शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस गस्त टपरी चालकांच्या मुळावर

By admin | Updated: July 16, 2014 00:28 IST

स्थानिक पोलीस ठाण्याचे पथक आणि चार्ली पोलीस पथकाची रात्री शहरात गस्त असते. ही गस्त आता टपरीचालकांच्या मूळावर उठली आहे. चार्ली पोलीस पथकाचा रात्री ११ वाजताच टपऱ्या बंद करण्यावर भर आहे.

बंद करण्यावर चार्लीचा भर : स्थानिक पोलिसांचा जोर मात्र दुकाने उघडण्यावरयवतमाळ : स्थानिक पोलीस ठाण्याचे पथक आणि चार्ली पोलीस पथकाची रात्री शहरात गस्त असते. ही गस्त आता टपरीचालकांच्या मूळावर उठली आहे. चार्ली पोलीस पथकाचा रात्री ११ वाजताच टपऱ्या बंद करण्यावर भर आहे. ही बाब स्वागतार्ह असली तरी त्यांची व्यावसायिक आणि ग्राहकांशी वागण्याची पध्दत चूकीची आहे. तर स्थानिक पोलीस स्वत:च्या जिभेचे चोचले त्यातही विनामूल्य भागविण्यासाठी चार्ली पथकाने बंद केलेली दुकाने उघडायला लावतात, हे विशेष!वर्षभरापासून यवतमाळ शहर आणि वडगाव रोड हद्दीत सुरू असलेले जबरी चोरी व घरफोडीचे सत्र अद्यापही थांबलेले नाही. चोरट्यांना हुडकून काढा, त्यांना चोरीतील मुद्देमालासह अटक करा, यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून यवतमाळ शहर, वडगाव रोड, स्थानिक गुन्हे शाखा, चार्ली पोलीस पथक यांची दररोजच कानउघाडणी केजी जाते. मात्र एकाही घटनेचा छडा लावण्यात अद्याप पोलिसांना यश आले नाही. त्यामध्ये यश येत नसले तरी या घटनांना आळा बसावा, म्हणून आता रात्रगस्त नित्यनेमाने केली जात आहे. स्थानिक पोलीस ठाण्यांचे आणि चार्ली पोलीस पथक रात्रीदरम्यान शहरात गस्त घालतात. चार्ली पोलीस पथकाकडून व्यापारी प्रतिष्ठाने बंद करण्याबरोबरच संशयित आणि मद्यपींची चौकशी केली जाते. विशेष करून टपऱ्या बंद करून नागरीकांना घराकडे परतवून लावण्याकडे त्यांचा भर असतो. ही बाब कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने स्वागतार्ह आहे. मात्र हे करीत असतानाच अनेक प्रतिष्ठीत नागरिकांशी पथकातील कर्मचारी असभ्य वर्तन करतात. त्यांना शिविगाळ केली जाते. टपरी चालकांना मारण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. त्यामुळे चार्ली पोलीस पथकाकडे बघण्याचा नागरिकांचा दृष्टीकोन आता बदलत चालला आहे. उगाच वैर कशाला म्हणून टपरी चालक आपले दुकान गुंडाळतात. घराकडे निघण्याच्या बेतात असतानाच स्थानिक पोलिसांची गस्ती पथक तेथे पोहोचते. तसेच जिभेचे चोचले पुरविण्यासाठी बंद केलेले दुकान उघडायला लावतात. विशेष असे की, बहुतांश पोलीस कर्मचारी या टपरीचालकांना पैसे न देताच निघून जातात. पुन्हा दुकान बंद करताना चार्ली पोलिसांच्या हाती लागले की, शिवीगाळ, वाहनातील चाकांची हवा सोडणे, चालान अशा प्रकारांना त्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे टपरी चालकांची स्थिती अडकीत्त्यात अडकलेल्या सुपारीसारखी झाली असल्याचे दिसते. (स्थानिक प्रतिनिधी)