दोन हजार गावांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 05:00 IST2020-06-18T05:00:00+5:302020-06-18T05:00:07+5:30

साथरोग नियंत्रणासाठी मान्सूनपूर्व आणि मान्सूनच्यानंतर ग्रामपंचायतींनी गावातील पाण्याचे नमुने घ्यावेत, पेयजलांंची विहिरी, हातपंप यालगत असलेली उकीरडे, घाण त्वरित साफ करावी असे निर्देश दिले आहे. नुकत्याच झालेल्या सर्व्हेत दोन गावातील पिण्याच्या पाण्याचे स्रोत सर्वाधिक दूषित असल्याचे आढळून आले. या गावांना रेड कार्ड देण्यात आले आहे.

Notice to two thousand villages | दोन हजार गावांना नोटीस

दोन हजार गावांना नोटीस

ठळक मुद्देजलजन्य आजार : प्रतिबंधासाठी सतर्कता आणि उपाययोजना

रूपेश उत्तरवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : पावसाळ्यामध्ये ग्रामीण भागात जलजन्य आजाराचा जिल्ह्यात उद्रेक होण्याचा धोका आहे. तो रोखण्यासाठी आरोग्य विभागाने दोन हजार ४० गावांना सतर्क राहण्याची नोटीस बजावली आहे. पावसाळ््यात प्रामुख्याने पेयजलातून साथरोगाची लागण होते. त्या दृष्टीने आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. नदी काठावरच्या १८० गावांमध्ये काटेकोर उपाययोजना राबविल्या जात आहे.
साथरोग नियंत्रणासाठी मान्सूनपूर्व आणि मान्सूनच्यानंतर ग्रामपंचायतींनी गावातील पाण्याचे नमुने घ्यावेत, पेयजलांंची विहिरी, हातपंप यालगत असलेली उकीरडे, घाण त्वरित साफ करावी असे निर्देश दिले आहे. नुकत्याच झालेल्या सर्व्हेत दोन गावातील पिण्याच्या पाण्याचे स्रोत सर्वाधिक दूषित असल्याचे आढळून आले. या गावांना रेड कार्ड देण्यात आले आहे.
जोखीम क्षेत्रात येत असलेल्या ३१ गावांमध्ये साथरोग प्रतिबंधासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. साथरोगाची स्थिीत उद्भवल्यास आरोग्य विभागाने शिघ्र कृती दल स्थापन केले आहे. प्रथमोपचार कीट तयार आहे. ज्या गावांमध्ये संभाव्य धोका आहे, अशा ठिकाणी दररोज भेटी देऊन तेथील आढावा घेतला जात आहे.

नदी काठची १८० गावे संवेदनशील
नदी काठावरील गावांमध्ये पुराच्या पाण्याचा धोका संभवतो. पुराचे पाणी नदी पात्रात गेल्याने पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत दूषित होण्याच दाट शक्यता आहे. हवामान खात्याचा अंदाज पाहता यावर्षी पाऊस सरासरी ओलांडणार हे निश्चित मानले जात आहे. त्याच दृष्टीकोणातून आरोग्य विभाग उपाययोजना करीत आहे. यवतमाळ तालुक्यात चार, बाभूळगाव १४, कळंब १०, राळेगाव चार, घाटंजी चार, पांढरकवडा नऊ, मारेगाव आठ, झरी जामणी दहा, वणी १५, नेर पाच, दारव्हा १७, आर्णी १५, दिग्रस दोन, पुसद २२, महागाव २७, उमरखेड १३ या गावांचा समावेश आहे. यातही ३१ गावे अतिसंवेदनशील म्हणून नोंद आहेत. त्या ठिकाणचा दररोज अहवाल घेतला जात आहे.

Web Title: Notice to two thousand villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.