शहरं
Join us  
Trending Stories
1
मनुस्मृतीतील काही भाग अभ्यासक्रमात?; पवारांचे आरोप, फडणवीसांचं आक्रमक प्रत्युत्तर
2
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
3
पंतप्रधान मोदी यांचे वाराणसीच्या लोकांसाठी मतदानाच्या आधी खास पत्र, दिला महत्त्वाचा संदेश
4
थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या; रोहित पवारांचा फडणवीस, अजितदादांवर हल्लाबोल
5
केदारनाथ मध्ये मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला, चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशांचे प्राण 
6
अल्पसंख्याक महिला करायची योगींचं समर्थन, अचानक गुंडांनी घरात घुसून केली मारहाण, त्यानंतर...
7
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
8
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
9
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
10
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
11
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
12
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
13
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
14
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
15
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी
16
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
17
हातातील बांगड्यांनी उलगडलं गर्भवती युवतीच्या हत्येचं रहस्य; पतीनं रचला होता बनाव
18
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
19
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
20
Suresh Raina ने पाकिस्तानी पत्रकाराला झापले, शाहिद आफ्रिदीवरून करत होता ट्रोल 

यवतमाळ जिल्ह्यातील राळेगावात एकच चर्चा, नळ कधी येणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 2:31 PM

‘तहान लागल्यावर विहीर खोदणे’, अशी मराठीत एक म्हण आहे. येथील नागरिक गेल्या दोन वर्षांपासून शब्दश: या म्हणीचा प्रत्यय घेत आहे.

ठळक मुद्देनागरिक वैतागलेशासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी झाले कोडगेपाण्यासाठी नागरिकांची भटकंती

