१९७१ नंतर यवतमाळात पहिल्यांदा निर्माण झालेल्या भीषण पाणीटंचाईने विविध उद्योग, व्यवसायांवर प्रचंड परिणाम केला आहे. त्यामुळे अनेकांवर रोजगाराचे संकट निर्माण झाले आहे. कामकाजच ठप्प झाल्याने मजूर-कारागिरांनी रोजगाराच्या शोधात इतरत्र स्थलांतर केले आहे. ...
भीषण पाणीटंचाईचा फटका नागरिकांनाच नाही तर शहरातील सर्वच व्यवसायांना बसला आहे. अनेक व्यवसाय आज पाण्याअभावी डबघाईस आले आहे. हजारो हातांना काम देणारा बांधकाम व्यवसाय पूर्णत: ठप्प झाला आहे. ...
तूर खरेदीसाठी शेतकरी रांगेत उभा आहे. २६ मेपर्यंत तूर घ्या, नाहीतर पालकमंत्र्यांच्या घरी आसूड घेऊन जाऊ, असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला. आर्णी तालुक्याच्या दाभडी येथून निघालेली आसूड यात्रा बुधवारी येथे पोहोचली. ...
येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागातील अंतिम वर्षाच्या तीन विद्यार्थ्यांची इंडोरामा सिंथेटिक लि. नागपूर या बहुराष्ट्रीय टेक्सटाईल कंपनीत निवड झाली आहे. यात वैभव पद्मशाली, चेतन वारंबे व अक्षय भोयरकर यांचा सम ...
संपूर्ण यवतमाळ शहर भीषण पाणीटंचाईने होरपळत आहे. अशा स्थितीत काहींनी स्वत:चे उखळ पांढरे करण्यास सुरुवात केली आहे. गोरगरीब कुटुंब पाणी विकत घेऊ शकत नाही. अशांना मदत करण्यासाठी आम्ही झटतोय, असा देखावा करून बकळ अशी लोकवर्गणी दात्यांकडून जमा केली जात आहे. ...
जिल्ह्यातील दैनंदिन कामाची गती वाढविण्यासाठी व सुसूत्रता आणण्याकरिता सीसीटीएनएस प्रणालीचा वापर केला जात आहे. ३१ पोलीस ठाण्यातील संपूर्ण डाटा आॅनलाईन झाला असून एका क्लिकवर कुठलीही माहिती उपलब्ध होण्याची सुविधा निर्माण झाली आहे. ...
रोहित्रामध्ये शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या आगीत सहा घरांसह गोठा जळून भस्मसात झाल्याची घटना तालुक्यातील कोनदरी (वाकान) येथे बुधवारी सकाळी ८.४५ वाजताच्या सुमारास घडली. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पुसद, उमरखेड आणि दिग्रस येथून अग्नीशमन दलाला पाचारण करण्य ...
आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी शासनाच्या विविध योजना आहेत. मात्र या योजनांवर राजकीय पक्षासह शेतकरी नेत्यांनीच ताबा मिळविल्याचे जिल्ह्यात दिसत आहे. ...
श्रमदान करून गॅबियन बंधारा पूर्ण केल्याचा आनंदोत्सव बेचखेडावासियांनी साजरा केला. उपस्थितांना पेढा वाटण्यात आला. व्ही चिन्ह दाखवून विजयाचा आनंद व्यक्त करण्यात आला. ...
कष्ट उपसणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सरकार झुकलेच पाहिजे. दाभडी गावात येऊन नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांना उत्पादन खर्च अधिक नफा असा भाव देण्याचे कबूल केले होते. पण दाभडीच काय कुठेच शेतकऱ्यांचे भले झाले नाही. त्याचा जाब विचारण्यासाठी आसुड यात्रा काढण्यात येत आहे ...