शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
8
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
11
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
12
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
13
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
14
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
15
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
16
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
17
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
18
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
19
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
20
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?

वणीत खाणींमुळे नद्यांचे प्रदूषण वाढले, नागरिकांचे आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2021 13:08 IST

वणी शहरात निर्गुडा नदीच्या काठावर दोन्हीही बाजूने नव्या वसाहती तयार झाल्या आहेत. या वसाहतीतील अतिशय घाण पाणी नदीकडे वळविण्यात आले असून हे पाणी नियमितपणे नदीच्या पाण्यात मिसळत आहे.

ठळक मुद्देप्रशासनाकडून कोणत्याच उपाययोजना नाहीतपिण्याच्या पाण्यासाठी अनेक गावे निर्भर

यवतमाळ : वणी तालुक्यातील कोळसा खाणींमुळे नैसर्गिकरित्या वाहणाऱ्या नद्यांच्या प्रदूषणात वाढ झाली आहे. या नद्यांवर अनेक गावे पिण्याच्या पाण्यासाठी व शेतीच्या सिंचनासाठी निर्भर आहेत. प्रदूषित पाणी पिल्याने त्याचा नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे. अनेक गावात नदीपात्रातून पिण्यासाठी पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र जलशुद्धीकरणाचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे नागरिकांना अशुद्ध पाणी प्यावे लागत आहे.

वणी तालुक्यातून विदर्भा, निर्गुडा, वर्धा या तीन महत्त्वाच्या नद्या वाहतात. विदर्भा नदी ही घोन्सा गावाजवळून वाहते. घोन्सालगतच खुली कोळसा खाण काही वर्षांपूर्वी सुरू झाली. त्यामुळे घोन्सा भागातील नदीचे पात्र पूर्णत: दूषित झाले आहे. अनेकदा या नदीतून काळे पाणी वाहताना दिसते. खाणीतून निघणारे केमिकलयुक्त पाणी नदीपात्रात सोडले जाते. नागरिकांनी ओरड केल्यानंतर हा प्रकार बंद होतो. मात्र, अधूनमधून हे पाणी सोडले जाते. या नदीवर अनेक गावांची तहान भागविली जाते. तसेच शेतीच्या सिंचनासाठी पाण्याचा वापर केला जातो. केमिकलयुक्त पाण्याच्या वापराने केवळ मानवी आरोग्यच नाही, तर शेती उत्पादनावरही परिणाम होत असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.

कोळसा खाणींमुळे वर्धा नदी तर अस्थिपंजर झाली आहे. या नदीच्या काठावर अनेक ठिकाणी मातीचे डोंगराएवढे ढिगारे उभे करण्यात आले. त्यामुळे या नदीचे पात्र अनेक ठिकाणी बदलल्याचे पहायला मिळते. अनेक भागातून उद्योगांचे पाणी या नदीत पोहोचते. हे पाणी अतिशय विषारी स्वरूपाचे असते. पाळीव जनावरे याच नदीचे पाणी पितात. त्यामुळे या जनावरांचे आरोग्यदेखील धोक्यात आले आहे.

वणी परिसरात धूळ प्रदूषणासह जल प्रदूषणाचीदेखील मोठी समस्या निर्माण झाली आहे. मात्र, या विषयात कोणीही आवाज उठविताना दिसत नाही. मुळात खनिज विकास निधीतील २५ टक्के रक्कम ही जल प्रदूषणावर निर्बंध आणण्यासाठी खर्च केली जाणे अपेक्षित आहे. मात्र, त्यासाठी प्रशासन कायम उदासीन असल्याचे दिसून येते. यातून अनेक गावातील नागरिकांना वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागतो.

कॉलनीतील दूषित पाणी सोडले जाते निर्गुडा नदीत

वणी शहरात निर्गुडा नदीच्या काठावर दोन्हीही बाजूने नव्या वसाहती तयार झाल्या आहेत. या वसाहतीतील अतिशय घाण पाणी नदीकडे वळविण्यात आले असून हे पाणी नियमितपणे नदीच्या पाण्यात मिसळत आहे. त्यामुळे वणी शहरालगतच्या पात्रातील पाणी मोठ्या प्रमाणात दूषित झाले आहे. मध्यंतरी पालिकेने पुढाकार घेऊन नदीत घाण पाणी जाऊ नये, यासाठी उपाययोजनका केली होती. परंतु, ही उपाययोजना फार काळ टिकली नाही. अजूनही घाण पाणी या नदीत सोडले जात आहे.

टॅग्स :pollutionप्रदूषणenvironmentपर्यावरणWaterपाणीair pollutionवायू प्रदूषणriverनदी