शहरातील भीषण पाणीटंचाईच्या काळात टँकरच्या मागणीनुसार टँकर लावण्यात आले. २०१७ च्या कराराचा आधार घेऊन २०१८ मध्ये पाणी वाटप केले. याबाबत संबंधित कंत्राटदाराने वारंवार अवगत करूनही नगरपरिषद प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष करून आदेश दिले. ...
प्राचीन वास्तूकलेचा अद्भुत वारसा जपणाऱ्या हेमाडपंथी मंदिरांची संख्या जिल्ह्यात मोठी आहे. बहुतांश हेमाडपंथी शिवालयांमध्ये श्रावण मासात भाविक आस्थेने गर्दी करीत असले तरी या मंदिरांच्या दुरवस्थेकडे पुरातत्व विभागाने सपशेल दुर्लक्ष केले आहे. ...
१५ आॅगस्टला येथील समाजमंदिराच्या परिसरात असलेल्या शहिद बिरसा मुंडा यांच्या तैलचित्रावर भाजपाने बॅनर लावले होते. त्यामुळे आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या. ...
वणी शहरावर सध्या एक नवे संकट घोंगावू लागले आहे. ‘स्क्रब टायफस’ या जीवघेण्या आजाराने वणी शहरातील बँक कॉलनी परिसरात एका वृद्धेचा मृत्यू झाल्याने शहरवासीयांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ...
शहराच्या हृदयस्थानी जाणाऱ्या मार्गावर असलेल्या शाळांमधील विद्यार्थिनींना श्वास रोखून विद्यार्जन करावे लागत आहे. शिवाय विद्युत कंपनीचे कर्मचारी, लहान व्यावसायिक आणि ये-जा करणाऱ्या नागरिकांचाही श्वास गुदमरत आहे. ...
येथील दत्तशिखर गडावरील प्रमुख यात्रेपैकी एक असलेल्या परिक्रमा यात्रेला (रक्षाबंधन) शनिवारपासून सुरूवात झाली. परिक्रमायात्रेसाठी तेलंगणा व विदर्भातील हजारो भाविक माहूरमध्ये दाखल झाले असून सुरक्षेसाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ...
शेजारील जिल्ह्यांमध्ये पसरलेली डेंग्यूची साथ लक्षात घेता यवतमाळ शहरात खासगी रुग्णालयामध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांकडे डेंग्यू सदृश अशा नजरेने पाहिले जात आहे. ...
सर्वच शहरांमध्ये कचऱ्याची समस्या तीव्र बनली आहे. घंटागाड्यांच्या माध्यमातून कचरा गोळा करणेही त्रासदायक ठरत आहे. त्यावर उपाय म्हणून आता दिग्रस शहरात घंटागाड्यांऐवजी स्वयंचलित चारचाकी वाहनांचे सायरन वाजणार आहेत. ...
येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी अनिकेत इंगोले याचे संशोधनपत्र आंतरराष्ट्रीय विद्यालयात प्रसिद्ध झाले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील कचरा समस्या, त्यावर घरगुती कचरा व्यवस्थापन आणि निर्मूलनयंत्र, असा त्याच्या संशोधनपत्राचा विष ...