तालुक्यात गत काही दिवसांपासून युरियाची कृत्रिम टंचाई निर्माण करण्यात आली आहे. युरियाच्या एका बॅगची किंमत सर्व करासहीत २६६.५० रूपये आहे. परंतु तालुक्यात शेतकऱ्यांकडून ३०० ते ३५० रूपये वसूल केले जातात. तेही उपकार केल्यासारखा युरिया देतात. खताच्या किंमत ...
गेल्या तीन दिवसांपासून या परिसरात शेताच्या धुऱ्यावरील झाडाझुडूपांत शेतकरी शेतमजुरांना पट्टेदार वाघाचे दर्शन होत आहे. त्यामुळे शेतकरी व शेतमजूर एवढे भयभीत झाले आहे की अनेकांनी आता शेतात जाणेही बंद केले आहे. मागील आठ-दहा दिवसांपासून या परिसरात शेतकऱ्या ...
उकणी व निवली येथील शेतकरी दौलत विठू सातपुते, बाळू रामचंद्र सातपुते, जनार्दन ताजने, भाऊराव ताजने, वासुदेव ताजने, नागोबा खिरटकर, संदीप ताजने, बापुराव ताजने या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांच्या शेताच्या काठावरच वेकोलिने उत्खन ...
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे छोटे व्यावसायिक बेरोजगार झाले आहेत. पानठेला, चहा कँटीन, ऑटोरिक्षा चालक, झुनका भाकर केंद्र चालक यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. उपाशी राहून मरण्यापेक्षा परिस्थितीशी लढाई करून व्यवसाय सुरू करण्याची तयारी या ...
शहर व तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा ब्लास्ट होत आहे. आतापर्यंत एकूण २३३ नागरिकांना कोरोनाची लागण झाली. मात्र १३९ जणांनी कोरोनावर मात केली. तूर्तास तालुक्यात ८७ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहे. याशिवाय अनेकजण अद्यापही क्वारंटाईन आहे. शहर व ...
दोन विषयात एम.ए. बी.एड. झालेल्या उमेदवारांनी पुढील काळात केव्हातरी अनुदान मिळेल या आशेवर विनाअनुदानित महाविद्यालयांवर शिक्षक म्हणून नोकरी पत्करली. शाळेत यायचे, विद्यादान करायचे आणि घरी गेल्यावर पोटापाण्याची सोय म्हणून इतर कामे करायची, हा त्यांचा नित् ...
अयोध्येतील राम मंदिर हा अनेकांच्या आस्थेचा विषय होता. अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेले श्रीरामाचे मंदिर साकारले जातेय याचा आनंद ओसंडून वाहत होता. कोरोना विषाणू संसर्गाचा कहर असतानाही रामभक्तांनी आपल्या महानायकाच्या मंदिर निर्मितीचा मुहूर्त आगळ्या व ...
आदिवासीबहुल आणि मागास जिल्हा म्हणून काहीसा दुर्लक्षित राहिलेला यवतमाळ जिल्हा गेल्या काही वर्षांपासून स्पर्धा परीक्षांमध्ये चमकत आहे. अजहर, अभिनव आणि सुमित हे तीनही तरुण सर्वसामान्य कुटुंबातील असून प्रतिकूल परिस्थितीशी झुंजत त्यांनी यश मिळविले आहे. अज ...
युती शासनाच्या काळात या सचिवांनी कंत्राटदारांच्या विरोधात वेगवेगळे शासन निर्णय काढून अडचणीत आणले होते. त्यावेळी राज्यभर तीव्र आंदोलन केले गेले. आता शासन बदलल्यावरही या सचिवांनी द्वेष कायम ठेवत शासन निर्णय काढून कंत्राटदारांना पुन्हा डिवचले आहे. हा शा ...
जिल्ह्यात मंगळवारी कोरोनावर मात केल्याने ८० रुग्णांना सुटी देण्यात आली. त्यामुळे सध्या अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४४० झाली आहे. आतापर्यंत एकूण रुग्णसंख्या एक हजार २८४ झाली असून त्यातील ८१० जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत आयसालेशन ...