शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

नवे शैक्षणिक धाेरण विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारे: उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2024 10:53 IST

जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात साधला प्राध्यापकांशी संवाद

लोकमत न्यूज नेटवर्क, यवतमाळ: व्यवसायाभिमुख शिक्षण हा नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा गाभा आहे. त्यामुळे या धोरणाची सर्वस्तरावर अंमलबजावणी झाल्यास बेरोजगारांचे लोंढे थांबतील. या शिक्षणातून स्वयंरोजगारक्षम युवा पिढी घडेल, नवनिर्मितीला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करत नवे शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारे असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

यवतमाळ येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात शुक्रवारी त्यांनी प्राध्यापक व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी जवाहरलाल दर्डा एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष तथा ‘लोकमत’ एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन डॉ. विजय दर्डा होते.  प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे माजी उद्योग व शालेय शिक्षणमंत्री तथा ‘लोकमत’चे एडिटर-इन-चीफ राजेंद्र दर्डा, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते, संस्थेचे सचिव किशोर दर्डा, प्राचार्य डॉ. रामचंद्र तत्त्ववादी यांची प्रमुख उपस्थिती होती.

राज्यात युतीचे सरकार आल्यानंतर विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन हे शैक्षणिक धोरण पूर्ण क्षमतेने राबविले जात आहे. नवे शैक्षणिक धोरण रोजगार निर्माण करणाऱ्या शिक्षणाचा आग्रह धरते. अगदी कला शाखेच्या विद्यार्थ्यानेही प्रॅक्टिकल नॉलेज घ्यावे, व्यवसायाभिमुख व्हावे, विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेतून शिक्षण मिळावे, असा आग्रह आहे, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला. कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांनी नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीत देशात महाराष्ट्र पहिले असल्याचे सांगितले. प्रास्ताविक प्राचार्य रामचंद्र तत्त्ववादी यांनी तर किशोर दर्डा यांनी आभार मानले.

मागास, आदिवासीबहुल जिल्ह्यात शिक्षण सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा ध्यास : डॉ. दर्डा

डॉ. विजय दर्डा यांनी आपल्या भाषणात संस्थेच्या स्थापनेमागील भूमिका विशद केली. यवतमाळमध्ये ज्या शैक्षणिक संस्थांंची उभारणी झाली, त्या संस्था नागपूर, पुण्या-मुंबईतही आम्हाला उभारता आल्या असत्या. मात्र, श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा यांनी मागास असलेल्या यवतमाळमध्ये दर्जेदार शिक्षण देणाऱ्या संस्था उभारल्या. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण पोहोचले पाहिजे, हीच या मागची भूमिका असल्याचे सांगत प्रत्येक गोष्टीत पैसा नव्हे तर आम्ही गुणवत्ता पाहतो, यवतमाळमधील या संस्था आज गुणवत्तेतही अग्रेसर असून, या महाविद्यालयांतून शिकलेले विद्यार्थी विविध देशांत उच्च पदांवर कार्यरत असल्याचे डॉ. दर्डा यांनी सांगितले.

राजेंद्र दर्डा यांच्या कार्यपद्धतीचे केले कौतुक

मधुकरराव चौधरी यांनी शिक्षणमंत्री म्हणून कारकीर्द गाजविली होती. त्यांनी या विभागाला खऱ्या अर्थाने शिस्त लावली. त्यानंतर राजेंद्र दर्डा यांनी राज्यातील शिक्षण विभागात आमूलाग्र बदल केले. कायम विनाअनुदानितचा मुद्दा राज्यात जटील झाला होता, गाजत होता. यातील ‘कायम’ हा शब्द काढण्याचा ऐतिहासिक निर्णय त्यांनी घेतला. या निर्णयामुळे राज्यातील ४,२०० शाळांतील हजारो शिक्षक तसेच कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या भाषणात सांगत राजेंद्र दर्डा यांच्या कार्याचे कौतुक केले.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलRajendra Dardaराजेंद्र दर्डाJawaharlal Dardaजवाहरलाल दर्डाVijay Dardaविजय दर्डा