शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
2
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
3
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
4
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
5
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
6
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
7
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
8
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
9
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
10
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
11
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
12
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
13
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
14
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
15
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
16
बुलढाणा: बापाच्या छातीवर ठेवला पाय, गळा दाबला आणि पाजलं विष; मुलाकडून क्रूरतेचा कळस
17
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
18
"हनुमान चालीसा म्हण", अरबाज निक्कीला देतो सल्ला, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीही करतोय मदत
19
Asia Cup 2025 : गोड बोलून संघाबाहेर काढलं? भारतीय क्रिकेटरची कोच गंभीरसंदर्भात 'मन की बात'
20
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!

पूस धरणाची पाणी पातळी घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 23:36 IST

दिवसेंदिवस ऊन वाढत आहे. वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवनही वाढले आहे. यामुळे पूस धरणातील पाणी पातळीत कमालीची घट होत आहे. सध्या पूस धरणात केवळ १० टक्के जलसाठा शिल्लक आहे.

ठळक मुद्देबाष्पीभवनाचा परिणाम : पाणी वाटपात खोळंबा, पुसदचे नागरिक त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : दिवसेंदिवस ऊन वाढत आहे. वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवनही वाढले आहे. यामुळे पूस धरणातील पाणी पातळीत कमालीची घट होत आहे. सध्या पूस धरणात केवळ १० टक्के जलसाठा शिल्लक आहे.सध्या विदर्भात उष्णतेची लाट आली आहे. तापमान ४५ डीग्री अंश सेल्सीअसवर पोहोचल्याने अंगाची लाही-लाही होत आहे. पुसद शहरासाठी जीवनदायीनी असलेल्या पूस धरणात सध्या केवळ १० टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. सध्या उन्हाच्या तीव्रतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन प्रचंड होत आहे. वाढत्या उन्हामुळे प्रतिदिन ४० ते ४५ सेमी पाण्याचे बाप्पीभवन होत आहे. या बाष्पीभवनामुळे धरणातील पाण्याची पातळी ४५ सेमीने खाली गेली आहे. नॉर्मल स्थितीत हे प्रमाण २५ सेमीच्या दरम्यान असते. बाष्पीभवनाच्या परिणामावर कसलाच उपाय व तोडगा नसल्याने प्रत्येक उन्हाळ्यात ही नैसर्गिक घट सहन करावी लागते.हरित क्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांनी पुसद तालुका सुजलाम सुफलाम व्हावा, या उदात्त हेतूने पुसदपासून १७ किलोमीटर अंतरावर वनवार्ला गावाजवळ तत्कालीन संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते २६ डिसेंबर १९६४ रोजी पूस धरणाची कोनशीला बसविली होती. अध्यक्षस्थानी तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक होते. सात वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर पुसद धरण पूर्ण झाले. १९ नोव्हेंबर १९७१ रोजी त्याचे लोकार्पण झाले. त्यावेळी शंकरराव चव्हाण, आबासाहेब पारवेकर उपस्थित होते. नाईक साहेबांच्या दूर दृष्टीमुळे परिसर सुजलम सुफलाम झाला. मात्र नंतरच्या काळात प्रशासकीय स्तरावर भरीव काम झालेच नाही.शहराला पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी नगरपरिषद प्रशासनाची आहे. २९ वार्डातील नागरिकांना पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक तयार करण्यात आले. सध्या तीन दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो. मात्र वेळापत्रकानुसार पाणी पुरवठा करताना त्या वार्डातील अनेक भागात पाणी पुरवठा होतच नाही. २६ एप्रिल प्रभाग ७ मधील शंकरनगर, जाजू कॉलनी, डुब्बेवार ले-आऊट, रामनगर, व्यंकटेशनगर, येरावार ले-आऊट, पापीनवार ले-आऊट या भागात पाणी पोहोचलेच नाही. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागला.याबाबत पाणी पुरवठा सभापतींना विचारणा केली असता, त्यांनी जाजू हॉस्पीटलजवळील पाइपलाईनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने पाणी पुरवठा झाला नाही, असे सांगितले. हा प्रभाग ७ चा प्रश्न नाही, तर शहरातील अनेक वार्डात असा प्रकार घडत आहे. विशेष म्हणजे काही भागात सकाळ-सायंकाळ असे दोनदा पाणी पोहोचत असल्याचा आरोप नागरिक करीत आहे. पालिका प्रशासनाने याची वेळीच दखल घेतली नाही, तर जनतेच्या उद्रेकाला सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.वाढत्या तापमानामुळे ३0 टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यतापूस धरणात एप्रिल महिन्याच्या शेवटी केवळ १० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. बाप्पीभवन ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यावर उपाययोजना नाही. मात्र नगरपरिषदेच्या पाणी वितरण व नियोजनातही अनेक त्रुटी आहे. त्यामुळेच शहरवासीयांवर पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. उन्हाळ्यात नागरिकांकडून पाण्याची मागणी वाढते. तसेच पूस धरणाच्या पाणीसाठ्याची पातळी झपाट्याने कमी होते. सध्या पुसद शहराची तहान पूस धरण भागवते, हे वास्तव आहे. मात्र ही तहान परिपूर्ण भागत नाही, हेसुद्धा वास्तव आहे. दरवर्षी एकूण जलसाठ्यापैकी ५० टक्क्यांवरच्या आसपास पाणी बाष्पीभवन होऊन वाया जाते. आजपर्यंत बाष्पीभवन रोखण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न होताना दिसले नाही. यासाठी शासन, प्रशासन आणि स्थानिक सामाजिक संस्था, संघटनांनी पुढाकार घेऊन बाष्पीभवन रोखण्यासाठी प्रयत्न केल्यास ३० टक्क्यापर्यंत घट शक्य असल्याचे सोंगितले जाते.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई