शहरं
Join us  
Trending Stories
1
लुक-आउट नोटीस, जामीन फेटाळला; अखेर केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा पोलिसांना शरण आला, काय घडले?
2
तामिळनाडू सरकारचे खातेवाटप ठरले, मुख्यमंत्री विजयने स्वतःकडे कोणते विभाग ठेवले? पाहा, यादी
3
“थलपती विजयशी तुलना करू नका”; पवन कल्याण, CM पदावरून साऊथ सुपरस्टारबाबत चाहत्यांमध्ये चर्चा
4
षटकारांची ‘बरसात’! IPL मध्ये अशी कामगिरी करणारा फिन ॲलन क्रिकेट विश्वातील पहिलाच फलंदाज
5
लहानग्या विराटला गंभीर आजार, DCM शिंदे मदतीला धावले; विनामूल्य शस्त्रक्रिया करून दिला दिलासा
6
KKR vs GT: मुंबईकर रघुवंशीचा ईडन गार्डन्सवर धमाका! गंभीर-उथप्पा यांच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
8
“धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करा”; राहुल गांधींची मागणी, नीट पेपर लीक प्रकरण RSS-BJPशी जोडले
9
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
10
मातृत्वाला सलाम! स्वतः होरपळली, पण काळजाच्या तुकड्यांना वाचवलं; मन हेलावून टाकणारी घटना
11
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
12
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
13
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
14
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
15
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
16
बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
17
Sunil Narine : मिस्ट्री स्पिनरची कमाल! IPL मध्ये 'द्विशतक' साजरे करणारा ठरला पहिला परदेशी खेळाडू
18
“देशातील तरुणांचा मला अभिमान, माझ्या विधानाचा विपर्यास केला”; CJI सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण
19
NEET Exam Paper Leak: 'नीट’ पेपरफुटी प्रकरणात पुण्यातील प्राध्यापक मनीषा मांढरे अटकेत; सीबीआयकडून कारवाई
20
IPL फायनल दरम्यान PCB अध्यक्ष मोहसिन नक्वी भारतात येणार? जाणून घ्या ही चर्चा रंगण्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मतदान आणि मतमोजणी एकाच दिवशी

By admin | Updated: December 10, 2014 23:05 IST

पंचायत राज व्यवस्थेमध्ये लोकशाहीचे पाळेमुळे मजबुत करण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण पाऊले उचलली जात आहे. मतदान प्रक्रिया राबवितांना पारदर्शकते सोबत गतीमानता आणली जाणार आहे.

यवतमाळ : पंचायत राज व्यवस्थेमध्ये लोकशाहीचे पाळेमुळे मजबुत करण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण पाऊले उचलली जात आहे. मतदान प्रक्रिया राबवितांना पारदर्शकते सोबत गतीमानता आणली जाणार आहे. त्याची अंमलबजवनी ग्रामपंचायतींपासून होणार आहे. मतदानाच्या दिवशीच मतमोजनी होऊन निकाल जाहीर केला आहे. तसेच उमेदवारांना आॅनलाईन फॉर्म भरावा लागणार आहे. लोकशाही प्रणालीमधील हा अभुतपूर्व बदल असून राज्य निवडणूक आयोगाने अंमलबजावनीचे आदेश दिले आहेत.
पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणूका जाहीर होणार आहे. त्याचा पहिला टप्पा निवडणूक आयोगाने हाती घेतला आहे. वार्डचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. निवडणूक घेण्यापूर्वी राज्य निवडणूक आयुक्त जोगेश्वर सहारिया यांनी राज्यभरातील अधिकाऱ्यांची व्हीडीओ काँफरन्सी घेतली. यात ग्रामपंचायत निवडणूक नवीन पद्धतीने घेण्याचे आदेश देण्यात आले आहे.
प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक स्वतंत्र निवडणूक अधिकारी राहणार आहे. मतदानाच्या दिवशी पूर्णवेळ अधिकारी गावात असेल. मतदान पार पडल्यानंतर ग्रामपंचायतीमध्ये मतपेट्या जमा करण्यात येणार आहे. त्याचा दिवशी त्याच ठिकाणी मतमोजनी प्रक्रिया पारपडणार आहे. त्याच ठिकाणी निकाल जाहीर होणार आहे. या प्रक्रियेवर तहसीलदारांचे नियंत्रण असेल. तहसीलवर जिल्हा निवडणूक विभागाचे नियंत्रण असणार आहे. ही संपूर्ण माहिती राज्य निवडणूक आयोगाकडे तत्काळ पोहचणार आहे. तसेच उमेदवाराची संपूर्ण माहिती लगतच्या पोलीस ठाण्यास जोडली जाणार आहे. विशेष म्हणजे कामकाज पारदर्शक आणि सर्वाधिक गतीमान होण्यास मदत होणार आहे. (शहर वार्ताहर)