शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
2
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
3
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
4
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
5
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
6
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
7
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
8
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
9
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
10
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
11
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
12
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
13
IPL 2026: वैभव सूर्यवंशी असेच षटकार मारत राहिला तर मोडणार ख्रिस गेलचा १४ वर्ष जुना विक्रम
14
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
15
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
16
सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन विदर्भकर IPL स्टार कसा बनला?
17
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
18
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
19
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
20
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय महामार्गच गेला खड्ड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 05:00 IST

रोडवरच मोठे व खोल खड्डे पडल्याने जड वाहनांना मार्ग काढावा कोठून असा प्रश्न पडतो आहे. लहान वाहने तर या खड्ड्यात उलटतात की काय, अशी भीती निर्माण होते. चालक सावध नसेल तर या महामार्गावर खड्ड्यांमुळे अपघात निश्चित आहे. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने व खड्ड्याचा अंदाज न आल्याने अनेक अपघात झाले आहे.

ठळक मुद्देअपघात वाढले : पांढरकवडा तालुक्यात सर्वाधिक खड्डे

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : नागपूर-हैदराबाद हा राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ चक्क खड्ड्यात गेला असे म्हणण्याची वेळ वाहनधारकांवर आली आहे. कारण पांढरकवडा तालुक्यातून जाणाऱ्या या महामार्गावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात आणि गुडघ्याएवढे खोल खड्डे पडल्याचे चित्र आहे. या खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.केंद्रातील भाजप सरकार देशभर कनेक्टीव्हीटी निर्माण केल्याचा दावा करीत आहे. त्यासाठी नवनवीन रस्ते बांधकाम हाती घेण्यात आले आहे. अनेक ठिकाणी आवश्यकता नसताना त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देऊन चौपदरी मार्ग केले गेले आहेत. तर दुसरीकडे जुन्या महामार्गांचा दर्जा अगदीच सुमार आहे. नागपूर-हैदराबाद हा राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ सध्या खड्ड्यांमुळे केंद्रातील भाजप सरकारचे दुर्लक्ष, अपयश अधोरेखीत करतो आहे. या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. विशेषत: राळेगाव व पांढरकवडा या दोन तालुक्यातून जाणाºया मार्गांवर खड्ड्यांची संख्या अधिक आहे. संपूर्ण रोडवरच मोठे व खोल खड्डे पडल्याने जड वाहनांना मार्ग काढावा कोठून असा प्रश्न पडतो आहे. लहान वाहने तर या खड्ड्यात उलटतात की काय, अशी भीती निर्माण होते. चालक सावध नसेल तर या महामार्गावर खड्ड्यांमुळे अपघात निश्चित आहे. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने व खड्ड्याचा अंदाज न आल्याने अनेक अपघात झाले आहे. कुणाचा जीव गेला तर कुणाला कायम अपंगत्व आले आहे. खड्डे वाचविताना वाहने रस्त्याच्या कडेला उलटल्याचीही उदाहरणे आहेत.या महामार्गावर वाहनांकडून ठिकठिकाणी टोल टॅक्स वसुली होत असताना रस्त्यांची ही खस्ता हालत का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. मात्र तेलंगणामध्ये विपरित स्थिती आहे. तेथे रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती होत असल्याचे सांगण्यात आले. उखडलेल्या रस्त्यांना जबाबदार कोण, हे खड्डे बुजविण्याची जबाबदारी कुणाकडे, राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाचे याकडे दुर्लक्ष का आदी प्रश्न उपस्थित केले जात आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा