शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
14
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
15
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
16
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
17
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
18
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
19
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
20
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?

यवतमाळात टोळी युद्धाचा भडका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 11:25 PM

शहरातील जामनकर नगर, आठवडीबाजार परिसरात शनिवारी टोळी युद्धाचा भडका उडाला. यात दोन जण गंभीर जखमी झाले असून अवधूतवाडी पोलिसांत परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या.

ठळक मुद्देदोन जखमी : ठाण्यात परस्परांविरुद्ध तक्रारी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरातील जामनकर नगर, आठवडीबाजार परिसरात शनिवारी टोळी युद्धाचा भडका उडाला. यात दोन जण गंभीर जखमी झाले असून अवधूतवाडी पोलिसांत परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या.कुख्यात बाबा पवार याचा भाचा विजय रमेश चव्हाण (१९) रा.जांब रोड याच्यावर विरोधी गटातील सहा जणांनी तलवार व लोखंडी रॉडने जामनकरनगर परिसरात शनिवारी दुपारी प्राणघातक हल्ला केला. विजय हा त्याचा मित्र टिकू राठोड याला भेटण्यासाठी दुचाकीने जात होता. या हल्ल्यात विजय आणि रवी जखमी झाले. त्यांनी तेथून पळ काढत अवधूतवाडी पोलीस ठाणे गाठले. याप्रकरणी विजय चव्हाण याच्या तक्रारीवरून रौनक यादव (२०) रा.जामनकरनगर, मिट्टू ठाकूर (२५), आदित्य यादव (२१), विजय कैथवास (२२), सोनू ठाकूर ऊर्फ संडास (२१) तिघेही रा.आठवडीबाजार, शाहरूख पठाण रा.कळंब चौक यांच्याविरूद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. तर विरोधी गटातील रौनक यादव (२०) रा. जामनकरनगर याची आई निता राजेश यादव यांच्या तक्रारीवरून रवी पवार (२०), सोनू पवार (२१) दोघेही रा.आठवडीबाजार, विक्की कापसे (२२), सचिन राठोड (२३) दोघेही रा.जामनकरनगर, विजय रमेश चव्हाण रा.जांब रोड, सागर शिंदे रा.कार्ली यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला. परस्परविरोधी तक्रारीवरून अवधूतवाडी पोलिसांनी प्राणघातक हल्ला, जबर मारहाण, धमकी देणे, दंगा घडवून आणणे व शस्त्रबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. या घटनेनंतर यादव टोळीतील सर्व सदस्य पसार झाले. तर विजय चव्हाण हा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आला असता त्याला तेथेच साथीदारासह पोलिसांनी अटक केली. या दोन्ही गटांमध्ये अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. पोलिसांच्या भूमिकेमुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.नवोदितांचा वापरशहरात राजकीय पाठबळामुळे स्वत:ची दहशत निर्माण करण्यासाठी काही घटकांकडून नवोदितांचा वापर केला जात आहे. १८ ते २५ वयोगटातील तरूणांना हाताशी धरून त्यांची आक्रमकता स्वत:ची दहशत निर्माण करण्यासाठी वापरली जात आहे.तक्रार घेऊन आलेल्या चौघांना अटकतक्रार देण्यासाठी आलेल्या विजय रमेश चव्हाण, सचिन छगन राठोड, रवी गजानन पवार, शुभम सुधाकर कापसे या चौघांना पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले. त्यांना एक दिवसाची कोठडी देण्यात आली.

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिस