शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
2
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
3
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
4
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
5
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
6
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
7
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
8
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
9
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
10
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
11
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
12
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
13
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
14
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
15
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
16
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
17
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
18
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
19
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
20
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?

गोखीचे पाणी मेपर्यंत अशक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 12:24 AM

शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्यानंतर तत्काळ मिळणाऱ्या गोखी प्रकल्पाच्या पाण्याकडे यवतमाळकरांच्या नजरा लागल्या आहे. परंतु पाणीपुरवठ्यासाठी लागणारे अत्यावश्यक पाईपच अद्याप यवतमाळात पोहोचले नाही. तर इतर कामांसाठी १५ दिवसांचा अवधी लागणार आहे.

ठळक मुद्देपाईप पोहोचलेच नाही : कामासाठी लागणार १५ दिवसांचा अवधी

रूपेश उत्तरवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्यानंतर तत्काळ मिळणाऱ्या गोखी प्रकल्पाच्या पाण्याकडे यवतमाळकरांच्या नजरा लागल्या आहे. परंतु पाणीपुरवठ्यासाठी लागणारे अत्यावश्यक पाईपच अद्याप यवतमाळात पोहोचले नाही. तर इतर कामांसाठी १५ दिवसांचा अवधी लागणार आहे. त्यामुळे गोखीच्या पाण्यासाठी यवतमाळकरांना मे महिन्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.यवतमाळ शहराला पाणीपुरवठा करणारे निळोणा आणि चापडोह प्रकल्प कोरडे पडले. बेंबळा प्रकल्पाचे पाणीही लवकरच मिळण्याची आशा नाही. त्यामुळे गोखी प्रकल्पाचा पर्याय पुढे आला. त्यासाठी युद्ध पातळीवर कामकाज हाती घेण्यात आले. यवतमाळ शहरापासून २७ किलोमीटर अंतरावरील गोखी प्रकल्पाचे पाणी यवतमाळच्या एमआयडीसीत येते. तेथून पाणी दर्डानगरच्या टाकीपर्यंत आणण्यासाठी पाईपलाईन टाकली जाणार आहे. औद्योगिक वसाहत ते दर्डानगर हे ४.२० किमी अंतर आहे. आता औद्योगिक वसाहत ते लोहारा येथील पाण्याच्या टाकीपर्यंत गोखी प्रकल्पाचे पाणी आणले जाईल. तेथून दर्डानगर पाण्याच्या टाकीपर्यंत २००७ मध्ये टाकण्यात आलेल्या २०० एमएम पीव्हीसी पाईपने पाणी आणले जाईल.औद्योगिक वसाहतीपासून लोहाराच्या टाकीपर्यंत पाईप टाकण्यासाठी खोदकाम सुरू झाले आहे. एमआयडीसीतील मुख्य चौकापर्यंत खोदकामही झाले आहे. परंतु अद्यापपर्यंत पाईपच आले नाही. त्यामुळे या पाईपची सर्वांना प्रतीक्षा आहे. विशेष म्हणजे सदर पाईप शनिवारी यवतमाळात पोहोचणार होते. परंतु सोमवारपर्यंत पाईप आले नव्हते. पाईप आल्यानंतर कामाला सुरुवात होईल. त्यासाठी १५ दिवसाचा अवधी लागणार आहे. त्यामुळे गोखीचे पाणी मिळण्यासाठी मे महिना उजाडणार आहे.अतिरिक्त पाणी सममध्ये जाणारगोखी प्रकल्पाचे पाणी दर्डानगर टाकीत पोहोचल्यानंतर दर्डानगर, वडगाव, लोहारा, सुयोगनगरातील सुमारे ८० हजार लोकसंख्येपर्यंत पाणी पोहोचणार आहे. ज्या दिवशी गोखी प्रकल्पातून अधिक पाणी खेचले जाईल. ते पाणी जीवन प्राधिकरणाच्या सममध्ये सोडले जाईल आणि तेथून ते शहरातील इतर भागांना वितरित केले जाणार आहे.दररोज मिळणार २० लाख लिटर पाणीगोखी प्रकल्पातून दररोज २ एमएल म्हणजे २० लाख लिटर पाण्याचा पुरवठा करण्याच्या प्रस्तावाला औद्योगिक वसाहतीने मान्यता दिली आहे. त्यामुळे शहरातील काही भागांचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. गोखी प्रकल्पाचा मृतसाठा हा निळोणा प्रकल्पाच्या संपूर्ण साठ्याएवढा आहे. गोखी प्रकल्पात १.५ दलघमी जीवंत साठा आणि ७.५१ दलघमी मृतसाठा आहे. जीवंत साठा संपला तरी सहा महिने पुरेल एवढा मृतसाठा या प्रकल्पात आहे.