राज ठाकरेंचं मोठं विधान
10
गडचिरोली: बिबट्या शिकारीसाठी आला अन् एका घरात घुसला, त्यानंतर दहा तास...
11
आमदार प्रवीण दटकेंच्या नावाने पैसे उकळण्याचा प्रयत्न, प्रकरण काय?
12
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण नव्या वळणावर; पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचीही चौकशी होणार?
13
भारताला दहशतवादाविरोधात स्वरक्षणाचा पूर्ण अधिकार; जर्मनीने केले 'ऑपरेशन सिंदूर'चे समर्थन
14
Abhishek Sharma: अभिषेक शर्मानं षटकार मारून मैदानातील गाडीची फोडली काच, पाहा व्हिडीओ
15
रूपाली चाकणकर, रोहिणी खडसेंकडून कस्पटे कुटुबीयांची भेट अन् दोघीत शाब्दिक चकमक
16
Vaishnavi Hagawane Case : कस्पटे कुटुंबियांच्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले, 'त्यांनी अजून दोन नावे सांगितली'
17
पोलिस महानिरीक्षक सुपेकर यांच्यामुळेच हगवणे कुटुंबीयांची हिंमत वाढली; अंजली दमानिया यांचा दावा
18
शिंदेंच्या शिवसेनेत उफाळला वाद! बाजोरिया हटावचा नारा, शिवसैनिकांनी बॅनर जाळले
19
'भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे खूप नुकसान झाले', पाकिस्तानी नेत्या मरियम नवाजची कबुली
20
स्पाय कॅमेऱ्यातून बायकोचे प्रायव्हेट व्हिडिओ..! निलेश चव्हाणच्या काळ्या कारनाम्यांची A टू Z स्टोरी

जिल्ह्यातील प्राथमिक शाळाही 17 ऑगस्टपासून सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2021 05:00 IST

जिल्ह्यात १५ जुलैपासून शहरी क्षेत्र वगळता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहे. आता पहिली ते सातवीचे वर्गही सुरू करण्याची तयारी केली जात आहे. मात्र शहरी क्षेत्रातील शाळांबाबत अद्यापही शिक्षण विभागातून ठोस निर्णय होताना दिसत नाही. त्यामुळे पालकांमध्ये अस्वस्थता आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : कोरोना रुग्ण कमी होत असल्याचे पाहून राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी १७ ऑगस्टपासून पहिली ते सातव्या वर्गाच्या शाळाही सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे यवतमाळ जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील प्राथमिक शाळाही सुरू होणार आहे. मात्र अद्याप राज्य शासनाच्या लेखी आदेशाची प्रतीक्षा असल्याचे शिक्षणाधिकारी प्रमोद सूर्यवंशी यांनी सांगितले. जिल्ह्यात १५ जुलैपासून शहरी क्षेत्र वगळता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहे. आता पहिली ते सातवीचे वर्गही सुरू करण्याची तयारी केली जात आहे. मात्र शहरी क्षेत्रातील शाळांबाबत अद्यापही शिक्षण विभागातून ठोस निर्णय होताना दिसत नाही. त्यामुळे पालकांमध्ये अस्वस्थता आहे. 

पालकांना मुलांच्या आरोग्याची चिंता

शाळा सुरू झाली तर मी माझ्या मुलीला शाळेत पाठवायला तयार आहे. तसे संमतीपत्रही यापूर्वीच शाळेला दिले आहे. माझी मुलगी जिल्हा परिषद शाळेत आठव्या वर्गात आहे. तिलाही प्रत्यक्ष शाळेत जाण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे. शाळा सुरू व्हावी.     - साधना उरकुडे, पालक

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुलाच्या आरोग्याची चिंता वाटतेच. पण आता कोरोना आपल्या जिल्ह्यात येऊन एक वर्षापेक्षा अधिक काळ झाला आहे. मग आणखी किती दिवस शिक्षण बंद ठेवायचे. मोबाईलवरच्या ऑनलाईन शिक्षणात मुलांना तेवढा रस नाही. प्राथमिक शाळा सुरू झाल्याच पाहिजे.    - नीलेश डहाके, पालक

 

टॅग्स :Schoolशाळा