के.एस. वर्मा ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ‘तहान लागल्यावर विहीर खोदणे’, अशी मराठीत एक म्हण आहे. येथील नागरिक गेल्या दोन वर्षांपासून शब्दश: या म्हणीचा प्रत्यय घेत आहे. मे महिना अर्ध्यावर आला तरीही पाणीटंचाईच्या झळा कायम आहे. मात्र नगरपंचायत, लोकप्रतिनिधी व शासनाचे प्रयत्न अद्यापही केवळ सुरुच आहे. त्यामुळे शहरात केवळ एकच चर्चा आहे, नळ कधी येणार.राळेगावात पाणीटंचाईने कहर केला आहे. मे महिन्यातही आत्तापर्यंत अनेक प्रभागात पाणी पुरवठा झाला नाही. अनेक वार्डात महिन्यातून एखाद्या वेळीच काही तासापुरता पाणी पुरवठा केला जातो. पाण्यासारख्या मूलभूत सुविधासुद्धा संबंधित संस्था, जनतेचे प्रतिनिधी पुरवू शकत नाही. दुसरीकडे तालुक्यात असलेल्या ८० किलोमीटर महामार्गावर दररोज अपघात होत आहे.तालुक्यातील कळमनेरजवळील वर्धा नदीच्या डोहातून राळेगावला पाणी पुरवठा करून नागरिकांची तहान भागविण्याचे एकमेव प्रयत्न नगरपंचायतीद्वारे सुरू आहे. महाराष्टÑ जीवन प्राधिकरणाने दिलेले २० सबमर्सिबल पंप, मोठ्या हॉर्स पावरची मोटारपंप, तेथे बसविण्यात आली. यामुळे कमी वेळात पाणी टाकी भरली जाऊन जादा वेळ नळाला पाणी सोडण्याचे नियोजन आहे. यातूनही आठ, दहा दिवसाआड पाणी मिळण्याची शक्यता आहे. कोरड्या पडलेल्या वर्धा नदीत हा डोह राळेगावसाठी आता एकमेव आधार आहे. त्यातील पाणी हिरवट, मातकट आहे. शुद्धीकरणाच्या प्रयत्नानंतरही त्याला उग्र दर्प येत आहे. वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी साचलेल्या या पाण्याच्या सेवनाने नागरिकांना आजार बळावण्याची शक्यता आहे.पाणीटंचाईमुळे नागरिकांनी लग्नकायर्य, शुभकार्य घरी करण्याऐवजी मंगल कार्यालय वा शहरात करण्यास सुरूवात केली आहे. पाहुण्यांना घरी येण्यास नम्रपणे मनाई केली जात आहे. नळाची वाट पाहता आपापल्या कामावर जाण्या-येण्याच्या नियोजनावर फरक पडला आहे. शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी मात्र कोडगे झाल्याचे दिसत आहे.हातपंप, विहीरी, तलाव खोलीकरण, जलसंधारणाची कामे दुर्लक्षितनगरपंचायत पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यात असमर्थ ठरली आहे. १७ हातपंप यावर्षी घेण्याचे नियोजन होते. शासनाद्वारे सुद्धा काही हापतंप मंजूर करण्यात आले होते. मात्र अद्याप टेंडर निघाले नाही. शहरात ३८ सार्वजनिक विहिरी आहे. त्या स्वच्छ करणे, गाळ काढणे, त्यावर मोटारी बसवून कार्यान्वित करण्याची कामे हाती घेण्यात आली नाही. नगरपंचायतीने टँकरही सुरू केले नाही. शासनाचे दोन जम्बो टँकर येणार असल्याची १५ दिवसांपासून केवळ चर्चाच सुरू आहे. शहराची भूजल पातळी एकमेव तलावाच्या पाण्यावर निर्भर आहे. मात्र तलाव कोरडा होऊनही खोलीकरणाकडे लक्ष देण्यात आले नाही. लोकवर्गणीत मोठी रक्कम गोळा होऊनही तलाव खोलीकरणाचे काम अर्धवट सोडून देण्यात आले. त्यामुळे भूजल पातळी खालावून विहिरी, बोअर कोरडे पडू लागले. जलसंधारण, रेन वॉटर हॉर्वेस्टींगची कामे करण्यास हिच महत्वाची वेळ असताना नगरपंचायत प्रशासन, पदाधिकारी गप्प आहे.आमदार म्हणतात, नगरपंचायतीचा आपल्याशी संपर्कच नाहीआमदार प्रा.डॉ.अशोक उईके यांनी पाणीटंचाई संदर्भात नगराध्यक्षांनी आत्तापर्यंत आपल्याशी कधीच संपर्क केला नाही, असे स्पष्ट केले. ते म्हणाले, कळमनेर येथील वर्धा नदीच्या डोहात पावसाळ्यापर्यंत पुरेल इतके मुबलक पाणी आहे. यामुळे बेंबळा धरणातून वर्धा नदीत पाणी सोडण्याचा जिल्हा प्रशासनाने निर्णय स्थगीत केला. वर्धा नदीत पाणी सोडण्यास नऊ लाख रुपये खर्च येणार होता. तो वाचविण्यात आला. शहरात पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्याची जबाबदारी नगरपंचायतने पूर्ण करावी. नगरपंचायत अध्यक्षांनी पाणीटंचाई संदर्भातील कोणत्याही प्रश्नावर कधी भेट घेतली नाही, निवेदन दिले नाही, वा फोनद्वारेही कधी संपर्क केला नाही, असे आमदार प्रा.डॉ.उईके यांनी सांगितले.अमृत योजना राबविण्याची मागणीराळेगाव व कळंब या तालुका मुख्यालयांची पाणी समस्या कायमची दूर करण्याकरिता यवतमाळच्या धर्तीवर ‘अमृत’ योजनेप्रमाणे येथेही बेंबळा धरणातून पाणी पुरवठा पाईपलाइनच्या माध्यमातून करण्याची नितांत गरज आहे. नगरविकास विभागाकडे याबाबत प्रस्ताव सादर करून आगामी अर्थसंकल्पात त्याला मंजुरी मिळविण्याचे प्रयत्न झाल्यास पुढील उन्हाळ्यापूर्वीच ही योजना आकार घेऊ शकते. त्यासाठी खासदार, आमदार व इतर लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची गरज आहे. विरोधकांनीसुद्धा मतभेद बाजूला सारून ही मागणी शासनापुढे लावून धरणे आवश्यक आहे.सामाजिक संघटना, दानशूर गेले कुठे ?शहरात तीव्र पाणीटंचाई असूनही सामाजिक संघटनांनीसुद्धा एकही पाणपोई सुरू केली नाही. शासकीय कार्यालयांत पिण्याच्या पाण्याची सोय आहे. मात्र जनावरांसाठी पाण्याचे पाणवठे नसल्याने मुकी जनावरे तडफडत आहे. शहरात अद्याप एकाही दानशूराने टँकरद्वारे पाणी पाजून जलसेवा करण्याचे सौजन्य दाखविलेले नाही. कोरड्या बोअर, विहिरींमुळे शेजाऱ्यांना इच्छा असूनही पाणी देणे शक्य होत नाही. नगरपंचायतीच्या उदासीनेतेमुळे यापेक्षा ग्रामपंचायत बरी होती, असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई