स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या स्मृती समारोहानिमित्त रविवार २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते १० या वेळात ‘प्रेरणास्थळ’ येथे संगीतमय प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ...
मुस्लीम समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जमियत-ए-उलेमा हिंदतर्फे येथील तिरंगा चौकात धरणे देण्यात आले. राज्य सरकारने तातडीने रद्द केलेले पाच टक्के आरक्षण पुन्हा लागू न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. ...
विविध संघटनांच्यावतीने २८ नोव्हेंबर ते ६ डिसेंबरपर्यंत महात्मा जोतिराव फुले-डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. नऊ दिवसीय या पर्वात फुले-आंबेडकरांच्या विचारांची विविधांगी चर्चा होणार आहे. ...
शाळेतल्या पोरांसाठी खिचडी शिजवायची अन् महिन्याची हजार रुपयांची मजुरी मिळवायची, हे काम करणाऱ्यांना आता शालेय पोषण आहार योजनेची संपूर्ण जबाबदारीच पेलावी लागणार आहे. ...
कळंब येथील ग्रामीण रुग्णालयात भरती सर्व रुग्णांना चिंतामणी देवस्थानकडून दररोज मोफत भोजन पुरविले जाणार आहे. हा स्तुत्य उपक्रम शनिवार, २४ नोव्हेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय देवस्थान समितीने घेतला आहे. ...
शासनाने राज्यात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड कार्यक्रम हाती घेतला. मात्र उमरखेड वनपरिक्षेत्रात वृक्षांचे संवर्धन, संरक्षण होताना दिसत नाही. वृक्ष तोडीकडे वन विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने या मोहिमो तालुक्यात फज्जा उडाल्याचे दिसत आहे. ...
केंद्र व राज्यातील सरकारच्या कारभाराने समाजातील सर्वच घटक त्रस्त झाले आहेत. विविध आघाड्यांवर त्यांना संघर्ष करावा लागत आहे. शेतकरी, शेतमजुरांवर तर भाजपा-सेना युती सरकारपेक्षा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार बरे होते, असे म्हणण्याची वेळ आली आहे. ...
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या यवतमाळ विभागात प्रशासकीय कामांचा खेळखंडोबा सुरू आहे. आस्थापना विभागावर वरिष्ठांचे नियंत्रण नसल्याने हा प्रकार सुरू आहे. ...
येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अतुल राऊत यांचा कारभार अतिशय चांगला आहे. मात्र आरोग्य सेविका एस. एस. पवार कारस्थान रचून त्यांच्या तक्रारी करीत आहेत. याबाबीचा संताप व्यक्त करीत सर्वसामान्य गावकरी गुरुवारी रस्त्यावर उतरले होते. ...