शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमची मुलं रात्री कुठं जातात, काय करतात?"; पुणे अपघातानंतर बिल्डरांना अजितदादा काय म्हणाले?
2
पुणे अपघात प्रकरणी गृहमंत्र्यांनी त्यांची जबाबदारी पाळली, त्यामुळे...; शरद पवारांचं विधान
3
PAK vs ENG 2nd T20 : इंग्लंडच्या धरतीवर यजमानच 'बॉस', पाकिस्तानचं रडगाणं सुरूच
4
"वायफळ बडबड करू नका..."; राऊतांचा दावा काँग्रेसनेच खोडला, ठाकरे गटालाही फटकारलं
5
“२०१९ला संजय राऊतांनी CM होण्यासाठी प्रयत्न केले होते, हिंमत असेल तर...”: चंद्रशेखर बावनकुळे
6
डिजिटल इंडियाचा जगभरात डंका; मॉरिशस आणि UAE नंतर आता 'या' देशातही चालणार रुपे कार्ड!
7
संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाहांचा प्रयत्न
8
PHOTOS : ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया रवाना; पहिल्या बॅचमध्ये हार्दिक पांड्या दिसला नाही
9
“जीवापेक्षा मोठे काही नाही, शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकारने...”: मनोज जरांगे पाटील
10
शरद पवारांना दुहेरी धक्का; २ अत्यंत विश्वासू शिलेदार पक्षाची साथ सोडणार?
11
"कुणाच्या तरी चुकीमुळे कोणीतरी जीव गमावतं...", अपघाताबाबत अभिजीत खांडकेकर स्पष्टच बोलला
12
“सहाव्या टप्प्यात इंडिया आघाडीने २७२ जागांचा आकडा गाठला, भाजपाचा पराभव निश्चित”: काँग्रेस
13
१ जूनपासून गॅस सिलेंडर ते बँकिंगचे नियम बदलणार; थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार
14
Cyclone Remal: 'रेमल' चक्रीवादळ आज बंगालमध्ये धडकणार, एनडीआरएफचे पथक सतर्क; महाराष्ट्रावर परिणाम होणार?
15
“पंतप्रधान मोदींची भाषा अन् भाजपाच्या जागा दोन्ही सातत्याने घसरत चालल्या आहेत”: राहुल गांधी
16
“PM मोदींची १०० वेळा जगभ्रमंती, उद्धव ठाकरे परदेशात गेले तर पोटात का दुखते”; राऊतांची टीका
17
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
18
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
19
"नशिबाने माझ्या नावाचा कोणी सुलतान नव्हता, नाहीतर...", नावावरून ट्रोल करणाऱ्यांना आस्ताद काळेने सुनावलं
20
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी

राज्यात एक लाख लोकसंख्येमागे केवळ १५३ पोलीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 10:12 AM

राज्यात एक लाख लोकसंख्येमागे केवळ १५३ पोलीस असल्याने जनतेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कामाचा ताण वाढता असल्याने पोलिसांचे आरोग्यही धोक्यात आले आहे.

ठळक मुद्देदेशात सर्वात कमी महाराष्टत

राजेश निस्ताने ।आॅनलाईन लोकमतयवतमाळ : राज्यात एक लाख लोकसंख्येमागे केवळ १५३ पोलीस असल्याने जनतेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कामाचा ताण वाढता असल्याने पोलिसांचे आरोग्यही धोक्यात आले आहे.सातव्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने राज्यातील पोलीस शिपाई ते निरीक्षकांच्या वेतन पुनर्रचनेचा अहवाल नुकताच राज्याच्या पोलीस महासंचालकांना सादर करण्यात आला. त्यात ही धक्कादायक आकडेवारी पुढे आली आहे. जनतेच्या जीवाची, मालमत्तेची सुरक्षा करणे, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याची जबाबदारी पोलिसांवर असताना प्रत्यक्षात लोकसंख्या आणि पोलिसांची संख्या याची आकडेवारी तपासल्यास प्रचंड तफावत दृष्टीस पडते. अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्टतील पोलिसांच्या उपलब्धतेचा हा आकडा देशात सर्वात कमी आहे. विशेष असे, भौगोलिक क्षेत्रफळानुसार महाराष्ट हे देशातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे राज्य आहे. तरीही येथे पोलिसांची वानवा आहे.उपलब्ध पोलिसांवर नैसर्गिक संकटे, दहशतवादी हल्ले, नक्षलवाद, जातीय दंगली, शेतकऱ्यांची आंदोलने, गंभीर गुन्ह्यांचा तपास, शिक्षेच्या दृष्टीने साक्षपुराव्यांची जुळवाजुळव, आरोपींची धरपकड, निवडणूक बंदोबस्त, महत्वाच्या व्यक्तींच्या दौऱ्याचा बंदोबस्त, वाहतूक नियमन, २४ तास पोलिसिंग, रात्रगस्त, गुन्हेगारांवरील वचक, डिटेक्शन, कायदा व सुव्यवस्था राखणे, सण-उत्सव अशा विविध जबाबदाऱ्या आहेत. लोकसंख्येच्या तुलनेत उपलब्ध पोलीस मनुष्यबळ अगदीच तुटपुंजे ठरत आहेत. सलग ड्युटी, सततचा बंदोबस्त,आठवडी रजाही मिळत नाही, बंदोबस्ताच्या ठिकाणी सोयी-सुविधांचा अभाव अशा समस्यांचा सामना करावा लागतो आहे.

अन्य राज्यात उपलब्ध पोलीस बळ( एक लाख लोकसंख्येमागे )महाराष्ट - १५३, मणिपूर - ९८४, नागालॅन्ड - ९३९, मिझोराम - ९१५, अरुणाचल प्रदेश - ८८०, सिक्कीम - ७५८, अंदमान-निकोबार - ७२५, त्रिपुरा - ६३७, मेघालय - ४५७, लक्षद्वीप - ३९१, दिल्ली - ३८३, चंदीगड - ३६२, गोवा - ३५४.

टॅग्स :PoliceपोलिसGovernmentसरकार