शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
3
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी सर्वात कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
5
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
8
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
9
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
10
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
11
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर
12
"तिथून परत आलेच नसते तर...", काश्मीरला फिरायला गेलेली मराठी अभिनेत्री, दहशतवादी हल्ल्यानंतर केली पोस्ट
13
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
14
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
15
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
16
Pahalgam Attack Update : वाढदिवसानिमित्त काश्मीर ट्रिप...; दहशतवाद्यांनी पत्नी आणि मुलांसमोरच केली शैलेशची हत्या
17
यंदा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
18
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
19
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

नवे शैक्षणिक धाेरण विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारे: उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2024 10:53 IST

जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात साधला प्राध्यापकांशी संवाद

लोकमत न्यूज नेटवर्क, यवतमाळ: व्यवसायाभिमुख शिक्षण हा नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा गाभा आहे. त्यामुळे या धोरणाची सर्वस्तरावर अंमलबजावणी झाल्यास बेरोजगारांचे लोंढे थांबतील. या शिक्षणातून स्वयंरोजगारक्षम युवा पिढी घडेल, नवनिर्मितीला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करत नवे शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारे असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

यवतमाळ येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात शुक्रवारी त्यांनी प्राध्यापक व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी जवाहरलाल दर्डा एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष तथा ‘लोकमत’ एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन डॉ. विजय दर्डा होते.  प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे माजी उद्योग व शालेय शिक्षणमंत्री तथा ‘लोकमत’चे एडिटर-इन-चीफ राजेंद्र दर्डा, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते, संस्थेचे सचिव किशोर दर्डा, प्राचार्य डॉ. रामचंद्र तत्त्ववादी यांची प्रमुख उपस्थिती होती.

राज्यात युतीचे सरकार आल्यानंतर विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन हे शैक्षणिक धोरण पूर्ण क्षमतेने राबविले जात आहे. नवे शैक्षणिक धोरण रोजगार निर्माण करणाऱ्या शिक्षणाचा आग्रह धरते. अगदी कला शाखेच्या विद्यार्थ्यानेही प्रॅक्टिकल नॉलेज घ्यावे, व्यवसायाभिमुख व्हावे, विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेतून शिक्षण मिळावे, असा आग्रह आहे, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला. कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांनी नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीत देशात महाराष्ट्र पहिले असल्याचे सांगितले. प्रास्ताविक प्राचार्य रामचंद्र तत्त्ववादी यांनी तर किशोर दर्डा यांनी आभार मानले.

मागास, आदिवासीबहुल जिल्ह्यात शिक्षण सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा ध्यास : डॉ. दर्डा

डॉ. विजय दर्डा यांनी आपल्या भाषणात संस्थेच्या स्थापनेमागील भूमिका विशद केली. यवतमाळमध्ये ज्या शैक्षणिक संस्थांंची उभारणी झाली, त्या संस्था नागपूर, पुण्या-मुंबईतही आम्हाला उभारता आल्या असत्या. मात्र, श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा यांनी मागास असलेल्या यवतमाळमध्ये दर्जेदार शिक्षण देणाऱ्या संस्था उभारल्या. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण पोहोचले पाहिजे, हीच या मागची भूमिका असल्याचे सांगत प्रत्येक गोष्टीत पैसा नव्हे तर आम्ही गुणवत्ता पाहतो, यवतमाळमधील या संस्था आज गुणवत्तेतही अग्रेसर असून, या महाविद्यालयांतून शिकलेले विद्यार्थी विविध देशांत उच्च पदांवर कार्यरत असल्याचे डॉ. दर्डा यांनी सांगितले.

राजेंद्र दर्डा यांच्या कार्यपद्धतीचे केले कौतुक

मधुकरराव चौधरी यांनी शिक्षणमंत्री म्हणून कारकीर्द गाजविली होती. त्यांनी या विभागाला खऱ्या अर्थाने शिस्त लावली. त्यानंतर राजेंद्र दर्डा यांनी राज्यातील शिक्षण विभागात आमूलाग्र बदल केले. कायम विनाअनुदानितचा मुद्दा राज्यात जटील झाला होता, गाजत होता. यातील ‘कायम’ हा शब्द काढण्याचा ऐतिहासिक निर्णय त्यांनी घेतला. या निर्णयामुळे राज्यातील ४,२०० शाळांतील हजारो शिक्षक तसेच कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या भाषणात सांगत राजेंद्र दर्डा यांच्या कार्याचे कौतुक केले.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलRajendra Dardaराजेंद्र दर्डाJawaharlal Dardaजवाहरलाल दर्डाVijay Dardaविजय दर्डा