शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
4
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
5
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
6
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
7
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
8
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
9
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
10
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
11
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
12
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
13
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
14
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
15
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
16
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
17
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
18
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
19
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
20
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
Daily Top 2Weekly Top 5

२१ उद्योजकांचे भूखंड परत घेतले एमआयडीसी : पाच वर्षांपासून होते पडून

By admin | Updated: March 2, 2016 02:46 IST

उद्योगाविना भूखंड ताब्यात ठेवणाऱ्यांविरुद्ध शासनाने फास आवळला आहे. संपूर्ण राज्यात असे भूखंड परत घेण्याची कारवाई सुरू असतानाच ...

सुहास सुपासे यवतमाळ उद्योगाविना भूखंड ताब्यात ठेवणाऱ्यांविरुद्ध शासनाने फास आवळला आहे. संपूर्ण राज्यात असे भूखंड परत घेण्याची कारवाई सुरू असतानाच यवतमाळ जिल्ह्याने दोन महिन्यात २१ भूखंड जप्त करून यामध्ये इतर जिल्ह्यांच्या तुलनेत आघाडी घेतली आहे. तसेच ३१ मार्चपूर्वी तब्बल ६६ भूखंड ताब्यात घेण्यात येणार आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील विविध महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाअंतर्गत (एमआयडीसी) येणाऱ्या जागांवर उद्योग सुरू करण्यासाठी भूखंड घेऊन त्यातील अनेक भूखंडांवर उद्योगच सुरू करण्यात आले नाहीत. नियमानुसार पाच वर्षात एमआयडीसीच्या भूखंडावर उद्योग सुरू न केल्यास ते परत करावे लागतात, अन्यथा महामंडळाकडून ते परत घेतले जातात. उद्योगांशिवाय पाच वर्षाहून अधिक काळ ताब्यात ठेवलेले म्हणजेच मुदत विकास कालावधी संपलेले जिल्ह्यात १५३ भूखंड होते. मध्यंतरी शासनाने उद्योगाविना भूखंड ताब्यात ठेवणाऱ्यांसाठी मुदतवाढ देण्याची संजीवनी योजना जाहीर केली होती. या योजनेचा लाभ घेऊन अनेकांनी उद्योग सुरू करण्यासाठीच्या हालचालींना वेग दिला होता. संजीवनी योजनेंतर्गत ६६ भूखंडधारकांना उद्योग सुरू करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली. २१ भूखंड जप्त करण्यात आले. तर उर्वरित ६६ भूखंड ३१ मार्चपूर्वी जप्त करण्यात येणार आहे. त्यामुळे या ६६ भूखंडधारकांनी स्वत:हून आपले भूखंड एमआयडीसीला परत करणे हा एक चांगला मार्ग आहे. उल्लेखनीय म्हणजे जप्तीतील सर्वाधिक भूखंड हे दारव्हा एमआयडीसीतील आहे तर सर्वात कमी भूखंड यवतमाळ शहरानजीकच्या एमआयडीसीतील आहेत. भूखंडांवर उद्योग सुरू करण्यासाठी बांधकाम सुरू असणे अशाप्रकारची पळवाट आता काढता येणार नाही. ज्या उद्योगासाठी भूखंड घेतला आते अशा भूखंडावर त्याच उद्योगातील उत्पादन किमान दोन ते तीन महिन्यांपासून सुरू असणे गरजेचे आहे, अशाच भूखंडधारकांना यातून सवलत दिली जाणार आहे, जे भूखंड उत्पादनात नसतील त्यांनी स्वत:हून सरेंडर करून जप्तीची कारवाई टाळणे आवश्यक आहे. एकीकडे उद्योग सुरू करण्याची तीव्र इच्छा असणाऱ्या बेरोजगारांना भूखंड उपलब्ध होत नाही तर अनेकजण अनधिकृतरीत्या वर्षाेनवर्षे एमआयडीसीचे भूखंड उद्योगाविनाच ताब्यात ठेवतात. विकासात अडसरआधीच यवतमाळ जिल्ह्यात नगण्य उद्योग आहेत. गेल्या १० वर्षात शेकडोंच्या संख्येने उद्योग बंद पडले आहेत. अशा परिस्थितीत नव्याने उद्योग सुरू होणे गरजेचे आहे. त्याशिवाय बेरोजगारीवर नियंत्रण मिळविता येणार नाही. असे असताना आजही अनेकजण उद्योग सुरू करण्यासाठी तयार आहेत. परंतु अशा लोकांना एमआयडीसीमध्ये भूखंडच मिळत नाही. तर दुसरीकडे कोणत्याही उद्योगांशिवाय वर्षाेनवर्षे केवळ भूखंड ताब्यात ठेवले जातात. याचा परिणाम थेट जिल्ह्याच्या विकासावर पडतो.