शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पूस धरणाची पाणी पातळी घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 23:36 IST

दिवसेंदिवस ऊन वाढत आहे. वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवनही वाढले आहे. यामुळे पूस धरणातील पाणी पातळीत कमालीची घट होत आहे. सध्या पूस धरणात केवळ १० टक्के जलसाठा शिल्लक आहे.

ठळक मुद्देबाष्पीभवनाचा परिणाम : पाणी वाटपात खोळंबा, पुसदचे नागरिक त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : दिवसेंदिवस ऊन वाढत आहे. वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवनही वाढले आहे. यामुळे पूस धरणातील पाणी पातळीत कमालीची घट होत आहे. सध्या पूस धरणात केवळ १० टक्के जलसाठा शिल्लक आहे.सध्या विदर्भात उष्णतेची लाट आली आहे. तापमान ४५ डीग्री अंश सेल्सीअसवर पोहोचल्याने अंगाची लाही-लाही होत आहे. पुसद शहरासाठी जीवनदायीनी असलेल्या पूस धरणात सध्या केवळ १० टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. सध्या उन्हाच्या तीव्रतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन प्रचंड होत आहे. वाढत्या उन्हामुळे प्रतिदिन ४० ते ४५ सेमी पाण्याचे बाप्पीभवन होत आहे. या बाष्पीभवनामुळे धरणातील पाण्याची पातळी ४५ सेमीने खाली गेली आहे. नॉर्मल स्थितीत हे प्रमाण २५ सेमीच्या दरम्यान असते. बाष्पीभवनाच्या परिणामावर कसलाच उपाय व तोडगा नसल्याने प्रत्येक उन्हाळ्यात ही नैसर्गिक घट सहन करावी लागते.हरित क्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांनी पुसद तालुका सुजलाम सुफलाम व्हावा, या उदात्त हेतूने पुसदपासून १७ किलोमीटर अंतरावर वनवार्ला गावाजवळ तत्कालीन संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते २६ डिसेंबर १९६४ रोजी पूस धरणाची कोनशीला बसविली होती. अध्यक्षस्थानी तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक होते. सात वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर पुसद धरण पूर्ण झाले. १९ नोव्हेंबर १९७१ रोजी त्याचे लोकार्पण झाले. त्यावेळी शंकरराव चव्हाण, आबासाहेब पारवेकर उपस्थित होते. नाईक साहेबांच्या दूर दृष्टीमुळे परिसर सुजलम सुफलाम झाला. मात्र नंतरच्या काळात प्रशासकीय स्तरावर भरीव काम झालेच नाही.शहराला पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी नगरपरिषद प्रशासनाची आहे. २९ वार्डातील नागरिकांना पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक तयार करण्यात आले. सध्या तीन दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो. मात्र वेळापत्रकानुसार पाणी पुरवठा करताना त्या वार्डातील अनेक भागात पाणी पुरवठा होतच नाही. २६ एप्रिल प्रभाग ७ मधील शंकरनगर, जाजू कॉलनी, डुब्बेवार ले-आऊट, रामनगर, व्यंकटेशनगर, येरावार ले-आऊट, पापीनवार ले-आऊट या भागात पाणी पोहोचलेच नाही. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागला.याबाबत पाणी पुरवठा सभापतींना विचारणा केली असता, त्यांनी जाजू हॉस्पीटलजवळील पाइपलाईनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने पाणी पुरवठा झाला नाही, असे सांगितले. हा प्रभाग ७ चा प्रश्न नाही, तर शहरातील अनेक वार्डात असा प्रकार घडत आहे. विशेष म्हणजे काही भागात सकाळ-सायंकाळ असे दोनदा पाणी पोहोचत असल्याचा आरोप नागरिक करीत आहे. पालिका प्रशासनाने याची वेळीच दखल घेतली नाही, तर जनतेच्या उद्रेकाला सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.वाढत्या तापमानामुळे ३0 टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यतापूस धरणात एप्रिल महिन्याच्या शेवटी केवळ १० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. बाप्पीभवन ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यावर उपाययोजना नाही. मात्र नगरपरिषदेच्या पाणी वितरण व नियोजनातही अनेक त्रुटी आहे. त्यामुळेच शहरवासीयांवर पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. उन्हाळ्यात नागरिकांकडून पाण्याची मागणी वाढते. तसेच पूस धरणाच्या पाणीसाठ्याची पातळी झपाट्याने कमी होते. सध्या पुसद शहराची तहान पूस धरण भागवते, हे वास्तव आहे. मात्र ही तहान परिपूर्ण भागत नाही, हेसुद्धा वास्तव आहे. दरवर्षी एकूण जलसाठ्यापैकी ५० टक्क्यांवरच्या आसपास पाणी बाष्पीभवन होऊन वाया जाते. आजपर्यंत बाष्पीभवन रोखण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न होताना दिसले नाही. यासाठी शासन, प्रशासन आणि स्थानिक सामाजिक संस्था, संघटनांनी पुढाकार घेऊन बाष्पीभवन रोखण्यासाठी प्रयत्न केल्यास ३० टक्क्यापर्यंत घट शक्य असल्याचे सोंगितले जाते.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई