शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
4
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
5
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
6
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
7
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
8
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
9
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
10
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
11
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
12
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
13
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
14
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
15
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
16
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
17
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
19
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
20
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

मानधनाच्या प्रतीक्षेत ३४ निराधारांनी सोडले प्राण

By admin | Updated: July 23, 2014 00:14 IST

निराधार योेजनेच्या मानधनासाठी उपोषण, आंदोलन, पदयात्रा आदी करूनही पदरात काहीच पडले नाही. दरम्यानच्या काळात ३३ वृद्ध निराधार लाभार्थ्यांनी मानधनाच्या प्रतीक्षेत प्राण सोडला.

उपेक्षा कायम : महागाव तालुक्यातील निराधार आंदोलन करूनही थकलेमहागाव : निराधार योेजनेच्या मानधनासाठी उपोषण, आंदोलन, पदयात्रा आदी करूनही पदरात काहीच पडले नाही. दरम्यानच्या काळात ३३ वृद्ध निराधार लाभार्थ्यांनी मानधनाच्या प्रतीक्षेत प्राण सोडला. मात्र अद्यापही प्रशासनाला जाग आली नाही. निराधार मंडळी लाभासाठी तहसीलचे उंबरठे मात्र कायम झिजवित आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्यावतीने संजय गांधी निराधार, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनेचा लाभ मिळतो. महागाव तालुक्यातील शेकडो वृद्ध निराधारांना लाभ मिळत होता. मात्र २०११ मध्ये तालुक्यातील तीन हजार लाभार्थी या योजनेतून अचानक बाद झाले. एक रुपयाही अनुदान मिळाले नाही. अनुदानासाठी दररोज तहसील कार्यालयावर वृद्ध निराधार धडकत आहे. या निराधारांचा प्रश्न घेऊन पंचायत समितीचे माजी सभापती डी.बी. नाईक, जगदीश नरवाडे यांनी वारंवार आंदोलने केली. गेल्या दोन महिन्यापूर्वी तर प्रदीर्घ लढा देण्यात आला. तहसील कार्यालयासमोर प्रश्न सुटत नसल्याने आंदोलनकर्ते पदयात्रा करीत उमरखेडच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकले. मात्र उपयोग झाला नाही. दरम्यान किसान सभेचे पॉलिटब्युरो सीताराम येचुरी यांनी थेट उपजिल्हाधिकारी इंद्रसेन तिटकारे यांना विचारणा केली होती. मात्र अनुदान मिळाले नाही. वृद्ध निराधारांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे. पुरेसे अन्न मिळत नसल्याने उपासमार होत आहे. वृद्धापकाळात दुसऱ्या पुढे हात पसरण्याचा अपमानास्पद प्रसंग या वृद्धांवर आला आहे. अशा परिस्थितीत ३४ जणांनी जगाचाच निरोप घेतला. त्यात अंबाजी बनसोडे, आनंदा रोकडे उटी, शेख इमाम शेख फतरु मोरथ, तुळशीराम इंगोले जनुना, अंजूबाई ठाकरे, जनाबाई बोरकर, अनुसया चौधरी, नारायण राऊत करंजखेड, मुक्ताबाई भांडवले कलगाव, तुळसाबाई अढागळे कोठारी, शेख इमाम शेख चाँद काळी टेंभी, शेख हलीमा शेख शेरु, दगडूबाई गोंडाडे, अंजूबाई गुलाब, अनुसया लांडगे, धारुबाई भगत, हुसानाबी नवाबोद्दीन फुलसावंगी, गोपाळ शिंदे इजनी, रायभान चपाट, मुकुंदा भगत वेणी, बैनाबाई गडदने, भाऊ हनवते, शारदाबाई हनवते, गुणाबाई हुलगुंडे सवना, सावित्रीबाई लहाने माळकिन्ही, सरूबाई लोखंडे, धरुबाई गरडे सारखनी, यशोदाबाई पहूर पिंपळगाव, सरस्वती चिपडे, गयाबाई ढोले, नामदेव ढोले, तोतीबाई राठोड गुंज, नागोराव फुलउंबरकर कान्हा, दुर्गाबाई खोकले पिंपळगाव यांचा समावेश आहे. अनेक निराधार अखेरच्या घटका मोजत आहे. परंतु प्रलंबित प्रकरणांवर प्रशासन तोडगा काढायला तयार नाही. आता प्रशासनाला किती बळी हवे आहेत असा प्रश्न विचारला जात आहे. (शहर प्रतिनिधी)