ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
पाणी समस्येवर मात करण्यासाठी जीवन प्राधिकरण व्हॉट्सअप ग्रुप तयार करेल. त्यात पाणी सोडल्या जाणाऱ्या नगराचे नाव आणि वेळ कळविण्यात येईल, असा शब्द कार्यकारी अभियंत्यांनी पालकमंत्र्यांना बैठकीत दिला होता. ...
दिवसेंदिवस ऊन वाढत आहे. वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवनही वाढले आहे. यामुळे पूस धरणातील पाणी पातळीत कमालीची घट होत आहे. सध्या पूस धरणात केवळ १० टक्के जलसाठा शिल्लक आहे. ...
पाण्याच्या तुटवड्याने वसाहतीच नव्हेतर शासकीय कार्यालयातही हाहाकार उडाला आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहे. ...
परस्पर विरुद्ध दिशेने निघालेल्या दोन कारची धडक होवून झालेल्या अपघातात चार जण जखमी झाले. ही घटना शनिवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास नागपूर मार्गावरील मडकोना घाटात घडली. ...
प्रत्येक गावात आज पाणीटंचाई आहे. गाव टँकरमुक्त करायचे असेल तर प्रत्येकाने डोक्यावर टोपले आणि हातात कुदळ घ्यायला हवी, असा सल्ला खासदार भावना गवळी यांनी दिला. अकोलाबाजार येथे श्रमदान कार्यक्रमात त्या बोलत होत्या. ...
येथील शास्त्रीनगरात आगीत संपूर्ण घर भस्मसात झाल्याची घटना शनिवारी पहाटे घडली. त्यात दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. या घरात झोपलेले १६ वऱ्हाडी लहान मुलीच्या सतर्कतेने सुदैवाने बचावले. ...
शेतकऱ्यांनी नाफेडला विकलेल्या तुरीच्या चुकाऱ्याचे ४० कोटी रुपये जिल्ह्याला प्राप्त झाले असून ही रक्कम शेतकऱ्यांकडे वळती करण्यात आली आहे. तर अद्यापही ४६ कोटी रुपयांच्या चुकाऱ्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. ...
मरता-मरता पंतप्रधानांच्या धोरणावर बोट ठेवून गेलेल्या या शेतकऱ्याची आत्महत्या शासकीय मदतीकरिता अपात्र ठरविण्यात आली आहे. त्यामुळे त्याची अवघ्या १६ वर्षांची मुलगी रोज १५ किलोमीटर येणे-जाणे करून एका सराफा दुकानात मजुरी करतेय. ६ वर्षांचा मुलगा सतत आजारी ...
वन्य प्राण्यांची शिकार करण्याच्या उद्देशाने तालुक्यातील वडगाव परिसरातील जंगलात शिरलेल्या सहा शिकाऱ्यांना वन विभागाने मोठ्या शिताफीने शनिवारी पहाटे जेरबंद केले. ...
पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत तालुक्यातील ४३ गावे सहभागी झाली. सर्व गावांमध्ये श्रमदानातून गावे पाणीदार करण्याचा प्रयत्न सुरु आहे. आता गटविकास अधिकाऱ्यांनी आधी श्रमदान नंतरच कार्यालयीन कामकाज सुरू गेल्याने ग्रामस्थांमध्ये हुरूप निर्माण झाला. ...