शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

पोलीस पाटलाविना ६३४ गावांची सुरक्षा वाऱ्यावर

By admin | Updated: December 27, 2014 22:59 IST

गावाच्या सुरक्षेसोबत महसुलाची महत्वाची जबाबदारी असणाऱ्या पोलीस पाटलांच्या महत्वाच्या पदाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. परिणामी एक हजार पोलीस पाटलांवर दोन हजार गावांची

यवतमाळ : गावाच्या सुरक्षेसोबत महसुलाची महत्वाची जबाबदारी असणाऱ्या पोलीस पाटलांच्या महत्वाच्या पदाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. परिणामी एक हजार पोलीस पाटलांवर दोन हजार गावांची जबाबदारी आली आहे. विशेष म्हणजे जिल्हयातील ६२४ गावातील पोलीस पाटलांचे पद रिक्त आहेत. या गावाची जबाबदारी लगतच्या गावातील पोलीस पाटलांवर सोपविली आहे.लोकशाही प्रणालीत पंचायतराज संस्थानला सर्वाधिक महत्व आहे. त्याची रचना करताना गावाची संपूर्ण जबाबदारी सरपंचावर सोपविण्यात आली आहे. तर गावाच्या शांततेची जबाबदारी पोेलीस पाटलांवर देण्यात आली आहे. यामुळे गावातील सर्वात महत्वाचे पद म्हणून पोलीस पाटलाचे पद मानले जाते. या महत्वाच्या पदालाच खिळखिळे करण्याचे काम प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पोलीस पाटलांना टीएडीएच्या नावाखाली वर्षभरासाठी केवळ २५ रुपये दिले जातात. यात जेवनाची आणि तिकीटाची व्यवस्था कशी करावी आसा प्रश्न पोलीस पाटलांना पडतो. शांतता आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यासा पोलिसांचे सहकार्य मागवावे लागते. मात्र यासाठी लागणारा दूरध्वनी खर्च पोलीस पाटलांना खिशातून करावा लागतो. पोलीस पाटलाचा दाखला, इतर अर्ज आणि स्टेशनरी खर्च करण्यासाठी छदामही मिळत नाही. त्यांना दिले जाणारे मानधन मात्र तोकडेच आहे. याविरोधात पोलीस पाटलांनी आंदोलन छेडले मात्र त्यांना न्याय मिळालाच नाही. (शहर वार्ताहर)