शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
2
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
3
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
4
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
5
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
6
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
7
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
8
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
9
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
10
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
11
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतरही टीम इंडियाने सेलिब्रेशन का नाही केलं? कारण...
12
FD मध्ये पैसे गुंतवताय? 'या' ६ बँका देत आहेत सर्वाधिक व्याज, लगेच तपासा यादी!
13
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
14
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
15
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
16
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
17
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
18
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
19
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
20
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब

वणीत खाणींमुळे नद्यांचे प्रदूषण वाढले, नागरिकांचे आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2021 13:08 IST

वणी शहरात निर्गुडा नदीच्या काठावर दोन्हीही बाजूने नव्या वसाहती तयार झाल्या आहेत. या वसाहतीतील अतिशय घाण पाणी नदीकडे वळविण्यात आले असून हे पाणी नियमितपणे नदीच्या पाण्यात मिसळत आहे.

ठळक मुद्देप्रशासनाकडून कोणत्याच उपाययोजना नाहीतपिण्याच्या पाण्यासाठी अनेक गावे निर्भर

यवतमाळ : वणी तालुक्यातील कोळसा खाणींमुळे नैसर्गिकरित्या वाहणाऱ्या नद्यांच्या प्रदूषणात वाढ झाली आहे. या नद्यांवर अनेक गावे पिण्याच्या पाण्यासाठी व शेतीच्या सिंचनासाठी निर्भर आहेत. प्रदूषित पाणी पिल्याने त्याचा नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे. अनेक गावात नदीपात्रातून पिण्यासाठी पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र जलशुद्धीकरणाचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे नागरिकांना अशुद्ध पाणी प्यावे लागत आहे.

वणी तालुक्यातून विदर्भा, निर्गुडा, वर्धा या तीन महत्त्वाच्या नद्या वाहतात. विदर्भा नदी ही घोन्सा गावाजवळून वाहते. घोन्सालगतच खुली कोळसा खाण काही वर्षांपूर्वी सुरू झाली. त्यामुळे घोन्सा भागातील नदीचे पात्र पूर्णत: दूषित झाले आहे. अनेकदा या नदीतून काळे पाणी वाहताना दिसते. खाणीतून निघणारे केमिकलयुक्त पाणी नदीपात्रात सोडले जाते. नागरिकांनी ओरड केल्यानंतर हा प्रकार बंद होतो. मात्र, अधूनमधून हे पाणी सोडले जाते. या नदीवर अनेक गावांची तहान भागविली जाते. तसेच शेतीच्या सिंचनासाठी पाण्याचा वापर केला जातो. केमिकलयुक्त पाण्याच्या वापराने केवळ मानवी आरोग्यच नाही, तर शेती उत्पादनावरही परिणाम होत असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.

कोळसा खाणींमुळे वर्धा नदी तर अस्थिपंजर झाली आहे. या नदीच्या काठावर अनेक ठिकाणी मातीचे डोंगराएवढे ढिगारे उभे करण्यात आले. त्यामुळे या नदीचे पात्र अनेक ठिकाणी बदलल्याचे पहायला मिळते. अनेक भागातून उद्योगांचे पाणी या नदीत पोहोचते. हे पाणी अतिशय विषारी स्वरूपाचे असते. पाळीव जनावरे याच नदीचे पाणी पितात. त्यामुळे या जनावरांचे आरोग्यदेखील धोक्यात आले आहे.

वणी परिसरात धूळ प्रदूषणासह जल प्रदूषणाचीदेखील मोठी समस्या निर्माण झाली आहे. मात्र, या विषयात कोणीही आवाज उठविताना दिसत नाही. मुळात खनिज विकास निधीतील २५ टक्के रक्कम ही जल प्रदूषणावर निर्बंध आणण्यासाठी खर्च केली जाणे अपेक्षित आहे. मात्र, त्यासाठी प्रशासन कायम उदासीन असल्याचे दिसून येते. यातून अनेक गावातील नागरिकांना वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागतो.

कॉलनीतील दूषित पाणी सोडले जाते निर्गुडा नदीत

वणी शहरात निर्गुडा नदीच्या काठावर दोन्हीही बाजूने नव्या वसाहती तयार झाल्या आहेत. या वसाहतीतील अतिशय घाण पाणी नदीकडे वळविण्यात आले असून हे पाणी नियमितपणे नदीच्या पाण्यात मिसळत आहे. त्यामुळे वणी शहरालगतच्या पात्रातील पाणी मोठ्या प्रमाणात दूषित झाले आहे. मध्यंतरी पालिकेने पुढाकार घेऊन नदीत घाण पाणी जाऊ नये, यासाठी उपाययोजनका केली होती. परंतु, ही उपाययोजना फार काळ टिकली नाही. अजूनही घाण पाणी या नदीत सोडले जात आहे.

टॅग्स :pollutionप्रदूषणenvironmentपर्यावरणWaterपाणीair pollutionवायू प्रदूषणriverनदी