शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
2
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
3
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
4
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
5
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
6
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
7
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
8
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
9
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
10
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
11
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
12
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
13
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
14
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
17
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
18
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
19
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
20
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
Daily Top 2Weekly Top 5

पूस धरणाची पाणी पातळी घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 23:36 IST

दिवसेंदिवस ऊन वाढत आहे. वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवनही वाढले आहे. यामुळे पूस धरणातील पाणी पातळीत कमालीची घट होत आहे. सध्या पूस धरणात केवळ १० टक्के जलसाठा शिल्लक आहे.

ठळक मुद्देबाष्पीभवनाचा परिणाम : पाणी वाटपात खोळंबा, पुसदचे नागरिक त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : दिवसेंदिवस ऊन वाढत आहे. वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवनही वाढले आहे. यामुळे पूस धरणातील पाणी पातळीत कमालीची घट होत आहे. सध्या पूस धरणात केवळ १० टक्के जलसाठा शिल्लक आहे.सध्या विदर्भात उष्णतेची लाट आली आहे. तापमान ४५ डीग्री अंश सेल्सीअसवर पोहोचल्याने अंगाची लाही-लाही होत आहे. पुसद शहरासाठी जीवनदायीनी असलेल्या पूस धरणात सध्या केवळ १० टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. सध्या उन्हाच्या तीव्रतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन प्रचंड होत आहे. वाढत्या उन्हामुळे प्रतिदिन ४० ते ४५ सेमी पाण्याचे बाप्पीभवन होत आहे. या बाष्पीभवनामुळे धरणातील पाण्याची पातळी ४५ सेमीने खाली गेली आहे. नॉर्मल स्थितीत हे प्रमाण २५ सेमीच्या दरम्यान असते. बाष्पीभवनाच्या परिणामावर कसलाच उपाय व तोडगा नसल्याने प्रत्येक उन्हाळ्यात ही नैसर्गिक घट सहन करावी लागते.हरित क्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांनी पुसद तालुका सुजलाम सुफलाम व्हावा, या उदात्त हेतूने पुसदपासून १७ किलोमीटर अंतरावर वनवार्ला गावाजवळ तत्कालीन संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते २६ डिसेंबर १९६४ रोजी पूस धरणाची कोनशीला बसविली होती. अध्यक्षस्थानी तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक होते. सात वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर पुसद धरण पूर्ण झाले. १९ नोव्हेंबर १९७१ रोजी त्याचे लोकार्पण झाले. त्यावेळी शंकरराव चव्हाण, आबासाहेब पारवेकर उपस्थित होते. नाईक साहेबांच्या दूर दृष्टीमुळे परिसर सुजलम सुफलाम झाला. मात्र नंतरच्या काळात प्रशासकीय स्तरावर भरीव काम झालेच नाही.शहराला पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी नगरपरिषद प्रशासनाची आहे. २९ वार्डातील नागरिकांना पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक तयार करण्यात आले. सध्या तीन दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो. मात्र वेळापत्रकानुसार पाणी पुरवठा करताना त्या वार्डातील अनेक भागात पाणी पुरवठा होतच नाही. २६ एप्रिल प्रभाग ७ मधील शंकरनगर, जाजू कॉलनी, डुब्बेवार ले-आऊट, रामनगर, व्यंकटेशनगर, येरावार ले-आऊट, पापीनवार ले-आऊट या भागात पाणी पोहोचलेच नाही. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागला.याबाबत पाणी पुरवठा सभापतींना विचारणा केली असता, त्यांनी जाजू हॉस्पीटलजवळील पाइपलाईनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने पाणी पुरवठा झाला नाही, असे सांगितले. हा प्रभाग ७ चा प्रश्न नाही, तर शहरातील अनेक वार्डात असा प्रकार घडत आहे. विशेष म्हणजे काही भागात सकाळ-सायंकाळ असे दोनदा पाणी पोहोचत असल्याचा आरोप नागरिक करीत आहे. पालिका प्रशासनाने याची वेळीच दखल घेतली नाही, तर जनतेच्या उद्रेकाला सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.वाढत्या तापमानामुळे ३0 टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यतापूस धरणात एप्रिल महिन्याच्या शेवटी केवळ १० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. बाप्पीभवन ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यावर उपाययोजना नाही. मात्र नगरपरिषदेच्या पाणी वितरण व नियोजनातही अनेक त्रुटी आहे. त्यामुळेच शहरवासीयांवर पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. उन्हाळ्यात नागरिकांकडून पाण्याची मागणी वाढते. तसेच पूस धरणाच्या पाणीसाठ्याची पातळी झपाट्याने कमी होते. सध्या पुसद शहराची तहान पूस धरण भागवते, हे वास्तव आहे. मात्र ही तहान परिपूर्ण भागत नाही, हेसुद्धा वास्तव आहे. दरवर्षी एकूण जलसाठ्यापैकी ५० टक्क्यांवरच्या आसपास पाणी बाष्पीभवन होऊन वाया जाते. आजपर्यंत बाष्पीभवन रोखण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न होताना दिसले नाही. यासाठी शासन, प्रशासन आणि स्थानिक सामाजिक संस्था, संघटनांनी पुढाकार घेऊन बाष्पीभवन रोखण्यासाठी प्रयत्न केल्यास ३० टक्क्यापर्यंत घट शक्य असल्याचे सोंगितले जाते.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई